शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

जैन संघटनेचे काम प्रेरणादायी

By admin | Updated: November 23, 2015 02:07 IST

भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) लातूरच्या भूकंपग्रस्त भागातील मुलांचा सांभाळ करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले. ही संघटना संकटात सापडलेल्या

पुणे : भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) लातूरच्या भूकंपग्रस्त भागातील मुलांचा सांभाळ करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले. ही संघटना संकटात सापडलेल्या लोकांच्या पाठीशी उभी राहते. हे काम प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. शासनाकडून संकटकाळात मदत दिली जाते. मात्र, समाजाचा हातभार लागत नाही तोपर्यंत त्या कामाला गती येणार नाही, असेही पवार म्हणाले.भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) लातूर, बीड, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक पुनर्वसनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. कार्यक्रमास पालकमंत्री गिरीश बापट, आमदार बाबूराव पाचरणे, जगदीश मुळीक, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतिलाल मुथ्था व अन्य मान्यवर उपस्थित होते.राज्यातील दुष्काळाची स्थिती गंभीर असल्यामुळे दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्राच्या समितीतील सदस्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, समितीकडून राज्य व केंद्र सरकारला योग्य अहवाल सादर केला जाईल. राज्यातील लोकप्रतिनिधीही केंद्रात याप्रश्नी पाठपुरावा करतील. आपण स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील परिस्थितीबाबत माहिती दिलेली आहे, असे सांगून ते म्हणाले, संकटकाळात राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. बापट म्हणाले, की मुलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास शिकविणे ही खूप मोठी गोष्ट आहे. शासनाच्या मदतीला मर्यादा असतात. परंतु, शासनाची मदत न घेता उपकाराच्या नाही, तर कर्तव्याच्या भावनेतून बीजीएस काम करत आहे.