शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

समाजात संवाद वाढवणे महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 03:18 IST

समाजातील संवाद आता फारच कमी होत असताना वाद हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे वादाबरोबरच सवांदही वाढणे फार महत्त्वाचे आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

पुणे : समाजातील संवाद आता फारच कमी होत असताना वाद हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे वादाबरोबरच सवांदही वाढणे फार महत्त्वाचे आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त स.प. महाविद्यालयाने आयोजित केलेल्या ‘लोकमान्य टिळक’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी महाविद्यालयाच्या वादसभेच्या वार्षिक कार्यक्रमांचे औपचारिक पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. तसेच सदानंद मोरे यांच्या हस्ते अभ्यासाव्यतिरिक्त कला, क्रीडा, व अन्य क्षेत्रांतील उत्तम कामगिरीबद्दल महाविद्यालयातील आणि वादसभेतील यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या वेळी प्राचार्य दिलीप शेठ, वादसभा प्रमुख प्रा. दीपक कर्वे, प्रा. अनुजा राजमाचीकर, प्रा. वैजयंती बेलसरे आदी उपस्थित होते.सदानंद मोरे म्हणाले, ‘‘लोकमान्य टिळक हे वादप्रिय व्यक्ती होते. त्यांनी आयुष्यात वादविवादाबरोबरच संवादालाही महत्त्व दिले होते. पूर्वीच्या काळी वादपरंपरा असल्याने माणसाची विचार करण्याची पद्धत वाद, प्रतिवाद आणि सवांद या घटकांत मोडली जात होती; पण आता संवादाचे महत्त्व कमी होत आहे. टिळक सशस्त्र क्रांतीचा पाठपुरावा करीत नव्हते. ते परिस्थतीचा अंदाज घेऊन प्रत्येक गोष्टीचे नियोजन करीत असत. राजकारणात त्या काळी टिळकांनी अनेक बदल घडवून आणले. आधुनिक काळात कामगार ही शक्ती निर्माण होत आहे; पण त्या काळी कामगार चळवळीची पहिली सुरुवात टिळकांनी केली, तर त्यांच्या मृत्यूनंतर एका महिन्यात कामगार संघटनेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली होती. भारतात कामगार चळवळ जास्त काळ टिकली नाही, कारण जातींचे आणि ऐतिहासिक युतींचे प्रश्न पुढे येत होते. टिळकांनी समाजाला एकत्र आणण्यासाठी धार्मिक गोष्टींचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. स्वराज्याच्या आड कुठलीही गोष्ट आली तरी मी थांबणार नाही, असे स्वातंत्र्यध्येय टिळकांनी त्या काळी ठेवले होते.’’