शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

जिल्ह्यासाठी पाणी सोडणे अशक्य

By admin | Updated: April 26, 2016 01:31 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुण्याला जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे,

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुण्याला जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे, त्यामुळे आता जिल्ह्यातील इतर तालुक्यांसाठी धरणातून शहराच्या वाट्याचे पाणी सोडणे शक्य नसल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी सोमवारी स्पष्ट केले.महापालिकेच्या मुख्यसभेत शहराच्या पाणीप्रश्नावर नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना जगताप यांनी उत्तर दिले. त्यांनी सांगितले, ‘‘पुण्याच्या धरणांमध्ये दर वर्षी आॅगस्टअखेर २८ टीएमसी इतका पाणीसाठा असायचा. चालू वर्षी तो १४.५ टीएमसी इतकाच होता. सध्या धरणांमध्ये ५.५ टीएमसी पाणीसाठा आहे, शहराला जुलैपर्यंत साडेतीन टीएमसी पाणी लागणार आहे. मात्र, बाष्पीभवन व इतर बाबींचा विचार करून या धरणांमधून इतर कोणालाही शहराच्या वाट्याचे पाणी देणे शक्य नाही. इतरांना पाणी दिले, तर शहराला जुलैपर्यंत पाणी पुरू शकणार नाही.’’बांधकाम व इतर वापरांसाठी पिण्याचे पाणी वापरू नये, जीपीएस टँकरला बसविणे, लिकेज कमी करणे आदी लघुकालीन उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जात आहेत. त्याचबरोबर पर्वती ते लष्कर जलकेंद्रापर्यंत बंद पाइपलाइनचे काम हाती घेतले जाणार आहे. ग्रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे, २४ बाय ७ अंतर्गत मीटर योजना राबविणे आदी दीर्घकालीन उपाययोजना राबविल्या जाणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. महापौर प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘पुणेकरांनी त्यांच्या वाट्याचे ५० टक्के पाणी वापरले आहे व इतर तालुक्यांना ७५ टक्के पाणी दिले आहे. त्यामुळे आता पुणेकरांवर जास्तीची पाणीकपात लादता येणार नाही. दौंड, इंदापूरच्या हक्काचा ०.४२ पाणीसाठा आहे, तो त्यांना देण्यात यावा. मुळशीचे पाणी पुणे व पिंपरी-चिंचवडकरांना मिळावे यासाठी राज्यशासनाने पुढाकार घ्यावा.’’सभागृह नेते बंडू केमसे म्हणाले, ‘‘महापौर तुम्ही पुणेकरांच्या बाजूने घेतलेल्या निर्णयाबदद्ल तुमचे अभिनंदन. पालकमंत्री तुम्ही पुण्याचेच पालकमंंत्री आहात ना, असे मला तुम्हाला विचारायचे आहे.’’विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे म्हणाले, ‘‘पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार एक दिवसाआड पाणीपुरवठा मान्य केला. तरी ते दौंड, इंदापूरसाठी पाणी मागत आहेत, याचे आश्चर्य वाटते. नगरसेवकांना सातत्याने पाण्यासाठी झगडावे लागत आहे. साडेसतरा टीएमसी पाणी आपण वर्षभरात शेतीला देतो आहोत. या परिस्थितीत पालकमंत्री आमच्यावर सूड उगवित आहेत का, असे वाटत आहेत. अतिरिक्त पाणी देण्यास आमचा विरोध नाही.’’ (प्रतिनिधी)