शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

‘आयआयई’ वादाच्या भोव-यात, अनियमिततेबाबत धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:28 IST

जे. पी. नाईक यांनी स्थापन केलेली भारतीय शैक्षणिक संस्था (आयआयई) वादाच्या भोव-यात सापडली आहे. संस्थेतील अनियमिततेबाबत धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

पुणे : जे. पी. नाईक यांनी स्थापन केलेली भारतीय शैक्षणिक संस्था (आयआयई) वादाच्या भोव-यात सापडली आहे. संस्थेतील अनियमिततेबाबत धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच संस्थेच्या अध्यक्षा अरुणा गिरी आणि डॉ. सदानंद मोरे यांच्यासह चार विश्वस्त मंडळातील सदस्यांनीही काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिला आहे. संस्थेतील कामकाजाला कंटाळून त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. दरम्यान, मंगळवारी संस्थेचे नवे अध्यक्ष म्हणून डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे निवड करण्यात आली.जे.पी. नाईक व चित्रा नाईक यांनी शिक्षणक्षेत्राला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने ‘आयआयई’च्या माध्यमातून मोठी चळवळ उभी केली. मात्र, सध्या या संस्थेत अंतर्गत वाद सुरू झाले आहेत. डॉ. मुणगेकर यांनी मंगळवारी याविषयी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.ते म्हणाले, की गिरी यांनी दीड महिन्यापूर्वी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर १५ दिवसांतच उपाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, विश्वस्त मंडळाचे सदस्य डॉ. सुहास पळशीकर, धनवंती हर्डीकर व विनया मालती हरी यांनी राजीनामा दिला आहे. संस्थेच्या कामकाजाविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संस्थेच्या घटनेनुसार विश्वस्त मंडळामध्ये किमान सात सदस्य कार्यरत असणे अपेक्षित आहे. पाच जणांनी राजीनामा दिल्याने केवळ पाचच सदस्य उरले होते. त्यामुळे मंगळवारी विश्वस्त मंडळाच्या बैठकीत संस्थेच्या आजीव सदस्यांमधील तीन व सन्माननीय सदस्यांमधील दोघांची मंडळावर निवड करण्यात आली. सुचेता कोरगावकर, जयंत कळके, शरद जावडेकर, दिलीप नाचणे वप्रा. आर. एस. देशपांडे अशी त्यांची नावे आहेत.या बैठकीत डॉ. मुणगेकर यांची अध्यक्ष म्हणून, तर प्रा. देशपांडे यांची उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. तसेच संस्थेतील संचालक प्रा. मर्झबान जाल यांची वर्तणूक योग्य नसल्याचा ठपका मंडळाने ठेवला आहे. त्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असून, त्यांना यापुढे संस्थेच्या आवारातही प्रवेश दिला जाणार नाही. त्यांच्या चौकशीसाठी समितीही नेमण्यात आली आहे.जाल यांच्या जागी प्रा. बी. एन. कांबळे यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे, असे मुणगेकर यांनी सांगितले. दरम्यान, जाल यांनी आपल्यावरील आरोप फेटाळूनलावून हा निर्णय अमान्य असल्याचे सांगितले. तसेच, विश्वस्तमंडळच बेकायदेशीर असून अनेक अनियमित गोष्टी संस्थेत सुरू असल्याचे स्पष्ट केले.>स्मृतिचिन्हे, पुरस्कार परत कराकाही दिवसांपूर्वी अरुणा गिरी व त्यांच्या मुलाने संस्थेत येऊन तेथील नाईक यांची काही स्मृतिचिन्हे, पुरस्कार जबरदस्तीने घरी नेले आहेत. ही कृती अत्यंत चुकीची असून त्यांच्याविरोधात पोलिसांतही तक्रार करण्यात आली आहे. विश्वस्त मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार गिरी यांना घरी नेलेले पुरस्कार कोणत्याही अटीशिवाय परत करण्याचे पत्राद्वारे कळविले जाणार आहे, अशी माहिती मुणगेकर यांनी दिली.कोणत्याही वैयक्तिक व्यक्तीच्या विरोधात तक्रार नाही. संस्थेच्या एकूणच कामकाजाच्या पद्धतीला कंटाळून राजीनामा दिला आहे. अशा स्थितीत काम करणे अशक्य होते. - डॉ. सदानंद मोरेसंस्थेतील काही जुन्या मुद्द्यांवर वाद आहेत. विश्वस्त मंडळाच्या बैठकीतही त्यावरून मतभेद होते. या गोंधळाच्या स्थितीतकाम करणे तसेच संस्थेमध्ये पूर्णवेळ देणेही शक्य नसल्याने राजीनामा दिला आहे. - विनया मालती हरी>आयसीएसएसआरसंस्थेची चौकशी सुरूइंडियन कौन्सिल आॅफ सोशल सायन्स रीसर्च (आयसीएसएसआर) या संस्थेकडून आयआयईमध्ये अनियमितता असल्याबाबत तक्रार करण्यात आली आहे. त्यानुसार सह धर्मादाय आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. संस्थेचे कामकाज, सदस्यांची निवड, बैठका यांसह विविध मुद्द्यांवर चौकशी सुरू आहे.- कैलास महाले, निरीक्षक, सह धर्मादाय आयुक्त कार्यालय