शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

आयटी ‘वारकरी’ दत्तक घेणार ‘शाळकरी’

By admin | Updated: July 5, 2015 01:07 IST

माहिती-तंत्रज्ञानाच्या महाजालात असतानाही विठ्ठलाच्या ओढीने वारीत सहभागी होणारे आयटीतले ‘वारकरी’ आता सामाजिक बांधिलकीचा वसाही घेऊ पाहत आहेत.

पराग पोतदार, पुणेमाहिती-तंत्रज्ञानाच्या महाजालात असतानाही विठ्ठलाच्या ओढीने वारीत सहभागी होणारे आयटीतले ‘वारकरी’ आता सामाजिक बांधिलकीचा वसाही घेऊ पाहत आहेत. यंदा वारीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याबरोबरच हे सर्व जण मिळून आश्रमशाळांतील १५ हून अधिक शाळकरी मुलांना दत्तक घेणार आहेत. सांस्कृतिकनगरी म्हणून ओळख असणारी पुण्यनगरी ही गेल्या दशकामध्ये आयटीनगरी बनलेली आहे. पुण्यामध्ये २०० हून अधिक आयटी कंपन्या असून हजारो तरुण मुले या आयटी कंपन्यांतून काम करीत आहेत. या साऱ्यांना आळंदीहून पंढरपुराकडे जाणाऱ्या वारीची ओढ निर्माण झाली आणि त्यांनी त्यात सहभागी होण्यासाठी ‘आयटी दिंडी’ स्थापन केली असून त्यात सहभागी होणाऱ्या आयटी मित्रांची संख्या झपाट्याने वाढते आहे. त्या पार्श्वभूमीवर आयटीतील प्रमुख आयोजकांनी त्याला सामाजिक बांधिलकीचेही स्वरूप द्यायचे ठरवले आहे. दरवर्षी काही ना काही विधायक उपक्रमांतून वारीच्या काळामध्ये वारकऱ्यांना मदत दिली जाते. परंतु त्यानंतरही बऱ्याच प्रमाणात रक्कम शिल्लक राहत असे. हे आयटी मित्रांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी या वर्षापासून आश्रमशाळांच्या १५ मुलांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याद्वारे या सर्व गरीब, गरजू परंतु होतकरू व हुशार मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च हे आयटीतले वारकरी उचलणार आहेत. गेल्या वर्षी त्यांनी फासेपारध्यांच्या मुलांना गरजेच्या वस्तू भेट दिल्या होत्या.लाखो वारकरी जो आनंद घेत वारीमध्ये सहभागी होतात त्यात आपणही सहभागी व्हावे, या भावनेतून आयटी दिंडी दरवर्षी आळंदीहून निघते. दरवर्षी एक सामाजिक संदेश देण्याचा त्यांचा प्रयास असतो. यापूर्वी वृक्षसंवर्धन व मुलगी वाचवा हा संदेश दिलेला होता. या वर्षी स्वच्छता अभियानाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेचा आग्रह-विठोबाचा निग्रह असा संदेश असणाऱ्या टोप्या वारकऱ्यांना ते भेट देणार आहेत व स्वच्छतेचा जागर मांडणार आहेत. वारकऱ्यांमधील अनेक जण आपल्या मुलांना आयटीत नोकरी मिळावी, म्हणून आयटी दिंडीतील लोकांकडे त्यांचे बायोडाटा आणून देतात. त्यामुळे इंग्रजी संभाषणापासून ते नोकरी मिळवून देण्यापर्यंत हे सारे त्यांना मदत करतात. त्याशिवाय वारी या आपल्या सांस्कृतिक व आध्यात्मिक संचिताचे आॅनलाइन डॉक्युमेंटेशन व वारीतील वारकऱ्यांचा डाटाबेस करण्याची कल्पना मनात आहे, असे आयटी दिंडीचे प्रमुख समन्वयक प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.