शहरं
Join us  
Trending Stories
1
'...म्हणून झाली चेंगराचेंगरी, RCB च्या विजयोत्सवासाठी झाली होती ८ लाख लोकांची गर्दी'; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांचा मोठा दावा! 
2
सुधाकर बडगुजर भाजपात जाणार? चंद्रशेखर बावनकुळेंचे मोठे विधान म्हणाले, “पक्षाचे दरवाजे खुले”
3
ऑपरेशन सिंदूरच्या तीन दिवस आधी महुआ मोईत्रा विवाहबंधनात; माजी खासदारासोबत दुसरे लग्न...
4
ब्रिटानियासाठी अनेक दशकं बिस्किट्स बनवायची 'ही' कंपनी; आता होणार बंद होणार, कारण काय?
5
मोठी बातमी! भारतात तयार होणार राफेल लढाऊ विमान; दसॉल्ट आणि टाटा समुहाचा करार
6
शर्मिष्ठा पनोली हिला जामीन, कोलकाता हायकोर्टाने जामीन देताना घातल्या अशा अटी
7
डीजीसीएच्या अचानक छाप्याने खळबळ! तुर्कस्तानी एअरलाईन्सच्या विमानात स्फोटक पदार्थ सापडले
8
अयोध्येतील राम मंदिरामधील राम दरबाराचे फोटो समोर, अशी संपन्न झाली प्राणप्रतिष्ठापना
9
"बेबी, आता तुला त्रास नाही होणार...", अभिनेत्याचं कॅन्सरने निधन, अभिनेत्रीची भावुक पोस्ट
10
डीजेच्या आवाजामुळे मुलीला हार्ट अटॅक; रुग्णालयाचा निष्काळजीपणा, वडिलांसमोर तडफडून मृत्यू
11
पाकिस्तानात वाढली गाढवांची संख्या, चीन करतंय खरेदी! पुरुषांच्या लैंगिक आरोग्याशी आहे कनेक्शन
12
जुनी कर व्यवस्था निवडताय? सावधान! ITR भरताना 'या' चुका केल्यास थेट तुरुंगवास आणि २००% दंड!
13
कमनशिबी चहल! २ हॅटट्रिकसह पर्पल कॅपही जिंकलीये, पण ३ संघाकडून फायनल खेळून IPL ट्रॉफी नाही भेटली
14
तुमच्या खात्यात आले का पैसे? लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात
15
Swami Samartha: स्वामींच्या नित्य उपासनेसाठी रोज १० मिनिटं राखीव ठेवा, आयुष्यात मोठा बदल घडेल!
16
"लोक मरत होते अन् उत्सव सुरू होता, तेव्हा अल्लू अर्जुनला अटक केली, मग इथे का नाही?" बंगळुरू चेंगराचेंगरीवरून भाजपचा हल्लाबोल
17
'बीकेसी'च्या सेबी भवन परिसरात अजगरांचा सुळसुळाट, तब्बल १२ पिल्लं आढळली; नागरिकांमध्ये भीती
18
२ वर्षांत रिटर्नच्या नावावर शून्य, यावर्षीही १३% पर्यंत घसरला शेअर; अजूनही आहे का फायद्याची अपेक्षा?
19
मित्राच्या कर्जासाठी जामीनदार, हप्ते न भरल्याने फायनान्स कंपनीचा तगादा; तरुणाचा भयानक शेवट
20
काँग्रेस सोडून भाजपात सामील होणार? शशी थरुर यांचे सूचक विधान, म्हणाले...

संस्कृतीचे सेतुबंध समजून घेणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:16 IST

पुणे : आपला देश परंपरानिष्ठ आहे. लोकदैवताचे शक्तीस्थानात रूपांतर होणे ही प्रक्रिया समाजमनाला उर्जा देणारी आहे. यातूनच सांस्कृतिक बंध ...

पुणे : आपला देश परंपरानिष्ठ आहे. लोकदैवताचे शक्तीस्थानात रूपांतर होणे ही प्रक्रिया समाजमनाला उर्जा देणारी आहे. यातूनच सांस्कृतिक बंध निर्माण झाले आहेत. देशाचे सामाजिक, सांस्कृतिक विघटन टाळण्यासाठी संस्कृतीचे सेतुबंध समजून घेणे गरजेचे आहे, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.

स्वामी कृपा सभागृहात गुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने 'तिरुपती बालाजी' या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमात विश्वकर्मा पब्लिकेशनचे मनोहर सोनवणे आणि दीपक करंदीकर लिखित ‘तिरुपती’ या कादंबरीचे प्रकाशन जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संत साहित्याचे अभ्यासक अभय टिळक, प्रा. रमण चितळे, समीक्षक रुपाली शिंदे, प्रा. श्याम भुर्के, विश्वकर्मा पब्लिकेशनचे विशाल सोनी, गुरुकुल प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष कृष्णा राजाराम अष्टेकर, अध्यक्ष अशोक कामत आदी उपस्थित होते.

टिळक म्हणाले, ‘आपल्याकडे अवतार ही संकल्पना आहे. म्हणजेच पूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी एकतत्त्व काळाच्या टप्प्यावर पुन्हा पुन्हा अवतीर्ण होत राहणे असे आहे.’ महाराष्ट्रातला भक्तियोग कर्मयोगावर आधारित आहे. मराठी माणसानं स्वीकारलेली दैवतं पाहिल्यावर ते लगेच लक्षात येतं. या कारणांचा विचार केल्यास तिरुपती बालाजीपेक्षा पांडुरंग मराठी माणसानं का स्वीकारला, याचे उत्तर मिळते, असे भुर्के यांनी सांगितले.

‘ऐतिहासिक आणि पौराणिक कादंब-या हे मराठी भाषेचे वैभव आहे. ललित शैलीत या कहाण्या सामान्य माणसांपर्यंत पोचल्यास भाषिक-पौराणिक अनुबंध सुदृढ होतील, असे डॉ. कामत यांनी सांगितले. कार्यक्रमात राधिका चितळे यांना आदर्श गृहिणी पुरस्कार, उषा माडेकर आणि डॉ. सुनिता दिवाकर यांना आदर्श सहधर्मचारिणी पुरस्कार तर पंडित वसंत गाडगीळ यांना आदर्श समाजशिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. निवेदन प्रा. रवींद्र कोठावदे यांनी केले. डॉ. भालचंद्र कापरेकर यांनी आभार मानले.