शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव

By admin | Updated: February 10, 2017 02:52 IST

वामानाच्या लहरीपणामुळे वातावरणात कमालीची विसंगती दिसून येत आहे. दिवसभर वाढत चाललेले ऊन आणि रात्रीचा गारठा अशाप्रकारच्या अनियमित हवामानामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होत आहे.

राजेगाव : हवामानाच्या लहरीपणामुळे वातावरणात कमालीची विसंगती दिसून येत आहे. दिवसभर वाढत चाललेले ऊन आणि रात्रीचा गारठा अशाप्रकारच्या अनियमित हवामानामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होत आहे. मागील महिन्यात अचानक वाढलेली थंडी व कमी जास्त होणाऱ्या उन्हाचा शेतपिकांवर प्रतिकूल परिणाम होऊ लागला आहे. राजेगाव परिसरात ऊस, गहू, हरभरा, कांदा, तरकारी या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतित आहे. तसेच या अनियमित वातावरणामुळे पशुधनावर प्रतिकूल परिणाम होण्याची चिंता दुग्धउत्पादक शेतकरी करीत आहेत. शेतमालाच्या पडलेल्या बाजारभावामुळे आणि जीवनावश्यक वस्तूंची वाढलेली महागाई यामुळे अगोदरच अडचणीत आलेला शेतकरी वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने अडचणीत आलेला आहे. पिके वाचवण्यासाठी त्याची धडपड चालू असून, प्रतिबंधासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागत आहे. रासायनिक खते व किटकनाशकांच्या किमतीत दिवसेंदिवस होत असलेल्या भरमसाट वाढीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.या वर्षी केलेल्या आडसाली उसाच्या पानांवर काळा व पांढरा लोकरी मावा पडल्याने ऊसउत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. थंडीच्या हंगामात ऊस पिकांवर लोकरी मावा पडतो. त्यामुळे थंडीचे दिवस असल्याने ऊस पिकांवर पांढरा लोकरी मावा पडलेला आहे. पानांवर पडलेल्या लोकरी माव्यामुळे अन्ननिर्मिती प्रक्रिया थांबल्याने पिकांची वाढ खुंटून उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. शेतमालाच्या पडलेल्या बाजारभावामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी लोकरी माव्याने आक्रमण केल्याने धास्तावला आहे.