शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

राजमाता अहिल्यादेवींसारख्या आदर्श व्यक्तिमत्त्वांना जातीमध्ये विभागणे दुर्दैवी : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:12 IST

मार्तंडदेव संस्थानच्या वतीने जेजुरीगडावर पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा १२ फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्याचबरोबर गड पायथ्यालगतच्या आद्य क्रांतिवीर ...

मार्तंडदेव संस्थानच्या वतीने जेजुरीगडावर पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा १२ फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्याचबरोबर गड पायथ्यालगतच्या आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्यांच्या लोकार्पण प्रसंगी पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार छत्रपती संभाजी राजे होते. होळकर संस्थानचे युवराज यशवंतराजे प्रमुख पाहुणे होते.

पवार म्हणाले, अहिल्यादेवी आजच्या पिढीच्या स्त्री शक्तीच्या प्रतीक आहेत. त्यांनी सत्तेचा वापर समाजाच्या उन्नतीसाठी केला. त्यांच्याच आदर्शानुसार आपण घेतलेला ५० टक्के महिलांचे आरक्षण आज आपण पाहत आहोत. देश, समाज पुढे न्यायचा असेल तर महिलांना सहभागी करून घ्यायलाच हवे. इंग्रजांशी सर्वप्रथम संघर्ष करून भारताच्या इतिहासात अजरामर झालेल्या आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक हे ही व्यक्तिमत्व समाज सुधारणेसाठी प्रेरक होते.

छत्रपती संभाजीराजे म्हणाले, अहिल्यादेवी यांनी बहुजनांची सेवा केली. बहुजनांच्या देवी-देवतांच्या मंदिरांचा तसेच तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार केला. यशवंतराजे म्हणाले एका महान राजमातेच्या वंशात माझा जन्म झाला याचा मला अभिमान आहे.

पुरंदरचे आमदार संजय जगताप म्हणाले, शुक्रवारी घडलेले प्रकरण हे पुरंदरसाठी अत्यंत लाजिरवाणे असून त्याचा निषेधच करायला हवा देशभरातील भाविक येथे समाधान मिळवण्यासाठी येतो, इथे कोणीही राजकारण करण्यासाठी येत नाही. मात्र राजमातेच्या पुतळ्याचे राजकारण अत्यंत दुर्दैवी आहे.

यावेळी माजी मंत्री महादेव जानकर, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांचे ही भाषण झाले. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार रोहित पवार, अशोक पवार, देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त प्रसाद शिंदे, जेजुरीच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे, उपनगराध्यक्ष गणेश निकुडे, माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई, माजी आमदार अशोक टेकवडे, संभाजी झेंडे, सुदाम इंगळे, डॉ. दिगंबर दुर्गाडे, माणिक झेंडे, प्रदीप पोमन, संदीप चिकणे आदी उपस्थित होते.

देवसंस्थानचे विश्वस्त संदीप जगताप व पंकज निकुडे यांनी स्वागत केले. शिवराज झगडे यांनी सूत्रसंचालन केले. विश्वस्त राजकुमार लोढा यांनी आभार मानले. मार्तंड देव संस्थानचे विश्वस्त तुषार सहाणे, ॲड. अशोक संकपाळ यांनी संयोजन केले. जेजुरी गडावरील पुतळ्याचे अनावरण व्यासपीठावरूनच रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने करण्यात आले.