शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी सुरू

By admin | Updated: July 10, 2015 01:07 IST

दौंड तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा व दोन ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून, इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला जोमाने सुरुवात झाली आहे.

वासुंदे : दौंड तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा व दोन ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून, इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला जोमाने सुरुवात झाली आहे. यामध्ये ज्या ग्रामपंचायतींचे सरपंचपद हे सर्वसाधारण गटासाठी खुले आहे, अशा ठिकाणी सर्वांत जास्त रस्सीखेच दिसून येत आहे. त्याचबरोबर सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असलेल्या सरपंचपदाच्या जागेसाठीही मोठी चुरस निर्माण झाली आहे. तर गावच्या आखाड्यात नव्याने उतरणाऱ्या नवख्या उमेदवारांचीही संख्या मोठी असल्याने व ज्येष्ठ मंडळीही निवडणुकीसाठी शड्डू ठोकून उभी राहिल्याने निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. अशातच काही ठिकाणच्या प्रमुख मंडळींनी गावची एकी व सलोखा जपण्यासाठी बिनविरोध निवडणुकीचे प्रस्ताव ठेवून घोंगडी बैठका घेण्यास सुरुवात केली. मात्र, राजकारणातील नवखे व ज्येष्ठ यांच्यामध्ये मेळ बसत नसल्याने व मलाच पाहिजे या अटीवर काही उमेदवार अडून राहिल्याने या बैठकाही निष्फळ ठरत असल्याची चर्चा गावकरी पारावर बसून करत आहेत. तर काही ठिकाणची सुशिक्षित मंडळीही गावच्या राजकारणात उतरून नवखे व जुने अशांचा ताळमेळ घालून गावच्या सर्वांगीण विकासाची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची वस्तुस्थिती आहे. मात्र, काही इच्छुक मंडळी इकडून नाही उमेदवारी मिळाली तर तिकडे जाणार, असा दबाव टाकत असल्याने या गावगाड्याच्या निवडणुकीसाठी पॅनल तयार करणाऱ्या प्रमुख मंडळींना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. (वार्ताहर)-----------हौशे, गवशे व नवशे अशा प्रकारची भूमिका बजावणाऱ्या काही मंडळींना मात्र कोणाला उमेदवारी मिळणार, कोण निवडून येणार, कोण सरपंच होणार याच्याशी काही सोईरसुतक नसून निवडणुकीच्या काळात आपली खायची आणि.... त्याची पण चांगलीच चंगळ होणार असल्याने हीच मंडळी गावच्या चौकाचौकांमध्ये, पारावर बसून हा खूप मोठा, तो लय चांगला अशा गप्पा झोडू लागली आहेत.