शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

बेपत्तांचा लागेना तपास

By admin | Updated: January 9, 2017 03:11 IST

पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत परिमंडल तीनच्या हद्दीत तरूण, तरूणी बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. महिन्यात किमान तीन ते चार अल्पवयीन

पिंपरी : पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत परिमंडल तीनच्या हद्दीत तरूण, तरूणी बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. महिन्यात किमान तीन ते  चार अल्पवयीन मुलांच्या अपहरणाच्या घटना घडू लागल्या आहेत. बेपत्ता व्यक्तींचा पोलिसांकडून तपास लागण्याचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे. पिंपळे गुरव परिसरातून १६ वर्षांची युवती बेपत्ता होऊन वर्ष उलटले, तरीही काही थांगपत्ता लागला नाही. कुटुंबीयांनी याबाबत पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त यांना भेटून आपली व्यथा मांडली. सांगवी पोलिसांकडून मात्र त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही, अशी नातेवाइकांची तक्रार आहे. याबाबत पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांच्याकडे संबंधित संशयित आरोपीवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. स्वप्नाली मनोज मल्लाव (वय १६, रा. काची चाळ, दापोडी) असे त्या बेपत्ता युवतीचे नाव आहे. स्वप्नाली ही दापोडीमधील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शिक्षण घेत होती. स्वप्नालीचे काही बरे-वाईट झाले नाही ना, अशी भीती नातेवाईक व्यक्त करत आहेत.कोणाचा तरी फोन आला अन् बाहेर गेलेला विनायक महिंद्रा खांडेकर हा १७ वर्षांचा तरूण १ जानेवारीला संत तुकारामनगर येथील घरातून बाहेर पडला असून अद्याप तो परतला नाही. त्याचे कोणीतरी अपहरण केले असावे, असा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला आहे. संतोष सिद्धराम धोत्रे हा गणेशनगर, पिंपळे निलखमधून बेपत्ता झाला. १६ डिसेंबर २०१६ ला बेपत्ता झालेला संतोष अद्याप घरी परतला नाही. अशा बेपत्ता होण्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. मोबाइल लोकेशन, तसेच कॉल रेकॉर्डच्या आधारे अशा बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणे शक्य असताना, पोलिसांकडून मात्र तातडीने हालचाली होत नाहीत. (प्रतिनिधी)संशय व्यक्त केल्यानंतरही पोलिसांची उदासीनता फूस लावून पळवून नेणाऱ्यांवर नातेवाइकांनी संशय व्यक्त केल्यानंतरही पोलीस संशयितांची कसून चौकशी करत नाहीत. संशयित व्यक्तींची नावे दिल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी करणे अपेक्षित आहे. त्यांच्या मोबाइलचे कॉल रेकॉर्ड तपासल्यास अशा बेपत्ता अथवा अपहरण केलेल्या व्यक्तींचा शोध घेता येऊ शकतो. पोलिसांकडून अशा घटनांची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने वेळीच बेपत्ता व्यक्तींचा तपास लागत नाही. अशा व्यक्तींचा घातपात घडवून आणल्याचे नंतर निष्पन्न होते. वेळीच पोलिसांनी गंभीर दखल घेतल्यास अशा घटनांचा उलगडा होईल. संकटात असलेल्या व्यक्तीला मदत मिळू शकेल, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.