शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

धान्यपुरवठ्याची माहिती एसएमएसद्वारे

By admin | Updated: May 30, 2017 03:12 IST

ज्या नागरिकांना रेशन देण्यामध्ये दुकानदारांकडून टाळाटाळ केली जात आहे, अशा नागरिकांनी पुरवठा अधिकाऱ्यांकडे नाव व मोबाईल

 लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ज्या नागरिकांना रेशन देण्यामध्ये दुकानदारांकडून टाळाटाळ केली जात आहे, अशा नागरिकांनी पुरवठा अधिकाऱ्यांकडे नाव व मोबाईल क्रमांक दिल्यास त्यावर धान्य उपलब्धतेची माहिती एसएमएसद्वारे दिली जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अन्न व नागरी पुरवठा जिल्हानिहाय दक्षता समितीच्या बैठकीमध्ये आमदार नीलम गोऱ्हे यांनी दुकानदारांच्या मनमानी कारभाराकडे लक्ष वेधल्यानंतर पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार यांनी हा निर्णय घेतला. बैठकीदरम्यान गोऱ्हे यांनी पुणे जिल्ह्यातील रेशन दुकानातील धान्य वितरणामध्ये अनियमितता असून, विविध विभागांतून रेशन दुकानातून नागरिकांची पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी असल्याचे निदर्शनास आणून दिले. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार यांच्याकडे दिले. भालेदार यांनी तत्काळ कार्यवाही करण्यासाठी शहर नायब तहसीलदार पवार यांना आदेश दिले. ज्या नागरिकांना रेशन देण्याबाबत दुकानदार टाळाटाळ करतील, त्या नागरिकांनी पुरवठा अधिकाऱ्यांकडे नाव व मोबाईल क्रमांक नोंदवावा. जेणेकरून त्यांना धान्य उपलब्ध झाल्याचा संदेश पाठवण्यात येईल. महाराष्ट्रात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात धान्यपुरवठा वेळेवर होत नसल्याचेही गोऱ्हे यांनी सांगितले. त्यावर ज्या ठिकाणी अशी समस्या असेल तेथील दुकानदारांना तीन महिन्यांचा आगाऊ धान्यपुरवठा केला जाईल, अशा सूचना देण्यात आल्याचे भालेदार यांनी सांगितले.