शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्तांचा लागेना तपास

By admin | Updated: January 9, 2017 03:11 IST

पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत परिमंडल तीनच्या हद्दीत तरूण, तरूणी बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. महिन्यात किमान तीन ते चार अल्पवयीन

पिंपरी : पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत परिमंडल तीनच्या हद्दीत तरूण, तरूणी बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. महिन्यात किमान तीन ते  चार अल्पवयीन मुलांच्या अपहरणाच्या घटना घडू लागल्या आहेत. बेपत्ता व्यक्तींचा पोलिसांकडून तपास लागण्याचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे. पिंपळे गुरव परिसरातून १६ वर्षांची युवती बेपत्ता होऊन वर्ष उलटले, तरीही काही थांगपत्ता लागला नाही. कुटुंबीयांनी याबाबत पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त यांना भेटून आपली व्यथा मांडली. सांगवी पोलिसांकडून मात्र त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही, अशी नातेवाइकांची तक्रार आहे. याबाबत पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांच्याकडे संबंधित संशयित आरोपीवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. स्वप्नाली मनोज मल्लाव (वय १६, रा. काची चाळ, दापोडी) असे त्या बेपत्ता युवतीचे नाव आहे. स्वप्नाली ही दापोडीमधील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शिक्षण घेत होती. स्वप्नालीचे काही बरे-वाईट झाले नाही ना, अशी भीती नातेवाईक व्यक्त करत आहेत.कोणाचा तरी फोन आला अन् बाहेर गेलेला विनायक महिंद्रा खांडेकर हा १७ वर्षांचा तरूण १ जानेवारीला संत तुकारामनगर येथील घरातून बाहेर पडला असून अद्याप तो परतला नाही. त्याचे कोणीतरी अपहरण केले असावे, असा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला आहे. संतोष सिद्धराम धोत्रे हा गणेशनगर, पिंपळे निलखमधून बेपत्ता झाला. १६ डिसेंबर २०१६ ला बेपत्ता झालेला संतोष अद्याप घरी परतला नाही. अशा बेपत्ता होण्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. मोबाइल लोकेशन, तसेच कॉल रेकॉर्डच्या आधारे अशा बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणे शक्य असताना, पोलिसांकडून मात्र तातडीने हालचाली होत नाहीत. (प्रतिनिधी)संशय व्यक्त केल्यानंतरही पोलिसांची उदासीनता फूस लावून पळवून नेणाऱ्यांवर नातेवाइकांनी संशय व्यक्त केल्यानंतरही पोलीस संशयितांची कसून चौकशी करत नाहीत. संशयित व्यक्तींची नावे दिल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी करणे अपेक्षित आहे. त्यांच्या मोबाइलचे कॉल रेकॉर्ड तपासल्यास अशा बेपत्ता अथवा अपहरण केलेल्या व्यक्तींचा शोध घेता येऊ शकतो. पोलिसांकडून अशा घटनांची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने वेळीच बेपत्ता व्यक्तींचा तपास लागत नाही. अशा व्यक्तींचा घातपात घडवून आणल्याचे नंतर निष्पन्न होते. वेळीच पोलिसांनी गंभीर दखल घेतल्यास अशा घटनांचा उलगडा होईल. संकटात असलेल्या व्यक्तीला मदत मिळू शकेल, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.