शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

चौकशी अहवालाचे गौडबंगाल

By admin | Updated: May 19, 2017 04:38 IST

समान पाणी योजनेत शहरात एकूण १०३ पाणी साठवण टाक्या बांधण्यात येणार आहेत. त्यातील ८२ टाक्यांच्या बांधकामांच्या निविदेवर थेट विधान परिषदेत प्रश्न विचारला

- लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : समान पाणी योजनेत शहरात एकूण १०३ पाणी साठवण टाक्या बांधण्यात येणार आहेत. त्यातील ८२ टाक्यांच्या बांधकामांच्या निविदेवर थेट विधान परिषदेत प्रश्न विचारला गेल्यामुळे सरकारने या कामाला स्थगिती देत चौकशी करण्याचे आदेश दिले, ही चौकशी झाली कधी, त्याचा अहवाल सादर कधी केला गेला याबद्दल कमालीची गुप्तता बाळगण्यात येत आहे. तसेच सरकारने अचानक स्थगिती उठवण्याचा निर्णय घेतल्यामुळे तब्बल २४५ कोटी रुपयांच्या या कामाबाबतही आता शंका घेतल्या जात आहेत.पाणी साठवण टाक्या हा २४ तास पाणी योजनेतील एक महत्त्वाचा भाग आहे. एकूण १०३ टाक्या शहराच्या वेगवेगळ्या भागांत बांधण्यात येणार आहेत. त्याचा २४५ कोटी रुपयांचा खर्च महापालिका करणार आहे. त्यामुळेच या कामाच्या निविदाप्रक्रियेला त्वरित सुरुवात करण्यात आली. तसे करताना एकाच कंपनीला काम मिळेल अशा पद्धतीने निविदेतील अटी, शर्ती ठेवण्यात आल्या, त्यासाठी आधी काढलेली निविदा रद्द करून फेरनिविदा काढण्यात आली व संबंधित कंपनीलाच हे काम मिळेल याची काळजी घेण्यात आली असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली.त्यामुळे त्यावर आमदार अनंत गाडगीळ व अनिल भोसले यांनी विधान परिषदेत प्रश्न विचारला, त्याची दखल घेत सरकारने या कामाला स्थगिती देत चौकशीचेही आदेश दिले. ज्यांच्यावर अटी, शर्तींमध्ये बदल करण्यात आल्याचे आरोप केले होते, त्यांनाच या चौकशीचे अधिकार दिले. ही चौकशी झाली कधी, त्याचा अहवाल कसा तयार झाला, कोणी तयार केला व तो सरकारकडे कसा पाठविला याविषयी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही काही माहिती नाही. याबाबत कमालीची गुप्तता आता सरकारने कामाच्या स्थगितीचे आदेश रद्द केल्यानंतरही बाळगण्यात येत आहे.स्थगिती दिल्याने थांबले कामनिविदा खुली करून संबंधित कंपनीला कार्यारंभ आदेशही देण्यात आला होता. मात्र थेट सरकारनेच स्थगिती दिल्यामुळे काम थांबले. चौकशी अहवाल गेल्यानंतरही सरकारकडून स्थगितीसंबंधी काहीही कळविण्यात येत नव्हते. त्यामुळे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सातत्याने मुंबईला दौरे होत होते. संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली जात होती, तरीही काही होत नव्हते, मात्र काही दिवसांपूर्वी अचानक स्थगिती रद्द केल्यासंबंधीचे आदेश महापालिका प्रशासनाला मिळाले. त्यात स्थगिती रद्द केली एवढेच म्हटले होते, चौकशीचे काय झाले याबाबत मात्र एक शब्दही नव्हता. - आता स्थगिती उठली आहे. कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतरही स्थगितीमुळे कंपनीला काम सुरू करता येत नव्हते. आता स्थगिती उठल्यानंतर मात्र कंपनीने त्वरित काम सुरू केले आहे. - अनेक ठिकाणी खोदाईही सुरू झाली आहे. काम लवकर सुरू करण्याबाबत प्रशासनाकडून कंपनीला घाई करण्यात येत आहे. चौकशी अहवालाचे गौडबंगाल मात्र कायम आहे.ज्यांनी प्रश्न विचारले त्यांना नियमाप्रमाणे सरकारने चौकशी अहवालाची प्रत पाठवायला हवी किंवा किमान चौकशी झाली असून त्यात काहीही आढळले नाही असे तरी कळवायला हवे. असे सरकारने काहीही केलेले नाही. अद्याप तरी मला असे पत्र आलेले नाही. संबंधित कंपनीने काम सुरू केल्याची माहिती मात्र कार्यकर्त्यांकडून समजली. याबाबत सरकारकडे विचारणा करणार आहे.- अनंत गाडगीळ, आमदार