शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात पाण्याच्या तासाला बारा नमुन्यांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महापालिकेकडून तब्बल ४५ लाख नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. या पाण्याची शुद्धता आणि गुणवत्तेची दररोज ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महापालिकेकडून तब्बल ४५ लाख नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. या पाण्याची शुद्धता आणि गुणवत्तेची दररोज तपासणी केली जाते. पाणी शुद्ध आणि पिण्यालायक करण्यासाठी अनेक चाचण्या घेतल्या जात असून, तासाला बारा नमुन्यांची तपासणी केली जाते. पावसाळ्याच्या तोंडावर विशेष खबरदारी बाळगली जाते.

खडकवासला धरणातून येणारे पाणी पालिकेच्या पर्वती, लष्कर जलकेंद्रांवरून शहरभर पोहोचवले जाते. या पुरवठा होणाऱ्या पाण्याचे नमुने तपासण्याची अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात आलेली आहे. येथे दिवसाला २५० ते ३०० म्हणजे दर तासाला सुमारे बारा पाण्याचे नमुने गोळा केले जातात. या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली जाते आहे. घरोघरी केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या नळकोंडाळे, पाण्याच्या टाक्या, जलशुुद्धीकरण केंद्र आणि शुद्धीकरणानंतर बाहेर सोडल्या जाणाऱ्या पाण्याचेही नमुने घेतले जातात.

पाण्यातील रसायने, धातू, कीटकनाशकांची मात्रा किती प्रमाणात आहे हे भारतीय मानक ब्यूरो, जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मानकानुसार तपासले जाते. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणारी पुणे ही राज्यातील एकमेव पालिका आहे. ‘डब्ल्यूएचओ’च्या मानकानुसार दहा हजार लोकसंख्येमागे महिन्याकाठी एक नमुना घेणे आवश्यक आहे. पुण्याची लोकसंख्या ४५ लाखांच्या घरात गृहीत धरून ४५० नमुने महिन्याला घेणे अपेक्षित आहे. परंतु, मात्र महिन्याकाठी ७ हजारांच्या आसपास नमुने तपासले जात आहेत.

===

पर्वती जलशुद्धीकरण केंद्रावर मुख्य प्रयोगशाळा आहे. तर, लष्कर जलकेंद्रावर कमी क्षमतेची प्रयोगशाळा आहे. पुणेकरांना होणारा पाणीपुरवठा सुरक्षित असावा, त्यामधून कोणत्याही स्वरूपाचे आजार पसरू नयेत, याची काळजी घेतली जाते आहे. पाण्यातील कीटकनाशकांचे प्रमाण ‘निरी’ येथून आणि किरणोत्सर्जन करणाऱ्या पदार्थांची तपासणी भामा ऑटोमिक सेंटरमधून वर्षातून एकदाच केली जाते.

===

पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरिन, ब्लिचिंग पावडर, तुरटीसह वापरण्यात येणाऱ्या अन्य रसायनांचे प्रमाण यांत्रिक पद्धतीने तपासले जाते. पाण्यात आढळून येणारे आर्सेनिक, झिंक, लोह आदी २१ प्रकारच्या धातूंचे प्रमाण अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या मदतीने तपासले जाते.

===

पाण्यातील ‘टोटल ऑर्गेनिक कार्बन’, पाण्याची ‘टर्बिडीटी’ अर्थात गढूळता आणि पाण्यातील जिवाणूंचे प्रमाण हेही निकषांप्रमाणे असल्याचे पाहिले जाते. पाणी दूषित असल्याच्या तक्रारी आल्यास संबंधित विभागातील जलवाहिन्या, पाणीपुरवठा केंद्रांच्या मुख्य स्त्रोताची तपासणी करून पाणी दूषित होण्याचे कारण शोधून ते दुरुस्त केले जाते.