शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
6
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
7
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
8
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
9
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
10
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
11
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
12
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
13
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
14
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
15
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
16
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
17
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
18
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
19
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
20
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
Daily Top 2Weekly Top 5

भारत-इस्राईल संबंध आणखी दृढ व्हावेत

By admin | Updated: June 23, 2017 04:57 IST

भारत आणि इस्राईल हे दोन्ही देश एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे भविष्यात या दोन्ही देशांनी आपले संबंध आणखी दृढ करावेत, अशी अपेक्षा इस्राईलचे भारतातील

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : भारत आणि इस्राईल हे दोन्ही देश एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे भविष्यात या दोन्ही देशांनी आपले संबंध आणखी दृढ करावेत, अशी अपेक्षा इस्राईलचे भारतातील राजदूत डॅनियल कारमॉन यांनी व्यक्त केली. भारत-इस्राईल या दोन देशांतील संबंधांना २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने ‘भारत-इस्राईल, २५ वर्षीय संबंधांचा आढावा आणि भविष्य’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.पुणे इंटरनॅशनल सेंटरचे उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, विश्वस्त प्रमोद चौधरी, इस्राईलचे काउंसल जनरल डेव्हिड अ‍ॅकॉफ, पीआयसीचे मानद संचालक प्रशांत गिरबने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.कारमॉन म्हणाले, ‘सुरुवातीला दोन्ही देशातील संबंध हे सामरिकदृष्ट्या जास्त महत्त्वाचे होते. मात्र, गेल्या काही वर्षांत शेती, व्यापार, शैक्षणिक संबंध, सायबरसुरक्षा, तंत्रज्ञान, आरोग्य, उद्योजकता आणि अन्नसुरक्षा आदी क्षेत्रांतही ते मोठ्या प्रमाणात प्रस्थापित होताना पाहायला मिळत आहेत. नजीकच्या भविष्यात हेच विषय घेत हे संबंध आणखी वाढविण्याचा प्रयत्न इस्राईल सरकार करणार असून भारत सरकारही त्याला सकारात्मक प्रतिसाद देईल, असा आमचा विश्वास आहे.’‘इस्राईलमध्ये शिकत असलेल्या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची टक्केवारी ही तब्बल १० टक्के इतकी आहे. येत्या काही आठवड्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्राईलला भेट देणार आहेत. या भेटीत पुन्हा या दोन्ही देशांचे संबंध आणखी वाढतील, अशी आशा असल्याचेही त्यांनी नमूद केले.