शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
2
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
3
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
4
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
5
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
6
शरणू हांडेचं अपहरण करणारा 'तो' युवक आणि मास्टरमाईंड कोण?; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप
7
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
8
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
9
Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स
10
सारखा भाऊच का? रक्षाबंधनाला बहिणीने ओवाळणी द्यायची की भावाने? भाऊबीजेचे काय, वाचा यमाची कथा...
11
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
12
Video - 'ते' आले अन् धारदार शस्त्रांनी केला हल्ला; हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येचे CCTV फुटेज
13
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
14
पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेना; आता ध्वजवंदनावरून वादंग; १५ ऑगस्टचा मान गोगावलेंना देण्याची मागणी
15
पाक क्रिकेटर बलात्कार प्रकरणात अडकला; पोलिसांनी मॅच सुरु असतानाच ठोकल्या बेड्या
16
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
17
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
18
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
19
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
20
तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!

थापाड्या चीनच्या सैन्यमाघारीवर विश्वास ठेवणे चूकीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:12 IST

पुणे : चीनचा खोटारडेपणा संपूर्ण जगात उघडकीस आला आहे. एक पाऊल मागे घ्यायचे आणि पुन्हा आक्रमण करायचे ही त्यांची ...

पुणे : चीनचा खोटारडेपणा संपूर्ण जगात उघडकीस आला आहे. एक पाऊल मागे घ्यायचे आणि पुन्हा आक्रमण करायचे ही त्यांची वृत्ती आहे. १९६२, १९६७, नथूला, डाेकलाम तसेच गलवान खोऱ्यात हे सिद्ध झाले आहे. यामुळे सैन्यमाघारी घेणे हा चीनची चाल असू शकते. यामुळे भविष्यातील धोका ओळखून भारतीय सैन्यांने आपली सीमेवरील क्षमता अधिक वाढवून चीनच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवायला हवे. या साठी आधूनिक सांधनांचा वापर करायला हवा, असे मत लष्करी अभ्यासकांनी व्यक्त केले.

चीनने लडाख सीमेवरून एकतर्फी सैन्यमाघारी घेत असल्याचे घोषित केले. या बाबत निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर म्हणाले, चीनने भारताची वांवरवांर फसवणूक केली आहे. भारताच्या मोठ्या भूभाग त्यांनी हडप केला आहे. यामुळे ही सैन्य माघार म्हणजे त्यांची एक चाल आहे. या पूर्वीही त्यांचा खोेटेपणा ऊघड झाला आहे. यामुळे भारतीय सैन्यांनी गाफील न राहता सीमेवरील सामारिक दृष्या ताब्यात घेतलेल्या प्रदेशावर आपली पकड आणखी घट्ट करायला हवी. कारण भारतीय सैन्य हे मोक्याच्या ठिकाणी आहे. चीनला हे सलत आहे.

निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले म्हणाले, संपूर्ण जग हे कोरोना विषाणूशी लढत असतांना गलवान खोऱ्यात चीनने घुसखोरी केली. तसेच सैन्य घाघारी न घेता भारतीय सैन्यांवर हल्ला केला. यात भारतीय जवान हुतात्मा झाले. यामुळे सैन्यमाघारी ही शुद्ध फसवणून आहे. भारतीय सैन्यांनी चीनच्या प्रत्येक हालचालींवर बारिक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. या साठी आधुनिक तंत्रज्ञान, उपग्रहाचा वापर करायला हवा. चीन भारतीय सीमांवर नवी वसाहत उभारू पाहत आहे. याद्वारे पाकिस्तानच्या विशेष आर्थिक क्षेत्रातून माल नेऊ पाहत आहे. यामुळे भारतीयांनी दक्ष राहणे हे गरजेचे आहे.

चीन सैन्य माघार घेत आहे हा भारताचा नैतीक विजय मानायला हवा. कारण लष्कर शक्तीचे प्रदर्शन करत आम्ही शक्तीशाली आहोत असा आव चीनने आणला होता. याचा बागुलबुवा आपल्या माध्यमांनीही केला होता. मात्र, भारताचे काही बिघडले नाही. उलट गलवान खोऱ्यात आपणच त्यांच्या सैन्यांची पिटाई करत त्यांचे ७० ते ८० सैनिक मारले. रशियाच्या एका न्यूज एजन्सीनेही या बाबत बातमी प्रसिद्ध केली आहे. या नंतर आपण कैलास पर्वत रांगावर जात सामरिक दृष्ट्या महत्वाच्या जागांवर ताबा मिळवला. यामुळे चीनचे जे उद्देश होते ते सफल झाले नाही. चीन जरी सैन्य माघारी घेत असला तरी चीन हा विश्वास घातकी देश आहे. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवणे योग्य नाही.