शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
5
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
6
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
7
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
8
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
9
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
10
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
11
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
12
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
13
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
14
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
15
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
16
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
18
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
19
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
20
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी

‘आयआयई’ वादाच्या भोव-यात, अनियमिततेबाबत धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:28 IST

जे. पी. नाईक यांनी स्थापन केलेली भारतीय शैक्षणिक संस्था (आयआयई) वादाच्या भोव-यात सापडली आहे. संस्थेतील अनियमिततेबाबत धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

पुणे : जे. पी. नाईक यांनी स्थापन केलेली भारतीय शैक्षणिक संस्था (आयआयई) वादाच्या भोव-यात सापडली आहे. संस्थेतील अनियमिततेबाबत धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच संस्थेच्या अध्यक्षा अरुणा गिरी आणि डॉ. सदानंद मोरे यांच्यासह चार विश्वस्त मंडळातील सदस्यांनीही काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिला आहे. संस्थेतील कामकाजाला कंटाळून त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. दरम्यान, मंगळवारी संस्थेचे नवे अध्यक्ष म्हणून डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे निवड करण्यात आली.जे.पी. नाईक व चित्रा नाईक यांनी शिक्षणक्षेत्राला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने ‘आयआयई’च्या माध्यमातून मोठी चळवळ उभी केली. मात्र, सध्या या संस्थेत अंतर्गत वाद सुरू झाले आहेत. डॉ. मुणगेकर यांनी मंगळवारी याविषयी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.ते म्हणाले, की गिरी यांनी दीड महिन्यापूर्वी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर १५ दिवसांतच उपाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, विश्वस्त मंडळाचे सदस्य डॉ. सुहास पळशीकर, धनवंती हर्डीकर व विनया मालती हरी यांनी राजीनामा दिला आहे. संस्थेच्या कामकाजाविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संस्थेच्या घटनेनुसार विश्वस्त मंडळामध्ये किमान सात सदस्य कार्यरत असणे अपेक्षित आहे. पाच जणांनी राजीनामा दिल्याने केवळ पाचच सदस्य उरले होते. त्यामुळे मंगळवारी विश्वस्त मंडळाच्या बैठकीत संस्थेच्या आजीव सदस्यांमधील तीन व सन्माननीय सदस्यांमधील दोघांची मंडळावर निवड करण्यात आली. सुचेता कोरगावकर, जयंत कळके, शरद जावडेकर, दिलीप नाचणे वप्रा. आर. एस. देशपांडे अशी त्यांची नावे आहेत.या बैठकीत डॉ. मुणगेकर यांची अध्यक्ष म्हणून, तर प्रा. देशपांडे यांची उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. तसेच संस्थेतील संचालक प्रा. मर्झबान जाल यांची वर्तणूक योग्य नसल्याचा ठपका मंडळाने ठेवला आहे. त्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असून, त्यांना यापुढे संस्थेच्या आवारातही प्रवेश दिला जाणार नाही. त्यांच्या चौकशीसाठी समितीही नेमण्यात आली आहे.जाल यांच्या जागी प्रा. बी. एन. कांबळे यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे, असे मुणगेकर यांनी सांगितले. दरम्यान, जाल यांनी आपल्यावरील आरोप फेटाळूनलावून हा निर्णय अमान्य असल्याचे सांगितले. तसेच, विश्वस्तमंडळच बेकायदेशीर असून अनेक अनियमित गोष्टी संस्थेत सुरू असल्याचे स्पष्ट केले.>स्मृतिचिन्हे, पुरस्कार परत कराकाही दिवसांपूर्वी अरुणा गिरी व त्यांच्या मुलाने संस्थेत येऊन तेथील नाईक यांची काही स्मृतिचिन्हे, पुरस्कार जबरदस्तीने घरी नेले आहेत. ही कृती अत्यंत चुकीची असून त्यांच्याविरोधात पोलिसांतही तक्रार करण्यात आली आहे. विश्वस्त मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार गिरी यांना घरी नेलेले पुरस्कार कोणत्याही अटीशिवाय परत करण्याचे पत्राद्वारे कळविले जाणार आहे, अशी माहिती मुणगेकर यांनी दिली.कोणत्याही वैयक्तिक व्यक्तीच्या विरोधात तक्रार नाही. संस्थेच्या एकूणच कामकाजाच्या पद्धतीला कंटाळून राजीनामा दिला आहे. अशा स्थितीत काम करणे अशक्य होते. - डॉ. सदानंद मोरेसंस्थेतील काही जुन्या मुद्द्यांवर वाद आहेत. विश्वस्त मंडळाच्या बैठकीतही त्यावरून मतभेद होते. या गोंधळाच्या स्थितीतकाम करणे तसेच संस्थेमध्ये पूर्णवेळ देणेही शक्य नसल्याने राजीनामा दिला आहे. - विनया मालती हरी>आयसीएसएसआरसंस्थेची चौकशी सुरूइंडियन कौन्सिल आॅफ सोशल सायन्स रीसर्च (आयसीएसएसआर) या संस्थेकडून आयआयईमध्ये अनियमितता असल्याबाबत तक्रार करण्यात आली आहे. त्यानुसार सह धर्मादाय आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. संस्थेचे कामकाज, सदस्यांची निवड, बैठका यांसह विविध मुद्द्यांवर चौकशी सुरू आहे.- कैलास महाले, निरीक्षक, सह धर्मादाय आयुक्त कार्यालय