शहरं
Join us  
Trending Stories
1
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
2
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
4
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
5
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
6
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
7
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
8
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
9
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
10
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
11
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
12
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
13
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
14
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
15
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
16
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
17
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
18
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
19
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
20
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?

बांधकामाला पाणी वापरण्याची चौकशी

By admin | Updated: March 17, 2016 03:26 IST

शहराला सर्वत्र पाणीटंचाईच्या झळा पोहोचत असताना महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या बांधकामाला पिण्याचे पाणी वापरले जात असल्याच्या प्रकाराची तातडीने चौकशी करून संबंधित

पुणे : शहराला सर्वत्र पाणीटंचाईच्या झळा पोहोचत असताना महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या बांधकामाला पिण्याचे पाणी वापरले जात असल्याच्या प्रकाराची तातडीने चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी बुधवारी दिले आहेत. शहरामध्ये बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास मनाई असताना महापालिका मुख्य इमारतीच्या बांधकामासाठीच पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने मंगळवारी उजेडात आणला. ऐन पाणीटंचाईच्या काळात महापालिकेकडूनच पाण्याची मोठी नासाडी केली जात असल्याच्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाकडून इमारतीच्या बांधकामासाठी झऱ्याचे पाणी वापरले जात असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात नळाला टॅप करून पाइपने बांधकामाला पाणी मारले जात असल्याचे दिसून आले होते. त्याचे फोटोही स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी काढले आहेत. आयुक्तांनी या प्रकरणाचा सविस्तर अहवाल संबंधित विभागाकडून मागविला आहे. त्यामध्ये दोषी आढळून आलेल्या अधिकाऱ्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये निम्म्यापेक्षा कमी पाणीसाठा झाल्याने १ सप्टेंबरपासून शहराच्या पाण्यात ३० टक्के कपात करून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्या वेळी पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकाम, वॉशिंग सेंटरसाठी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर पिण्याचे पाणी गाडी धुण्यासाठी वापरणे, पाण्याच्या टाक्या भरून वाहणे अशा प्रकारे पाण्याचा गैरवापर होत असल्याचे आढळून त्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले आहेत. पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी भरारी पथके नेमण्यात आली आहेत. महापालिका मुख्य इमारतीच्या बांधकामासाठी उघडपणे नळाला पाइप जोडून त्यातून पिण्याचे पाणी बांधकामासाठी वापरले जात आहे. महापालिकेकडूनच पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकामासाठी केला जात असल्याने उजेडात आल्याने पालिका प्रशासन पाणीटंचाईबाबत गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ३०० जलतरण तलाव जुलैेपर्यंत बंद राज्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सर्व जलतरण तलाव बंद करण्याचे आदेश राज्य शासनाकडून महापालिकांना देण्यात आले आहेत, या पार्श्वभूमीवर शहरातील महापालिकेचे व खासगी असे ३०० जलतरण तलाव बंद होणार आहेत. राज्य शासनाचे आदेश प्राप्त झाले असून त्यानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्यये निम्म्यापेक्षा कमी पाणीसाठा झाल्याने १ सप्टेंबरपासून शहराच्या पाण्यात ३० टक्के पाणीकपात करून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्याचवेळी जलतरण तलावांना पिण्याचे पाणी वापरले जाऊ नये, असे आदेश कुणाल कुमार यांनी दिले होते. त्यामुळे इतर ठिकाणांहून पाणी आणून शहरातील जलतरण तलाव सुरू होते, मात्र राज्य शासनाच्या आदेशानुसार हे तलाव आता बंद होणार आहेत. शहरात महापालिकेचे २१, तर तसचे २७५ खासगी जलतरण तलाव आहेत. जलतरण तलावासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याने शासनाकडून ते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.