शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

आटोपशीर मैफलींमुळे निखळ आनंदात व्यत्यय

By admin | Updated: December 9, 2014 23:54 IST

रात्रभर चालणा:या मैफली, उत्तरोत्तर रंगत जाणारे राग यांमुळे पूर्वी सवाई गंधर्व महोत्सवात वेगळीच अनुभूती मिळायची.

पुणो : रात्रभर चालणा:या मैफली, उत्तरोत्तर रंगत जाणारे राग यांमुळे पूर्वी सवाई गंधर्व महोत्सवात वेगळीच अनुभूती मिळायची. आता  मात्र  रात्री दहार्पयतच असलेली मर्यादा.. कलाकारांच्या आटोपशीर मैफिली.. यामुळे संगीताच्या निखळ आनंदात व्यत्यय येत असल्याच्या काहीशा  ‘गोड’ तक्रारी करीत असतानाही सवाई गंधर्वाची आस अजूनही कायम असल्याचे संगीत रसिकांनी सांगितले. 
अभिजात भारतीय संगीताच्या परमोच्च आनंदाची अनुभूती देणा:या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या आगमनाची आसही या महोत्सवाच्या ‘वारक:यांना’ लागलेली असते. महाराष्ट्रातील कानाकोप:यातूनच नव्हे तर देशविदेशामधून अनेक  रसिक या महोत्सवाला वर्षानुवर्षे हजेरी लावतात. दर्दी रसिकांसमोर कला सादर करण्याच्या आशेवरच कलाकारही कोणतीही बिदागी न घेता गुरुचरणी आपली सेवा अर्पण करतात. त्यामुळेच ही सांगीतिक महोत्सवाची परंपरा अखंडित राहण्याचे श्रेय जसे ‘तानसेनां’ना आहे तसेच  ‘कानसेनां’नाही आहे. पुण्याच्या सांस्कृतिक विश्वात मानबिंदू ठरलेल्या या महोत्सवाविषयी कायमस्वरूपी ¬णानुबंध निर्माण झाले असल्याची भावना रसिक व्यक्त करतात.
विनायक चांदोरकर : सवाई गंधर्व संगीत महोत्सवाला 1972 सालापासून न चुकता येत आहे. फार पूर्वी अलिबागचा आमचा गृप मिळून आम्ही सगळे येत असू. ती मजा काही वेगळीच होती. हा महोत्सव आयोजित होण्याची आम्ही चातकाप्रमाणो वाट पाहायचो. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांतून रसिक महोत्सवाला येत असतं. यानिमित्त अनेकांच्या ओळखीही  झाल्या.  
रात्री 9 वाजता सुरू झालेल्या मैफिलीला उत्तरोत्तर रंग चढत असे. एका अनोख्या आनंदाची तृप्ती महोत्सवातून मिळे. कालपरत्वे महोत्सवात  बदल झाले. आता 4 वाजता महोत्सवाला सुरुवात होत असल्याने संगीत ऐकताना वेगळी अनुभूती मिळत नाही. तरीही महोत्सवाबद्दल आपुलकी वाटत असल्याने आजही येणो कायम आहे.
(प्रतिनिधी)
 
वर्षभर जे दिग्गज कलाकार बाहेर ऐकायला मिळत नाहीत, ते सवाई गंधर्व महोत्सवामध्ये आवजरून ऐकायला मिळतात. 1952मध्ये महोत्सवाला केवळ 56 रसिक होते. मात्र, आज हजारोंमध्ये ही संख्या परिवर्तित झाली आहे. याचे सर्वस्वी श्रेय स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांना जाते. मंडपात एक  किंवा 1क्क्क् रसिक असले तरी पंडितजी गात असतं. पावसाच्या दिवसांत पाट घेऊन रसिक महोत्सवाला येत असतं. पूर्वी दोन दिवस चालणारा हा महोत्सव आज चार दिवस रसिकांना विभिन्न कलाविष्कारांची मेजवानी देत आहे. मात्र, आता त्याला  ‘कमर्शियल’ स्वरूप आले आहे. शंकर महादेवन, सुरेश वाडकर यांच्यानंतर आता कुमार शानूही महोत्सवात येईल, असे वाटते.
- डॉ. प्रकाश कामत
 
सवाई गंधर्व संगीत महोत्सवाला सांगीतिक विश्वात एक परिमाण प्राप्त झाले आहे. वीस वर्षापासून महोत्सवाला येत आहे. जुन्या आणि नव्या कलाकारांच्या कलाविष्कारांचा संगम ही एक अद्वितीय अनुभूती आहे. पूर्वी रात्रभर जागून मैफिलीचा आस्वाद घेणो हा सुखद अनुभव होता; मात्र आता तो आनंद मिळत नाही, याची खंत वाटते. मैफील लांबली तरी कुणाचा विरोध नसायचा. मात्र, आता दहाची मर्यादा पाळावी लागते. त्यामुळे रसिकांचा काही प्रमाणात रसभंग होतो.
- कबीर पटेल
 
एखाद्या वारक:याप्रमाणो 4क् वर्षापासून महोत्सवाला हजेरी लावत आहे. पूर्वी रेणुका स्वरूपमध्ये महोत्सव व्हायचा. त्यानंतर वर्षभराने गणोश कला क्रीडा रंगमंच येथे सुरूवात झाली. मात्र, फारसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग मैदानावर महोत्सवाची परंपरा सुरू झाली, ती खंडित झालेली नाही. पंडित भीमसेन जोशी यांनी लावलेले महोत्सवाचे रोप देशभर पसरले आहे. सुरुवातीला केवळ 3 रुपये महोत्सवाचे तिकीट होते. कालपरत्वे महोत्सवात रकमेसह तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अनेक बदल झाले आहेत.  स्क्रीनच्या व्यवस्थेमुळे लांब बसलेल्या रसिकांनाही महोत्सवाचा आस्वाद घेणो शक्य झाले आहे. महोत्सवात सादर होणारे नृत्याविष्कार ही रसिकांसाठी आनंददायी पर्वणी ठरते. 
- वसंत कुलकर्णी