शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

पवना धरणात धनाढ्यांचे अतिक्रमण

By admin | Updated: June 18, 2015 23:50 IST

पवना धरण जलाशयाच्या ५०० मीटर क्षेत्रात मुंबई येथील धनाढ्यांनी अतिक्रमण केले आहे. पाटबंधारे प्रशासनाला न जुमानता भराव करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

पवनानगर : पवना धरण जलाशयाच्या ५०० मीटर क्षेत्रात मुंबई येथील धनाढ्यांनी अतिक्रमण केले आहे. पाटबंधारे प्रशासनाला न जुमानता भराव करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शासनाने पाणीसाठा करण्यासाठी धरण पात्रातील गाळ काढण्याची मोहीम गेली पाच वर्षे हाती घेतली आहे. धरण व पाणी साठवण क्षेत्रातील गाळ काढून जास्तीत जास्त पाणीसाठा करण्याचा शासन प्रयत्न करत आहे. मात्र, धरणाच्या जलाशयाच्या ठिंकाणी ठाकूरसाई गावानजीक संपादित क्षेत्रात काही ठिकाणी मुरूम व मातीचा मोठा भराव टाकण्याचे काम चालू आहे. यामुळे पाणी साठवण्याचे काही क्षेत्र कमी होणार आहे. मुंबई येथील अनेक धनाढ्यांनी जलाशयाच्या कडेच्या संपादित व बिगर संपादित जमिनी खरेदी करून मोठे बंगले उभारले आहेत. जलाशयाचे सहज दर्शन होईल अशा ठिकाणी हे बंगले उभारले आहेत किंवा बुडीत क्षेत्रातच अनेक ठिकाणी अतिक्र मण केले आहे. शिवाय, या बंगल्याचे सांडपाणीदेखील धरणाच्या पाण्यात सोडले आहे. जलाशयाच्या कडेला अनेक अनधिकृत कामे केवळ पाटबंधारे विभागाची दिशाभूल करून किंवा तेथील अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून सुरू आहे. शासन पातळीवर याची फारशी गांभीर्याने दखल घेतली जात नसल्यामुळे व अतिक्रमणे करणाऱ्यांवर कडक कारवाई होत नसल्याने आता धरणच बुजवण्याचे काम सुरू आहे. हे जर रोखले गेले नाही, तर धरणाची पाणी साठवण क्षमता कमी होईल व पाण्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवेल. धरणाचे पाणी स्थानिक शेतकऱ्यांना प्राधान्याने मिळावे म्हणून पवना भागातील ३ शेतकऱ्यांना पाण्यासाठीच्या लढ्यासाठी बलिदान द्यावे लागले. हेच पाणी साठवण होत असलेल्या ठिकाणी चक्क भराव ठाकून धरण बुजवण्याचे काम करणाऱ्यावर नेमकी काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.(वार्ताहर)