शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

समाजात संवाद वाढवणे महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 03:18 IST

समाजातील संवाद आता फारच कमी होत असताना वाद हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे वादाबरोबरच सवांदही वाढणे फार महत्त्वाचे आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

पुणे : समाजातील संवाद आता फारच कमी होत असताना वाद हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे वादाबरोबरच सवांदही वाढणे फार महत्त्वाचे आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त स.प. महाविद्यालयाने आयोजित केलेल्या ‘लोकमान्य टिळक’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी महाविद्यालयाच्या वादसभेच्या वार्षिक कार्यक्रमांचे औपचारिक पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. तसेच सदानंद मोरे यांच्या हस्ते अभ्यासाव्यतिरिक्त कला, क्रीडा, व अन्य क्षेत्रांतील उत्तम कामगिरीबद्दल महाविद्यालयातील आणि वादसभेतील यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या वेळी प्राचार्य दिलीप शेठ, वादसभा प्रमुख प्रा. दीपक कर्वे, प्रा. अनुजा राजमाचीकर, प्रा. वैजयंती बेलसरे आदी उपस्थित होते.सदानंद मोरे म्हणाले, ‘‘लोकमान्य टिळक हे वादप्रिय व्यक्ती होते. त्यांनी आयुष्यात वादविवादाबरोबरच संवादालाही महत्त्व दिले होते. पूर्वीच्या काळी वादपरंपरा असल्याने माणसाची विचार करण्याची पद्धत वाद, प्रतिवाद आणि सवांद या घटकांत मोडली जात होती; पण आता संवादाचे महत्त्व कमी होत आहे. टिळक सशस्त्र क्रांतीचा पाठपुरावा करीत नव्हते. ते परिस्थतीचा अंदाज घेऊन प्रत्येक गोष्टीचे नियोजन करीत असत. राजकारणात त्या काळी टिळकांनी अनेक बदल घडवून आणले. आधुनिक काळात कामगार ही शक्ती निर्माण होत आहे; पण त्या काळी कामगार चळवळीची पहिली सुरुवात टिळकांनी केली, तर त्यांच्या मृत्यूनंतर एका महिन्यात कामगार संघटनेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली होती. भारतात कामगार चळवळ जास्त काळ टिकली नाही, कारण जातींचे आणि ऐतिहासिक युतींचे प्रश्न पुढे येत होते. टिळकांनी समाजाला एकत्र आणण्यासाठी धार्मिक गोष्टींचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. स्वराज्याच्या आड कुठलीही गोष्ट आली तरी मी थांबणार नाही, असे स्वातंत्र्यध्येय टिळकांनी त्या काळी ठेवले होते.’’