शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

विमा कंपन्या नफ्यात, राज्यातील शेतकरी तोट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पीकविम्यापोटी कोट्यवधी रुपयांचा पीकविमा खिशात घालणाऱ्या विमा कंपन्या शेतकऱ्यांना त्याचा कायदेशीर परतावा देण्याचे मात्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पीकविम्यापोटी कोट्यवधी रुपयांचा पीकविमा खिशात घालणाऱ्या विमा कंपन्या शेतकऱ्यांना त्याचा कायदेशीर परतावा देण्याचे मात्र टाळत आहेत. अनेक नियम दाखवत शेतकऱ्यांचे दावे विमा कंपन्यांकडून फेटाळले जात असल्याची तक्रार आहे.

सन २०२०-२१ (मार्च २१ अखेर) मध्ये राज्यात विमा कंपन्यांनी पीक विम्यापोटी ५ हजार ८०१ कोटी रुपये घेतले. प्रत्यक्षात परतावा फक्त ८२३ कोटी रुपयांचाच मिळाला. हे प्रमाण १५. ८ टक्के इतकेच आहे.

विमा कंपन्यांचे पीकविमा भरपाईची मागणी करणारे नियम जाचक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. नुकसान झाल्यापासून ७२ तासांच्या आत दावा दाखल झाला पाहिजे, शेतातून गुगल मॅप टॅगिंग करून सर्व्हे नंबर दाखवून दावा ऑनलाईन सादर झाला पाहिजे, ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान हवे. या नियमांची पूर्तता अवघड असल्याने दावे फेटाळले जातात.

शेतकरी संघटना, भारतीय किसान काँग्रेस तसेच शेतकऱ्यांच्या अन्य संघटना विम्याच्या मुद्यावर आक्रमक आहेत. शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी सांगितले की, आम्ही कंपन्यांच्या कार्यालयात जाऊन आंदोलन करणार आहोत. किसान काँग्रेसचे हनुमंत पवार म्हणाले की, केंद्र सरकार विमा कंपन्यांना पाठीशी घालत आहे. नाकारण्यात आलेल्या प्रत्येक विमा दाव्याचा जाहीर खुलासा कंपन्यांनी करावा अशी आमची मागणी आहे. आम्हाला नको असलेल्या कंपन्या आमच्यावर लादण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.

चौकट

सन २०१६-१७ पासून विमा कंपन्यांनी राज्यातून पीकविम्यापोटी २३ हजार १८० कोटी रुपये जमा केले. त्यातला परतावा फक्त १५ हजार ६२२ कोटी रुपये आहे. हे प्रमाण ६७.४ टक्के आहे.

माहिती स्रोत - कृषी विभाग, महाराष्ट्र.