शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र, बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
3
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
4
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
5
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
6
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
7
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
8
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
9
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
10
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
11
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
12
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
13
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
14
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
15
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
16
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
17
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
18
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
19
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
20
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश

टोमॅटोपिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव

By admin | Updated: May 8, 2017 02:16 IST

तीव्र उष्णतेचा फटका टोमॅटोपिकाला बसला आहे. नवीन लागवड झालेली टोमॅटोची मर होण्याचे प्रमाण वाढले आहे, तसेच टोमॅटोपिका

लोकमत न्यूज नेटवर्कमंचर : तीव्र उष्णतेचा फटका टोमॅटोपिकाला बसला आहे. नवीन लागवड झालेली टोमॅटोची मर होण्याचे प्रमाण वाढले आहे, तसेच टोमॅटोपिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.आंबेगाव तालुक्यात अगाद टोमॅटो लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणावर करतो. लवकर लागवड केलेल्या टोमॅटोपिकाला चांगला बाजारभाव मिळत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. अनेक शेतकऱ्यांनी नर्सरीतून टोमॅटो रोपे आणून टोमॅटो लागवड केली आहे. मात्र तीव्र उष्णतेचा फटका टोमॅटोपिकाला बसतो आहे. सध्या दिवसभर उन्हाचा कडाका असतो, तर रात्रीसुद्धा उष्णता जाणवते. त्याचा परिणाम विविध पिकांवर झाला आहे.पिकावर उन्हाचा होणारा परिणाम कमी व्हावा, यासाठी शेतकरी उपाययोजना करत आहे. मात्र त्या तोकड्या पडत आहेत. टोमॅटोपिकाच्या बाजूला शेडनेड अथवा निवारा केला जातो. औषध फवारणीचे काम बहुधा रात्री केले जाते. मात्र या उपाययोजनांचा फारसा फायदा होताना दिसत नाही. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा भांडवली खर्च वाढला आहे. महागडी औषध फवारणी तसेच इतर उपाययोजना शेतकऱ्यांना कराव्या लागत आहेत.अतिशय उष्णतेने नुकतीच लागवड झालेल्या टोमॅटो रोपांची सर होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुनर्लागवड करावी लागते. रोपांची डबल लागवड करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. काही भागात पाणी कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने टोमॅटोची पाने आकसली आहेत. टोमॅटोच्या फळांवरसुद्धा अतिउष्णतेचा परिणाम झाला आहे. उष्णतेने रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.कीटक, कोळी, पांढरी आळी, मावा यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. खोडकिड वाढणार आहे. उष्णतेचा परिणाम बहुतेक नगदी पिकांवर झाला असून पीक तजेलदार नाही. उत्पादनाचा दर्जा कमी होणार आहे.