शहरं
Join us  
Trending Stories
1
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
4
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
6
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
7
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
8
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
9
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
10
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
11
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
12
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
13
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
14
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
15
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
16
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
17
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
18
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
19
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
20
Khushbu Saroj : अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान

स्वदेशीचा निर्धार पक्का व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 03:38 IST

परदेशी कंपन्या हीनता आणि दीनतेचा फायदा घेत संस्कृती, मूल्ये आणि आदर्शाची पायमल्ली करत आहेत. पूर्वी भारतात ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य होते.

पुणे : परदेशी कंपन्या हीनता आणि दीनतेचा फायदा घेत संस्कृती, मूल्ये आणि आदर्शाची पायमल्ली करत आहेत. पूर्वी भारतात ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य होते. सध्याच्या काळात हजारो परदेशी कंपन्या भारताला गुलाम बनवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. सरकार जागतिक व्यापार संघटनेशी बांधिल असल्याने परदेशी कंपन्यांवर नियंत्रण आणू शकत नाही. मात्र, नागरिकांनी स्वदेशी वस्तूंच्या वापराचा निर्धार पक्का केल्यास परदेशी कंपन्यांना आपोआपच देशातून गाशा गुंडाळावा लागेल, असे मत हरिद्वार येथील पतंजली विद्यापीठाचे कुलगुरू आचार्य बाळकृष्ण यांनी व्यक्त केले.लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते आचार्य बाळकृष्ण यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरवण्यात आले. पुरस्काराच्या एक लाख रुपयांच्या रकमेत स्वत:चे दीड लाख रुपयाची भर घालून बाळकृष्ण यांनी अडीच लाख रुपयांची देणगी ट्रस्टकडे सुपूर्त केली. या वेळी प्रणती टिळक, गीताली टिळक-मोने उपस्थित होत्या.‘बाबा रामदेव यांनी मीठ आणि कडूनिंब घरोघरी पोहोचवले. परदेशी कंपन्या ‘टूथपेस्ट में नमक है क्या’ अशी जाहिरात करू लागल्या आहेत. साबण विकण्याआधी आई-बहिणीला विकावे लागत आहे, याकडे आचार्य बाळकृष्ण यांनी लक्ष वेधले.ते म्हणाले, ‘आम्ही स्वदेशी वस्तूंचा वापर करू, हा निर्धार लोकमान्यांना वंदन करणारा आहे. ही सामूहिक कृती नाही, अशी टीका करत योगाच्या नावाने नाक मुरडले जात होते. बाबा रामदेव यांच्या योग अभियानाला २० वर्षे झाली. साबण, टूथपेस्ट अशा उत्पादनांच्या माध्यमातून परदेशी कंपन्यांकडून होणारी लूट ध्यानात आल्यामुळे स्वदेशी उत्पादनांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.’