शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

पणन राज्यमंत्र्यांची मध्यस्थी निष्फळ

By admin | Updated: October 6, 2016 04:05 IST

शेतमालाला हमीभाव व पुर्ण कर्जमुक्तीच्या मागण्यांसाठी डॉ. बाबा आढाव यांनी सुरू केलेले उपोषण मागे घ्यावे, यासाठी पणन राज्यमंत्री सदाभाऊ यांनी केलेली मध्यस्थी निष्फळ ठरली.

पुणे : शेतमालाला हमीभाव व पुर्ण कर्जमुक्तीच्या मागण्यांसाठी डॉ. बाबा आढाव यांनी सुरू केलेले उपोषण मागे घ्यावे, यासाठी पणन राज्यमंत्री सदाभाऊ यांनी केलेली मध्यस्थी निष्फळ ठरली. मागण्यांना किमान तत्वत: मान्यता द्यावी, असा आग्रह डॉ. आढाव यांनी धरला होता. मात्र खोत यांना याबाबत ठोस आश्वासन न दिल्याने उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.डॉ. आढाव यांनी महात्मा गांधी जयंतीपासून उपोषण सुरू केले आहे. बुधवारी उपोषणाच्या चौथ्या दिवशी पणन राज्यमंत्री खोत यांनी उपोषणस्थळी जावून त्यांची भेट घेतली. यावेळी कृषी आयुक्त विकास देशमुख, बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे, उपसभापती भुषण तुपे, पुना मर्चंटचे चेंबरचे अध्यक्ष प्रविण चोरबेले व पदाधिकारी उपस्थित होते.दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीनेही उपोषणाचा इशारा दिला आहे. या मध्ये भुसार, भाजीपाला,फळ बाजार उपोषण सुरु असे पर्यंत बंद राहील. आंदोलनाची व्याप्ती वाढल्यास रिक्षाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल. समितीचे निमंत्रक नितीन पवार,हमाल पंचायतीचे उपाध्यक्ष गोरख मेंगडे,सरचिटणीस नवनाथ बिनवडे, नितीन जामगे, राजेंद्र चोरगे आदी उपस्थित होते.४खोत म्हणाले, मागण्यांबाबत दि. १९ आॅक्टोबर रोजी मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये स्वामीनाथन आयोगाबाबतही चर्चा करण्यात येईल. तसेच केंद्रीय कृषीमंत्री यांच्यासमवेतही बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू. तोपर्यंत उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती खोत यांनी केली. यावर डॉ. आढाव यांनी मागण्या तत्वत: मान्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. अनेक वर्षांपासूनचा हा प्रश्न आहे. अनेक बैठका होवूनही अद्याप निर्णय झालेला नाही. कर्जमाफी आणि हमीभावाबाबत ठोस निर्णय घेणे अपेक्षित आहे. पण तसे आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असे डॉ. आढाव यांनी स्पष्ट केले.