शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

बेपत्तांचा लागेना तपास

By admin | Updated: January 9, 2017 03:11 IST

पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत परिमंडल तीनच्या हद्दीत तरूण, तरूणी बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. महिन्यात किमान तीन ते चार अल्पवयीन

पिंपरी : पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत परिमंडल तीनच्या हद्दीत तरूण, तरूणी बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. महिन्यात किमान तीन ते  चार अल्पवयीन मुलांच्या अपहरणाच्या घटना घडू लागल्या आहेत. बेपत्ता व्यक्तींचा पोलिसांकडून तपास लागण्याचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे. पिंपळे गुरव परिसरातून १६ वर्षांची युवती बेपत्ता होऊन वर्ष उलटले, तरीही काही थांगपत्ता लागला नाही. कुटुंबीयांनी याबाबत पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त यांना भेटून आपली व्यथा मांडली. सांगवी पोलिसांकडून मात्र त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही, अशी नातेवाइकांची तक्रार आहे. याबाबत पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांच्याकडे संबंधित संशयित आरोपीवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. स्वप्नाली मनोज मल्लाव (वय १६, रा. काची चाळ, दापोडी) असे त्या बेपत्ता युवतीचे नाव आहे. स्वप्नाली ही दापोडीमधील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शिक्षण घेत होती. स्वप्नालीचे काही बरे-वाईट झाले नाही ना, अशी भीती नातेवाईक व्यक्त करत आहेत.कोणाचा तरी फोन आला अन् बाहेर गेलेला विनायक महिंद्रा खांडेकर हा १७ वर्षांचा तरूण १ जानेवारीला संत तुकारामनगर येथील घरातून बाहेर पडला असून अद्याप तो परतला नाही. त्याचे कोणीतरी अपहरण केले असावे, असा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला आहे. संतोष सिद्धराम धोत्रे हा गणेशनगर, पिंपळे निलखमधून बेपत्ता झाला. १६ डिसेंबर २०१६ ला बेपत्ता झालेला संतोष अद्याप घरी परतला नाही. अशा बेपत्ता होण्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. मोबाइल लोकेशन, तसेच कॉल रेकॉर्डच्या आधारे अशा बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणे शक्य असताना, पोलिसांकडून मात्र तातडीने हालचाली होत नाहीत. (प्रतिनिधी)संशय व्यक्त केल्यानंतरही पोलिसांची उदासीनता फूस लावून पळवून नेणाऱ्यांवर नातेवाइकांनी संशय व्यक्त केल्यानंतरही पोलीस संशयितांची कसून चौकशी करत नाहीत. संशयित व्यक्तींची नावे दिल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी करणे अपेक्षित आहे. त्यांच्या मोबाइलचे कॉल रेकॉर्ड तपासल्यास अशा बेपत्ता अथवा अपहरण केलेल्या व्यक्तींचा शोध घेता येऊ शकतो. पोलिसांकडून अशा घटनांची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने वेळीच बेपत्ता व्यक्तींचा तपास लागत नाही. अशा व्यक्तींचा घातपात घडवून आणल्याचे नंतर निष्पन्न होते. वेळीच पोलिसांनी गंभीर दखल घेतल्यास अशा घटनांचा उलगडा होईल. संकटात असलेल्या व्यक्तीला मदत मिळू शकेल, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.