शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

थापाड्या चीनच्या सैन्यमाघारीवर विश्वास ठेवणे चूकीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:12 IST

पुणे : चीनचा खोटारडेपणा संपूर्ण जगात उघडकीस आला आहे. एक पाऊल मागे घ्यायचे आणि पुन्हा आक्रमण करायचे ही त्यांची ...

पुणे : चीनचा खोटारडेपणा संपूर्ण जगात उघडकीस आला आहे. एक पाऊल मागे घ्यायचे आणि पुन्हा आक्रमण करायचे ही त्यांची वृत्ती आहे. १९६२, १९६७, नथूला, डाेकलाम तसेच गलवान खोऱ्यात हे सिद्ध झाले आहे. यामुळे सैन्यमाघारी घेणे हा चीनची चाल असू शकते. यामुळे भविष्यातील धोका ओळखून भारतीय सैन्यांने आपली सीमेवरील क्षमता अधिक वाढवून चीनच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवायला हवे. या साठी आधूनिक सांधनांचा वापर करायला हवा, असे मत लष्करी अभ्यासकांनी व्यक्त केले.

चीनने लडाख सीमेवरून एकतर्फी सैन्यमाघारी घेत असल्याचे घोषित केले. या बाबत निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर म्हणाले, चीनने भारताची वांवरवांर फसवणूक केली आहे. भारताच्या मोठ्या भूभाग त्यांनी हडप केला आहे. यामुळे ही सैन्य माघार म्हणजे त्यांची एक चाल आहे. या पूर्वीही त्यांचा खोेटेपणा ऊघड झाला आहे. यामुळे भारतीय सैन्यांनी गाफील न राहता सीमेवरील सामारिक दृष्या ताब्यात घेतलेल्या प्रदेशावर आपली पकड आणखी घट्ट करायला हवी. कारण भारतीय सैन्य हे मोक्याच्या ठिकाणी आहे. चीनला हे सलत आहे.

निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले म्हणाले, संपूर्ण जग हे कोरोना विषाणूशी लढत असतांना गलवान खोऱ्यात चीनने घुसखोरी केली. तसेच सैन्य घाघारी न घेता भारतीय सैन्यांवर हल्ला केला. यात भारतीय जवान हुतात्मा झाले. यामुळे सैन्यमाघारी ही शुद्ध फसवणून आहे. भारतीय सैन्यांनी चीनच्या प्रत्येक हालचालींवर बारिक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. या साठी आधुनिक तंत्रज्ञान, उपग्रहाचा वापर करायला हवा. चीन भारतीय सीमांवर नवी वसाहत उभारू पाहत आहे. याद्वारे पाकिस्तानच्या विशेष आर्थिक क्षेत्रातून माल नेऊ पाहत आहे. यामुळे भारतीयांनी दक्ष राहणे हे गरजेचे आहे.

चीन सैन्य माघार घेत आहे हा भारताचा नैतीक विजय मानायला हवा. कारण लष्कर शक्तीचे प्रदर्शन करत आम्ही शक्तीशाली आहोत असा आव चीनने आणला होता. याचा बागुलबुवा आपल्या माध्यमांनीही केला होता. मात्र, भारताचे काही बिघडले नाही. उलट गलवान खोऱ्यात आपणच त्यांच्या सैन्यांची पिटाई करत त्यांचे ७० ते ८० सैनिक मारले. रशियाच्या एका न्यूज एजन्सीनेही या बाबत बातमी प्रसिद्ध केली आहे. या नंतर आपण कैलास पर्वत रांगावर जात सामरिक दृष्ट्या महत्वाच्या जागांवर ताबा मिळवला. यामुळे चीनचे जे उद्देश होते ते सफल झाले नाही. चीन जरी सैन्य माघारी घेत असला तरी चीन हा विश्वास घातकी देश आहे. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवणे योग्य नाही.