शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

चौकशी अहवालाचे गौडबंगाल

By admin | Updated: May 19, 2017 04:38 IST

समान पाणी योजनेत शहरात एकूण १०३ पाणी साठवण टाक्या बांधण्यात येणार आहेत. त्यातील ८२ टाक्यांच्या बांधकामांच्या निविदेवर थेट विधान परिषदेत प्रश्न विचारला

- लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : समान पाणी योजनेत शहरात एकूण १०३ पाणी साठवण टाक्या बांधण्यात येणार आहेत. त्यातील ८२ टाक्यांच्या बांधकामांच्या निविदेवर थेट विधान परिषदेत प्रश्न विचारला गेल्यामुळे सरकारने या कामाला स्थगिती देत चौकशी करण्याचे आदेश दिले, ही चौकशी झाली कधी, त्याचा अहवाल सादर कधी केला गेला याबद्दल कमालीची गुप्तता बाळगण्यात येत आहे. तसेच सरकारने अचानक स्थगिती उठवण्याचा निर्णय घेतल्यामुळे तब्बल २४५ कोटी रुपयांच्या या कामाबाबतही आता शंका घेतल्या जात आहेत.पाणी साठवण टाक्या हा २४ तास पाणी योजनेतील एक महत्त्वाचा भाग आहे. एकूण १०३ टाक्या शहराच्या वेगवेगळ्या भागांत बांधण्यात येणार आहेत. त्याचा २४५ कोटी रुपयांचा खर्च महापालिका करणार आहे. त्यामुळेच या कामाच्या निविदाप्रक्रियेला त्वरित सुरुवात करण्यात आली. तसे करताना एकाच कंपनीला काम मिळेल अशा पद्धतीने निविदेतील अटी, शर्ती ठेवण्यात आल्या, त्यासाठी आधी काढलेली निविदा रद्द करून फेरनिविदा काढण्यात आली व संबंधित कंपनीलाच हे काम मिळेल याची काळजी घेण्यात आली असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली.त्यामुळे त्यावर आमदार अनंत गाडगीळ व अनिल भोसले यांनी विधान परिषदेत प्रश्न विचारला, त्याची दखल घेत सरकारने या कामाला स्थगिती देत चौकशीचेही आदेश दिले. ज्यांच्यावर अटी, शर्तींमध्ये बदल करण्यात आल्याचे आरोप केले होते, त्यांनाच या चौकशीचे अधिकार दिले. ही चौकशी झाली कधी, त्याचा अहवाल कसा तयार झाला, कोणी तयार केला व तो सरकारकडे कसा पाठविला याविषयी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही काही माहिती नाही. याबाबत कमालीची गुप्तता आता सरकारने कामाच्या स्थगितीचे आदेश रद्द केल्यानंतरही बाळगण्यात येत आहे.स्थगिती दिल्याने थांबले कामनिविदा खुली करून संबंधित कंपनीला कार्यारंभ आदेशही देण्यात आला होता. मात्र थेट सरकारनेच स्थगिती दिल्यामुळे काम थांबले. चौकशी अहवाल गेल्यानंतरही सरकारकडून स्थगितीसंबंधी काहीही कळविण्यात येत नव्हते. त्यामुळे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सातत्याने मुंबईला दौरे होत होते. संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली जात होती, तरीही काही होत नव्हते, मात्र काही दिवसांपूर्वी अचानक स्थगिती रद्द केल्यासंबंधीचे आदेश महापालिका प्रशासनाला मिळाले. त्यात स्थगिती रद्द केली एवढेच म्हटले होते, चौकशीचे काय झाले याबाबत मात्र एक शब्दही नव्हता. - आता स्थगिती उठली आहे. कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतरही स्थगितीमुळे कंपनीला काम सुरू करता येत नव्हते. आता स्थगिती उठल्यानंतर मात्र कंपनीने त्वरित काम सुरू केले आहे. - अनेक ठिकाणी खोदाईही सुरू झाली आहे. काम लवकर सुरू करण्याबाबत प्रशासनाकडून कंपनीला घाई करण्यात येत आहे. चौकशी अहवालाचे गौडबंगाल मात्र कायम आहे.ज्यांनी प्रश्न विचारले त्यांना नियमाप्रमाणे सरकारने चौकशी अहवालाची प्रत पाठवायला हवी किंवा किमान चौकशी झाली असून त्यात काहीही आढळले नाही असे तरी कळवायला हवे. असे सरकारने काहीही केलेले नाही. अद्याप तरी मला असे पत्र आलेले नाही. संबंधित कंपनीने काम सुरू केल्याची माहिती मात्र कार्यकर्त्यांकडून समजली. याबाबत सरकारकडे विचारणा करणार आहे.- अनंत गाडगीळ, आमदार