शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

उद्योगांना पर्यावरण संमती आवश्यक

By admin | Updated: January 28, 2016 03:09 IST

भूजल खरा करणारे विविध कारखाने, उद्योग आणि पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या प्रकल्पांनी केंद्रीय भूजल मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आवश्यक पर्यावरण

पुणे : भूजल खरा करणारे विविध कारखाने, उद्योग आणि पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या प्रकल्पांनी केंद्रीय भूजल मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आवश्यक पर्यावरण संमती घेतल्याशिवाय उद्योग व्यवसाय सुरू ठेवू नयेत. भूजल मंडळ व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ना-हरकत प्रमाणपत्र किंवा परवानग्या घेणे आवश्यक आहे, असे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाच्या न्या. विकास किनगावकर आणि डॉ. अजय देशपांडे यांनी दिले. दूषित पाण्यावर प्रक्रिया न करता बाहेर टाकणाऱ्या उद्योगांवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेशही न्यायाधीकरणाने दिले आहेत.राज्यातील यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर, वाशिम, हिंगोली, नागपूर, भंडारा, बीड, लातूर, परभणी, जालना, जळगाव या जिल्ह्यांतील भूजल पातळीतील फ्लोराईडचे अतिप्रमाण दातांचा व हाडांच्या सांगाड्यांचा फ्लोरोसिस वाढविण्यासाठी कारणीभूत असल्याची गंभीर बाब या पर्यावरणहित याचिकेतून मांडण्यात आली होती. विदर्भ, मराठवाड्यातील बारा जिल्हाधिकारी, तसेच आरोग्य विभागाचे राज्य सचिव आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अमरावती, औरंगाबाद, नागपूर आणि चंद्रपूर यांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आले होते. अ‍ॅड. असिम सरोदे व इतर ११ वकिलांनी ही याचिका दाखल केली होती. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात ४५४ गावांमध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये फ्लोराईडचे प्रमाण जास्त आढळल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात उघड झाली आहे.भूजल सर्वेक्षण आणि विकास संस्थेने सर्व पिण्याचे स्रोत असलेल्या ठिकाणी भूजल पातळी आणि पाण्याचा पिण्यायोग्य दर्जा तपासावा, तसेच यासंदर्भातील सर्वेक्षणाचे जिल्हानिहाय अहवाल तयार करून दर वर्षी प्रसिद्ध करावे, घातक जलस्रोतांवर बंदी आणावी, संबंधित नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची योजना ६ महिन्यांत कार्यान्वित करावी, असे आदेशात नमूद करण्यात आल्याचे अ‍ॅड. सरोदे यांनी सांगितले. दरम्यान, भूजलाचा वापर आणि शोषित पाणलोटाचे नियमन, त्याचे दुष्परिणाम, तसेच लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन करण्यासंदर्भातील अहवाल भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने तयार केला आहे. त्यामध्ये भूजलाचा अतिरेकी वापर, भूजलाची स्थिरता, विहिरींमधील कमी झालेले पाणी यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. टाळाटाळ करणारे उद्योग बंद करणारयाचिकेवर नुकत्याच झालेल्या सुनावणीमध्ये भूजल दर्जा खराब करणारे विविध कारखाने, उद्योग आणि पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या प्रकल्पांनी केंद्रीय भूजल मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्यास टाळाटाळ केल्यास पर्यावरण संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार असे उद्योग बंद करावेत, असे आदेश न्यायाधीकरणाने दिले आहेत.