शहरं
Join us  
Trending Stories
1
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
2
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
3
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
4
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
5
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
6
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
7
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
8
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
9
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
10
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
11
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
12
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
13
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
14
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
15
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
16
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
17
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
18
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
19
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
20
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

तो’ बॉम्ब कवलापुरातच निकामी करणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2016 00:20 IST

लष्कराच्या अधिकाऱ्यांची प्रतीक्षा : चोवीस तास शस्त्रधारी पहारा

सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथे सापडलेला लष्करातील बॉम्ब कवलापुरातच निकामी केला जाणार आहे. पण यासाठी लष्कराच्या अधिकाऱ्यांची प्रतीक्षा लागून राहिली आहे. बॉम्ब सापडून आठवड्याचा कालावधी होऊन गेला, तरी अजूनही लष्कराचे अधिकारी सांगलीत आलेले नाहीत. त्यामुळे बॉम्बच्याठिकाणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा २४ तास शस्त्रधारी पहारा ठेवला आहे. कवलापुरातील बिसूर रस्त्यावरील सुकुमार आष्टेकर यांचे हे शेत आहे. गेल्या आठवड्यात या शेतात ट्रॅक्टरने नांगरणी सुरु होते. त्यावेळी ट्रॅक्टरच्या फाळाला एक बॉम्ब आढळून आला होता. त्यानंतर बॉम्बशोधक पथकास पाचारण केले होते. पथकाने तपासणी केल्यानंतर हा लष्करातील असल्याचे स्पष्ट झाले होते. चाळीस वर्षांपूर्वीचा हा बॉम्ब असावा, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. लष्कराच्या मदतीने हा बॉम्ब निकामी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा बॉम्ब उचलून निर्जन ठिकाणी नेण्याचे धोक्याचे होते. त्यामुळे आष्टेकर यांच्या शेतातच चार फूट खड्डा खोदून एका पोत्यात हा बॉम्ब ठेवण्यात आला आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांनी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड व जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांच्या आदेशाने याची माहिती पुण्यातील लष्कराच्या कार्यालयात दिली होती. पण लष्कराचे अधिकारी अजूनही सांगलीत आलेले नाहीत. आष्टेकर यांच्या शेतात बॉम्ब कसा आला? याचाही उलगडा अद्याप झालेला नाही. काही वर्षापूर्वी आष्टेकर यांनी त्यांच्या विहिरीतील गाळ काढला होता. या विहिरीतच हा बॉम्ब असण्याची शक्यता आहे. गाळाबरोबर तो बाहेर आला असावा, असा अंदाज आहे. पण यासंदर्भात कोणतीही ठोस माहिती पुढे आलेली नाही. हा बॉम्ब कवलापुरातच निकामी केला जाणार आहे. पण तो कसा निकामी केला जाणार आहे, हे सांगण्यात आले नाही. (प्रतिनिधी)पोलीस अडकलेलष्कराच्या अधिकाऱ्यांना येण्यास विलंब लागत असल्याने दोन पोलीस याठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांना २४ तास पहारा द्यावा लागत आहे. भर उन्हात त्यांना बसावे लागत आहे. त्यांना हे ठिकाण सोडून कुठे न जाण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच या परिसरात नागरिकांना तेथे येण्यास मनाई करण्यात आली आहे. भीतीने शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात जायचेही बंद केले आहे.