शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

जिल्हा परिषदेच्या ४१० शाळांमध्येच इंटरनेट सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:09 IST

पुणे: कोरोनामुळे सध्या केवळ ऑनलाईन शिक्षणावर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, मोबाईल व इंटरनेटचा अभाव आणि सतत खंडित होणारा ...

पुणे: कोरोनामुळे सध्या केवळ ऑनलाईन शिक्षणावर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, मोबाईल व इंटरनेटचा अभाव आणि सतत खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम झाला आहे. त्यातही जिल्ह्यातील केवळ ४१० जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांना मोबाईलवर अवलंबून राहावे लागत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे शाळांकडून ऑनलाईन वर्गांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. परंतु, ग्रामीण व दुर्गम भागातील शाळामधील काही विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अ‍ॅड्रॉईड मोबाईलच नाही. तसेच मोबाईल आहेत तर वीज नाही, अशी परिस्थिती काही भागात आहे. त्यातही जिल्ह्यातील एकूण १ हजार २६२ शाळांपैकी १ हजार ३३ शाळांमध्येच इंटरनेट सुविधा आहे.

सतत मोबाईल समोर बसण्याचा विद्यार्थ्यांना कंटाळा आला आहे. त्यातच ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटीबाबत अडचणी येत आहेत. परिणामी ऑनलाईन शिक्षणाचा फज्जा उडाला असून विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सुधारणा व्हावी आणि आॅफलाईन शाळा सुरू व्हाव्यात, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त केली जात आहे.

----------------------

आमच्या गावात इंटरनेट कनेक्टिव्हिटीची अडचण आहे. दुर्गम भागात वीजपुरवठा खंडित झाल्यास अनेक दिवस मोबाईल चार्ज करणेही शक्य होत नाही. शिक्षक ऑनलाईन पध्दतीने शिकवण्याचा प्रयत्न करतात.परंतु,काही वेळा पालक मोबाईल बाहेर घेऊन गेल्यामुळे ऑनलाईन वर्गांना उपस्थित राहता येत नाही.

- सायली सुतार, विद्यार्थी

-------------------

डोंगराळ भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीबाबत अडचण येते. घरात दोन मोबाईल नसल्यामुळे एकाच वेळी बहिणीचा ऑनलाईन वर्ग आल्यास दोघांपैकी एकालाच वर्गाला उपस्थित राहता येते. पावसाळ्यात आठ ते 15 दिवस वीज पुरवठा खंडित होतो.त्यावेळी ऑनलाईन शिक्षण घेणे शक्यच होत नाही.

- ओम सुतार, विद्यार्थी

--------------

जिल्हा परिषदेच्या एकूण शाळा : ३, ६४२

इंटरनेट असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा : ४१०

जिल्ह्यातील एकूण खासगी अनुदानित शाळा : १२६२

जिल्ह्यातील इंटरनेट सुविधा असलेल्या शाळा : १०३३

-------

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे मोबाईलच नाही.त्यामुळे ऑनलाईन वर्गांना खूप कमी उपस्थिती असते.विद्यार्थ्यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी अडचणी येत असल्याचे पालकांकडून सांगितले जाते.प्रयत्न करून व इच्छा असूनही ग्रामीण व दुर्गम भागातील शिक्षकांना ऑनलाईन पध्दतीने शिक्षण देता येत नाही.

के.एम.धंद्रे, शिक्षक,

--