शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

स्वदेशीचा निर्धार पक्का व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 03:38 IST

परदेशी कंपन्या हीनता आणि दीनतेचा फायदा घेत संस्कृती, मूल्ये आणि आदर्शाची पायमल्ली करत आहेत. पूर्वी भारतात ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य होते.

पुणे : परदेशी कंपन्या हीनता आणि दीनतेचा फायदा घेत संस्कृती, मूल्ये आणि आदर्शाची पायमल्ली करत आहेत. पूर्वी भारतात ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य होते. सध्याच्या काळात हजारो परदेशी कंपन्या भारताला गुलाम बनवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. सरकार जागतिक व्यापार संघटनेशी बांधिल असल्याने परदेशी कंपन्यांवर नियंत्रण आणू शकत नाही. मात्र, नागरिकांनी स्वदेशी वस्तूंच्या वापराचा निर्धार पक्का केल्यास परदेशी कंपन्यांना आपोआपच देशातून गाशा गुंडाळावा लागेल, असे मत हरिद्वार येथील पतंजली विद्यापीठाचे कुलगुरू आचार्य बाळकृष्ण यांनी व्यक्त केले.लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते आचार्य बाळकृष्ण यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरवण्यात आले. पुरस्काराच्या एक लाख रुपयांच्या रकमेत स्वत:चे दीड लाख रुपयाची भर घालून बाळकृष्ण यांनी अडीच लाख रुपयांची देणगी ट्रस्टकडे सुपूर्त केली. या वेळी प्रणती टिळक, गीताली टिळक-मोने उपस्थित होत्या.‘बाबा रामदेव यांनी मीठ आणि कडूनिंब घरोघरी पोहोचवले. परदेशी कंपन्या ‘टूथपेस्ट में नमक है क्या’ अशी जाहिरात करू लागल्या आहेत. साबण विकण्याआधी आई-बहिणीला विकावे लागत आहे, याकडे आचार्य बाळकृष्ण यांनी लक्ष वेधले.ते म्हणाले, ‘आम्ही स्वदेशी वस्तूंचा वापर करू, हा निर्धार लोकमान्यांना वंदन करणारा आहे. ही सामूहिक कृती नाही, अशी टीका करत योगाच्या नावाने नाक मुरडले जात होते. बाबा रामदेव यांच्या योग अभियानाला २० वर्षे झाली. साबण, टूथपेस्ट अशा उत्पादनांच्या माध्यमातून परदेशी कंपन्यांकडून होणारी लूट ध्यानात आल्यामुळे स्वदेशी उत्पादनांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.’