शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

नवजात बालकांमधील अंधत्व रोखणे शक्य

By admin | Updated: April 24, 2017 04:59 IST

रेटिनोपथी आॅफ प्रीम्यॅच्युरीटी (आर.पी.ओ.) या लवकर जन्मलेल्या व जन्मत: कमी वजन असलेल्या बालकांमध्ये आढणाऱ्या

पुणे : रेटिनोपथी आॅफ प्रीम्यॅच्युरीटी (आर.पी.ओ.) या लवकर जन्मलेल्या व जन्मत: कमी वजन असलेल्या बालकांमध्ये आढणाऱ्या आजारामुळे दरवर्षी महाराष्ट्रात ७०० ते ८०० बालकांना अंधत्व येत असून, भारतात हे प्रमाण तीन ते साडेतीन हजार इतके आहे. या आजाराचे लवकर निदान झाल्यास व योग्य उपचार केल्यास बालकांना अंधत्व येण्यापासून वाचवता येऊ शकते. या बाबत लवकरच एक पथदर्शी उपक्रम राबविण्यात येणार असून त्याबाबतची माहिती एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालिका डॉ. सुचेता कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी एच. व्ही. देसाई हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कापसे उपस्थित होते. लवकर जन्मलेल्या व जन्मत: कमी वजन असलेल्या बालकांमध्ये आढळणाऱ्या रेटिनोपथी आॅफ प्रीम्यॅच्युरीटी (आर.पी.ओ.) या आजाराबाबत जनजागृती व प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र शासन, इंग्लंड मधील कुईन एलिझाबेथ डायमंड ज्युबली ट्रस्ट व पब्लिक हेल्थ फाउंडेशन आॅफ इंडिया या दोन संस्थांच्या मदतीने तसेच एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय तपासणी व उपचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्घाटन समारंभ २६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता औंध येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी बोलताना डॉ. सुचेता कुलकर्णी म्हणाल्या, लवकर जन्मलेल्या व जन्मत: कमी वजन असलेल्या बालकांना आर.पी.ओ. हा आजार होण्याची शक्यता असते. या आजारामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते. तसेच एकदा अंधत्व आले तर यावर कोणताही उपाय करता येत नाही. योग्य वेळी तपासणी व उपचार घेतल्यास सर्व बालकांना अंधत्वापासून वाचवता येऊ शकते. या आजाराचे योग्य वेळी निदान झाल्यास एका साध्या सोप्या लेझर उपचार पद्धतीद्वारे रेटिना हा पडदा सरकणे व त्यामुळे पुढे येणारे अंधत्व यांपासून नवजात बालकाला वाचवता येते. मात्र या आजाराचे निदान करण्यासाठी रेटिनाची विशेष तपासणी प्रशिक्षित आर.पी.ओ. तज्ज्ञांकडूनच करावी लागते. त्यामुळे योग्य वेळेत निदान केल्यास व योग्य उपचार केल्यास बालकाला अंधत्व येण्यापासून वाचवणे शक्य आहे. राजेश कापसे म्हणाले, या आजाराबाबत अनेकदा पालकांना माहिती नसते. प्रीमॅच्युअर बालक जन्मल्यानंतर एका महिन्याच्या आत निदान होऊन उपचार करणे गरजेचे असते. मात्र अनेक पालकांना या आजाराबाबत माहिती नसल्याने व वेळेत उपचार न झाल्याने अंधत्व येण्याची शक्यता असते. त्यामुळे या आजाराबात पालकांमध्ये जागृती असणे गरजेचे आहे.