शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

‘उज्ज्वला’ योजनेत वेश्याच झाल्यात अदृश्य

By admin | Updated: July 15, 2014 03:59 IST

एकविसाव्या शतकात स्त्री-पुरुष समानतेचे, माणुसकीचे गोडवे गाणाऱ्या भारतात मात्र आजही वेश्या ‘अदृश्य’च असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे

हिनाकौसर खान-पिंजार, पुणेएकविसाव्या शतकात स्त्री-पुरुष समानतेचे, माणुसकीचे गोडवे गाणाऱ्या भारतात मात्र आजही वेश्या ‘अदृश्य’च असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे. महिला व बालकांची अनैतिक वाहतूक व शरीरविक्री-व्यापार होऊ नये यासाठी २००७ मध्ये केंद्र शासनाने ‘उज्ज्वला’ ही योजना आणली. त्यासाठी दर वर्षी भरमसाठ निधीची तरतूद होते. राज्यांना हा निधीही दिलाही जात आहे. मात्र, गेल्या ६ वर्षांपासून ही योजना राबविणाऱ्या केंद्र शासनाकडे देशात किती महिला वेश्या व्यवसायात आहेत, याची माहितीच नसल्याचा प्रकार समोर आला आहे. जर देहविक्री करणाऱ्या महिलांची संख्याच उपलब्ध नाही, तर कोणत्या निकषांवर केंद्र राज्यांना निधी देते व तो कसा जिरवला जातोय, याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. अवखळ वयातील मुली, तरुणींना पैशांचे आमिष दाखवून, फसवून त्यांना शरीरविक्रीच्या दलदलीत ढकलले जात असल्याची प्रकरणे सारखी समोर समोर येत असतात. एका राज्यातील मुलींना दुसऱ्या राज्यात, तर काही वेळा नजीकच्या गरीब देशांतून या मुलींचा व्यापार होतो, हे आता उघड सत्य आहे. मात्र, त्यांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार असताना शासनाकडून त्यांच्या सन्मानाने जगण्याच्या हक्काची अवहेलना होत आहे. पुण्यातील विहार दुर्वे यांनी माहिती अधिकारात ही बाब उघडकीस आणली आहे.वेश्याव्यवसायापासून महिलांना रोखण्यासाठी अनैेतिक मानवी वाहतुकीला आळा, या व्यवसायातून महिलांची सुटका व त्यानंतर त्यांचे पुनर्वसन करता यावे यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने २००७मध्ये ‘उज्ज्वला’ नावाची पथदर्शी योजना आणली. या योजनेअंतर्गत केंद्राने सहा वर्षांत विविध राज्यांसाठी ५ हजार १३६ कोटी ६९ लाख रुपये खर्च केले आहेत.२००९ ते २०१४ या कालावधीत देशात वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला किती, किती मृत पावल्या, वयोगटानुसार मृत मुली-महिलांची संख्या काय, किती जणींना शासकीय रोजगार दिला, घरे पुरवली, त्यांच्या पुनर्वसनासाठी किती प्रयत्न झाले व किती निधी खर्च झाला, याची माहिती दुर्वे यांनी मागविली होती. ती माहितीच उपलब्ध नसल्याचे विभागाने दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे ज्यांची गणतीच नाही, त्यांच्या मृत्यूची नोंद वा मोजदाद होण्याचा प्रश्नच नसल्याचे शासनाच्या या कारभारावरून स्पष्ट होत आहे. यानंतर दुर्वे यांनी राज्याकडेही याबाबत माहिती अधिकारात विचारणा केली होती. मात्र, तिथेही त्यांच्या हाती काहीही लागले नाही.