शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
6
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
7
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
8
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
9
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
10
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
11
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
12
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
13
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
14
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
15
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
16
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
17
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
18
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
19
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
20
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."

थापाड्या चीनच्या सैन्यमाघारीवर विश्वास ठेवणे चूकीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:12 IST

पुणे : चीनचा खोटारडेपणा संपूर्ण जगात उघडकीस आला आहे. एक पाऊल मागे घ्यायचे आणि पुन्हा आक्रमण करायचे ही त्यांची ...

पुणे : चीनचा खोटारडेपणा संपूर्ण जगात उघडकीस आला आहे. एक पाऊल मागे घ्यायचे आणि पुन्हा आक्रमण करायचे ही त्यांची वृत्ती आहे. १९६२, १९६७, नथूला, डाेकलाम तसेच गलवान खोऱ्यात हे सिद्ध झाले आहे. यामुळे सैन्यमाघारी घेणे हा चीनची चाल असू शकते. यामुळे भविष्यातील धोका ओळखून भारतीय सैन्यांने आपली सीमेवरील क्षमता अधिक वाढवून चीनच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवायला हवे. या साठी आधूनिक सांधनांचा वापर करायला हवा, असे मत लष्करी अभ्यासकांनी व्यक्त केले.

चीनने लडाख सीमेवरून एकतर्फी सैन्यमाघारी घेत असल्याचे घोषित केले. या बाबत निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर म्हणाले, चीनने भारताची वांवरवांर फसवणूक केली आहे. भारताच्या मोठ्या भूभाग त्यांनी हडप केला आहे. यामुळे ही सैन्य माघार म्हणजे त्यांची एक चाल आहे. या पूर्वीही त्यांचा खोेटेपणा ऊघड झाला आहे. यामुळे भारतीय सैन्यांनी गाफील न राहता सीमेवरील सामारिक दृष्या ताब्यात घेतलेल्या प्रदेशावर आपली पकड आणखी घट्ट करायला हवी. कारण भारतीय सैन्य हे मोक्याच्या ठिकाणी आहे. चीनला हे सलत आहे.

निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले म्हणाले, संपूर्ण जग हे कोरोना विषाणूशी लढत असतांना गलवान खोऱ्यात चीनने घुसखोरी केली. तसेच सैन्य घाघारी न घेता भारतीय सैन्यांवर हल्ला केला. यात भारतीय जवान हुतात्मा झाले. यामुळे सैन्यमाघारी ही शुद्ध फसवणून आहे. भारतीय सैन्यांनी चीनच्या प्रत्येक हालचालींवर बारिक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. या साठी आधुनिक तंत्रज्ञान, उपग्रहाचा वापर करायला हवा. चीन भारतीय सीमांवर नवी वसाहत उभारू पाहत आहे. याद्वारे पाकिस्तानच्या विशेष आर्थिक क्षेत्रातून माल नेऊ पाहत आहे. यामुळे भारतीयांनी दक्ष राहणे हे गरजेचे आहे.

चीन सैन्य माघार घेत आहे हा भारताचा नैतीक विजय मानायला हवा. कारण लष्कर शक्तीचे प्रदर्शन करत आम्ही शक्तीशाली आहोत असा आव चीनने आणला होता. याचा बागुलबुवा आपल्या माध्यमांनीही केला होता. मात्र, भारताचे काही बिघडले नाही. उलट गलवान खोऱ्यात आपणच त्यांच्या सैन्यांची पिटाई करत त्यांचे ७० ते ८० सैनिक मारले. रशियाच्या एका न्यूज एजन्सीनेही या बाबत बातमी प्रसिद्ध केली आहे. या नंतर आपण कैलास पर्वत रांगावर जात सामरिक दृष्ट्या महत्वाच्या जागांवर ताबा मिळवला. यामुळे चीनचे जे उद्देश होते ते सफल झाले नाही. चीन जरी सैन्य माघारी घेत असला तरी चीन हा विश्वास घातकी देश आहे. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवणे योग्य नाही.