शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव

By admin | Updated: February 10, 2017 02:52 IST

वामानाच्या लहरीपणामुळे वातावरणात कमालीची विसंगती दिसून येत आहे. दिवसभर वाढत चाललेले ऊन आणि रात्रीचा गारठा अशाप्रकारच्या अनियमित हवामानामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होत आहे.

राजेगाव : हवामानाच्या लहरीपणामुळे वातावरणात कमालीची विसंगती दिसून येत आहे. दिवसभर वाढत चाललेले ऊन आणि रात्रीचा गारठा अशाप्रकारच्या अनियमित हवामानामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होत आहे. मागील महिन्यात अचानक वाढलेली थंडी व कमी जास्त होणाऱ्या उन्हाचा शेतपिकांवर प्रतिकूल परिणाम होऊ लागला आहे. राजेगाव परिसरात ऊस, गहू, हरभरा, कांदा, तरकारी या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतित आहे. तसेच या अनियमित वातावरणामुळे पशुधनावर प्रतिकूल परिणाम होण्याची चिंता दुग्धउत्पादक शेतकरी करीत आहेत. शेतमालाच्या पडलेल्या बाजारभावामुळे आणि जीवनावश्यक वस्तूंची वाढलेली महागाई यामुळे अगोदरच अडचणीत आलेला शेतकरी वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने अडचणीत आलेला आहे. पिके वाचवण्यासाठी त्याची धडपड चालू असून, प्रतिबंधासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागत आहे. रासायनिक खते व किटकनाशकांच्या किमतीत दिवसेंदिवस होत असलेल्या भरमसाट वाढीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.या वर्षी केलेल्या आडसाली उसाच्या पानांवर काळा व पांढरा लोकरी मावा पडल्याने ऊसउत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. थंडीच्या हंगामात ऊस पिकांवर लोकरी मावा पडतो. त्यामुळे थंडीचे दिवस असल्याने ऊस पिकांवर पांढरा लोकरी मावा पडलेला आहे. पानांवर पडलेल्या लोकरी माव्यामुळे अन्ननिर्मिती प्रक्रिया थांबल्याने पिकांची वाढ खुंटून उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. शेतमालाच्या पडलेल्या बाजारभावामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी लोकरी माव्याने आक्रमण केल्याने धास्तावला आहे.