शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

उघड्यावरच्या खाद्यपदार्थांमधून टायफॉईडला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:15 IST

पुणे : पावसाळ्यात दूषित अन्न, पाण्यातून टायफाईड म्हणजे विषमज्वर होण्याची शक्यता वाढते. विशेषत:, हातगाडीवरचे पदार्थ खाताना बरेचदा स्वच्छता पाळली ...

पुणे : पावसाळ्यात दूषित अन्न, पाण्यातून टायफाईड म्हणजे विषमज्वर होण्याची शक्यता वाढते. विशेषत:, हातगाडीवरचे पदार्थ खाताना बरेचदा स्वच्छता पाळली जात नाही. पाणीपुरी, वडापाव असे उघड्यावरचे पदार्थ खाताना नागरिकांनी जास्त दक्ष राहायला हवे, अन्यथा टायफॉईडला आमंत्रण मिळेल, असा इशारा डॉक्टरांकडून दिला जात आहे.

अस्वच्छ वातावरणात सालमोनेला टायफी हा जीवाणू विकसित होतो. उघडे अन्न किंवा पाण्यात जीवाणू मिसळल्यास ते दूषित होते. अन्न किंवा पाण्यातून जीवाणू रक्तप्रवाहात प्रवेश करतो आणि त्यातून विषमज्वराची लागण होते. टायफी हे जीवाणू रुग्णाच्या मूत्रामधून किंवा विष्ठेतून संक्रमित होण्याचीही शक्यता असते. टायफॉईडची अर्थात विषमज्वराची लक्षणे लागण झाल्यानंतर १ ते १४ दिवसांनी दिसू लागतात.

कोरोना काळामध्ये बऱ्याच विषाणूजन्य आणि जीवाणूजन्य आजारांचे प्रमाण कमी झाले आहे. मागील वर्षी कोरोनाची साथ आल्यानंतर लॉकडाऊन जाहीर झाले. सर्व व्यवहार बंद झाल्याने घरातून बाहेर पडणेही बंद झाले. बाहेरचे खाणे, हॉटेलिंग बंद झाल्यामुळे आजारांचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे मागील पावसाळ्यात टायफॉईडच्या रुग्णांचे प्रमाण अत्यल्प होते. आता पावसाळा सुरु असताना सर्व व्यवहारही सुरळीत झाले आहेत. वर्षभराने बाहेर पडता येत असल्याने हॉटेलिंग, चाट, वडा असे पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, अस्वच्छतेचा आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी काळजी घेण्यास सांगितले जात आहे.

----------------

पावसाळ्यात दूषित पाणी आणि अन्नातून टायफॉईड होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे या कालावधीत स्वच्छ, उकळलेले, ताजे पाणी प्यावे. ताजे अन्नपदार्थ खावेत. शक्यतो बाहेर दुधाचे पदार्थ खाणे टाळावे. कोरोनाकाळात टायफॉईडचे प्रमाण कमी झाले असले तरी यंदाच्या पावसाळ्यात जास्त काळजी घेणे आवश्यक आहे.

- डॉ. सुह्रद देसाई, जनरल फिजिशियन

------------------

लक्षणे :

ताप

पोटदुखी

जुलाब

थकवा

भूक कमी होणे

डोकेदुखी, अंगदुखी

----------------------

जिल्हा रुग्णालयातील टायफॉईड रुग्णांची आकडेवारी :

जून - ०

जुलै - ५

आॅगस्ट - १