शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात पाण्याच्या तासाला बारा नमुन्यांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महापालिकेकडून तब्बल ४५ लाख नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. या पाण्याची शुद्धता आणि गुणवत्तेची दररोज ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महापालिकेकडून तब्बल ४५ लाख नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. या पाण्याची शुद्धता आणि गुणवत्तेची दररोज तपासणी केली जाते. पाणी शुद्ध आणि पिण्यालायक करण्यासाठी अनेक चाचण्या घेतल्या जात असून, तासाला बारा नमुन्यांची तपासणी केली जाते. पावसाळ्याच्या तोंडावर विशेष खबरदारी बाळगली जाते.

खडकवासला धरणातून येणारे पाणी पालिकेच्या पर्वती, लष्कर जलकेंद्रांवरून शहरभर पोहोचवले जाते. या पुरवठा होणाऱ्या पाण्याचे नमुने तपासण्याची अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात आलेली आहे. येथे दिवसाला २५० ते ३०० म्हणजे दर तासाला सुमारे बारा पाण्याचे नमुने गोळा केले जातात. या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली जाते आहे. घरोघरी केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या नळकोंडाळे, पाण्याच्या टाक्या, जलशुुद्धीकरण केंद्र आणि शुद्धीकरणानंतर बाहेर सोडल्या जाणाऱ्या पाण्याचेही नमुने घेतले जातात.

पाण्यातील रसायने, धातू, कीटकनाशकांची मात्रा किती प्रमाणात आहे हे भारतीय मानक ब्यूरो, जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मानकानुसार तपासले जाते. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणारी पुणे ही राज्यातील एकमेव पालिका आहे. ‘डब्ल्यूएचओ’च्या मानकानुसार दहा हजार लोकसंख्येमागे महिन्याकाठी एक नमुना घेणे आवश्यक आहे. पुण्याची लोकसंख्या ४५ लाखांच्या घरात गृहीत धरून ४५० नमुने महिन्याला घेणे अपेक्षित आहे. परंतु, मात्र महिन्याकाठी ७ हजारांच्या आसपास नमुने तपासले जात आहेत.

===

पर्वती जलशुद्धीकरण केंद्रावर मुख्य प्रयोगशाळा आहे. तर, लष्कर जलकेंद्रावर कमी क्षमतेची प्रयोगशाळा आहे. पुणेकरांना होणारा पाणीपुरवठा सुरक्षित असावा, त्यामधून कोणत्याही स्वरूपाचे आजार पसरू नयेत, याची काळजी घेतली जाते आहे. पाण्यातील कीटकनाशकांचे प्रमाण ‘निरी’ येथून आणि किरणोत्सर्जन करणाऱ्या पदार्थांची तपासणी भामा ऑटोमिक सेंटरमधून वर्षातून एकदाच केली जाते.

===

पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरिन, ब्लिचिंग पावडर, तुरटीसह वापरण्यात येणाऱ्या अन्य रसायनांचे प्रमाण यांत्रिक पद्धतीने तपासले जाते. पाण्यात आढळून येणारे आर्सेनिक, झिंक, लोह आदी २१ प्रकारच्या धातूंचे प्रमाण अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या मदतीने तपासले जाते.

===

पाण्यातील ‘टोटल ऑर्गेनिक कार्बन’, पाण्याची ‘टर्बिडीटी’ अर्थात गढूळता आणि पाण्यातील जिवाणूंचे प्रमाण हेही निकषांप्रमाणे असल्याचे पाहिले जाते. पाणी दूषित असल्याच्या तक्रारी आल्यास संबंधित विभागातील जलवाहिन्या, पाणीपुरवठा केंद्रांच्या मुख्य स्त्रोताची तपासणी करून पाणी दूषित होण्याचे कारण शोधून ते दुरुस्त केले जाते.