शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

भारत-इस्राईल संबंध आणखी दृढ व्हावेत

By admin | Updated: June 23, 2017 04:57 IST

भारत आणि इस्राईल हे दोन्ही देश एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे भविष्यात या दोन्ही देशांनी आपले संबंध आणखी दृढ करावेत, अशी अपेक्षा इस्राईलचे भारतातील

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : भारत आणि इस्राईल हे दोन्ही देश एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे भविष्यात या दोन्ही देशांनी आपले संबंध आणखी दृढ करावेत, अशी अपेक्षा इस्राईलचे भारतातील राजदूत डॅनियल कारमॉन यांनी व्यक्त केली. भारत-इस्राईल या दोन देशांतील संबंधांना २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने ‘भारत-इस्राईल, २५ वर्षीय संबंधांचा आढावा आणि भविष्य’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.पुणे इंटरनॅशनल सेंटरचे उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, विश्वस्त प्रमोद चौधरी, इस्राईलचे काउंसल जनरल डेव्हिड अ‍ॅकॉफ, पीआयसीचे मानद संचालक प्रशांत गिरबने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.कारमॉन म्हणाले, ‘सुरुवातीला दोन्ही देशातील संबंध हे सामरिकदृष्ट्या जास्त महत्त्वाचे होते. मात्र, गेल्या काही वर्षांत शेती, व्यापार, शैक्षणिक संबंध, सायबरसुरक्षा, तंत्रज्ञान, आरोग्य, उद्योजकता आणि अन्नसुरक्षा आदी क्षेत्रांतही ते मोठ्या प्रमाणात प्रस्थापित होताना पाहायला मिळत आहेत. नजीकच्या भविष्यात हेच विषय घेत हे संबंध आणखी वाढविण्याचा प्रयत्न इस्राईल सरकार करणार असून भारत सरकारही त्याला सकारात्मक प्रतिसाद देईल, असा आमचा विश्वास आहे.’‘इस्राईलमध्ये शिकत असलेल्या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची टक्केवारी ही तब्बल १० टक्के इतकी आहे. येत्या काही आठवड्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्राईलला भेट देणार आहेत. या भेटीत पुन्हा या दोन्ही देशांचे संबंध आणखी वाढतील, अशी आशा असल्याचेही त्यांनी नमूद केले.