शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

करात गोलमाल करणाऱ्यांची चौकशी करा

By admin | Updated: November 18, 2016 06:27 IST

मिळकतकर भरण्यासाठी जुन्या नोटा रोख स्वरूपात स्वीकारण्याचा निर्णय झाल्यानंतर शहरातील अनेक मिळकतधारकांनी तब्बल १०० कोटी रुपये जमा केले.

पुणे : मिळकतकर भरण्यासाठी जुन्या नोटा रोख स्वरूपात स्वीकारण्याचा निर्णय झाल्यानंतर शहरातील अनेक मिळकतधारकांनी तब्बल १०० कोटी रुपये जमा केले. यामध्ये अडीच लाखांपेक्षा जास्त मिळकतकर रोख स्वरूपात भरणाऱ्यांची नावे आयकर विभागाला कळवून त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवकांनी मुख्य सभेत केली. मुख्य सभेच्या कामकाजाला सुरुवात करताना नोटाबंदीमुळे एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असताना भाजपाच्या खासदारांकडून मात्र याबाबत बेताल विधाने केली जात असल्याचा निषेध मनसेच्या सभासदांकडून करण्यात आला. याविरोधात त्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर नोटबंदीमुळे नागरिकांना सहन कराव्या लागत असलेल्या त्रासाबद्दल नगरसेवकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.सभागृह नेते बंडू केमसे म्हणाले, ‘‘काळ्या पैशांचे मूळ शोधून काढले पाहिजे. काळे धन हे रोख पैशांमध्ये खूप कमी असते, प्रत्यक्षात जमिनी, सोने यामध्ये ते मोठ्या प्रमाणात गुंतविण्यात आले आहे. त्यामुळे काळ्या पैशाला आळा घालायचा असेल तर याबाबत पहिल्यांदा पावले उचलली पाहिजेत.’’विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे म्हणाले, ‘‘काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटा बंद करण्याचा पर्याय सर्वांत शेवटी उचलायला हवा होता. या निर्णयामुळे ३६ लोकांना बलिदान द्यावे लागले आहे.’’मनसेचे गटनेते किशोर शिंदे म्हणाले, ‘‘रांगेत थांबलेल्या लोकांची चेष्टा भाजपाच्या लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे, ती चुकीची आहे. सगळ्यात जास्त काळा पैसा मोदींच्या गुजरातमध्ये होता; मात्र नोटा बदलणार असल्याची बातमी तिथल्या वृत्तपत्रात ६ महिन्यांपूर्वी छापून आली.’’भाजपाचे गटनेते गणेश बिडकर म्हणाले, ‘‘रेल्वे ट्रॅक बदलताना खडखडाट होतो, तसाच मोठा निर्णय घेतल्यानंतर त्याचे परिणाम हे जाणवणारच. नागरिकांना नोटा उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.’’रिपाइंचे गटनेते सिद्धार्थ धेंडे म्हणाले, ‘‘नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ज्या उपाययोजना व्हायला हव्या होत्या, त्या झालेल्या दिसून येत नाही.’’कमल व्यवहारे म्हणाल्या, ‘‘नोटा बंदच्या निर्णयामुळे काळ्या पैशांऐवजी ज्या महिलांनी बचत करून पैसे साठविले होते, त्यांचेच पैसे बाहेर काढावे लागले आहेत. महिलांनाच या निर्णयाचा सर्वाधिक त्रास झाला आहे.’’ मुदतीनंतर मोठ्या रकमेचा करभरणा करणाऱ्या नागरिकांची नावे आयकर विभागाला कळवावी, अशी मागणी दीपक मानकर यांनी केली. वसंत मोरे, सतीश मस्के, संजय बालगुडे, धनंजय जाधव, अविनाश बागवे, सुनील गोगले, अविनाश बागवे, माधुरी सहस्रबुद्धे यांनीही याबाबत विचार व्यक्त केले.(प्रतिनिधी)