शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

बहुराष्ट्रीय कंपन्यांचा भारत केवळ ‘ग्राहक’ : नरेंद्र जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 03:19 IST

‘लिस्ट इन इंडिया- एफडीआय २.० च्या दिशेने’चे प्रकाशन गुंतवणुकीचे जाळे विस्तारले

पुणे : जगभरातील बहुराष्ट्रीय कंपन्या विविध सेवांच्या माध्यमातून भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करीत आहेत; मात्र आपण केवळ या कंपन्यांचे ग्राहक बनत आहोत. स्थानिक कंपन्यांना या गुंतवणुकींचा फारसा फायदा मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे चीनप्रमाणेच भारतीय गुंतवणूकदारांना बहुराष्ट्रीय कंपन्यांचे समभाग विकत घेण्याची संधी मिळणे काळाची गरज बनली असल्याचे मत राज्यसभेचे खासदार व संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केले.पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने उमेश कुडाळकर लिखित ‘लिस्ट इन इंडिया- एफडीआय २.० च्या दिशेने’ या संशोधनात्मक प्रबंधाच्या प्रकाशनाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी पीआयसीचे उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, मानस संचालक प्रशांत गिरबाने आणि लेखक उमेश कुडाळकर उपस्थित होते.जाधव म्हणाले की, जगभरातील बहुराष्ट्रीय कंपन्यांनी इंटरनेट, त्यांचे उत्पादन आणि विविध सेवांमुळे भारतात परदेशी गुंतवणुकीचे जाळे विस्तारले आहे. गेल्या पाच वर्षांत चीनच्या नऊ आणि ११ अमेरिकन कंपन्यांचा त्यात समावेश आहे. आपण फक्त कंपन्यांचे ग्राहक बनत आहोत; मात्र त्याचा आपल्याला काहीच फायदा मिळत नाही. भारतात १३० कोटींचे मार्केट त्यांना सहजपणे उपलब्ध झाले आहे; मात्र या सगळ्या चित्रात भारतीय केवळ बघे किंवा उपभोक्त्याच्याच भूमिकेत आहेत. मायक्रोसॉफ्ट, गुगल, फेसबुकसारख्या इंटरनेट विश्वातील बलाढ्य कंपन्या भारतीय बाजारपेठ काबीज करीत आहेत.‘लिस्ट इन इंडिया’ प्रबंधाविषयी सांगताना उमेश कुडाळकर यांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांचे अपरिहार्य जाळे आणि त्यांच्या एकाधिकारशाहीवर भाष्य केले. ते म्हणाले की, जनता सरकारने १९७८ मध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांना ६० टक्के समभाग स्थानिक गुंतवणुकीदारांसाठी खुले करण्याचे धोरण अवलंबिले होते. डॉ. विजय केळकर यांनीही विचार व्यक्त केले. विचारलेल्या प्रश्नांना डॉ. नरेंद्र जाधव आणि उमेश कुडाळकर यांनी उत्तरे दिली.वेगळ्या प्रकारचे आक्रमण सुरू...सध्या भारतावर पुलवामा सारख्या हल्ल्याबरोबरच वेगळ्या प्रकारेदेखील आक्रमण सुरू आहे. चीनच्या पेटीएम कंपनीने रिझर्व्ह बँकेकडे ‘नॉन बँक फायनान्स कंपनी’ म्हणून मान्यता मिळण्यासाठी अर्ज केला आहे.जर या कंपनीला मान्यता मिळाली, तर भारतीयांचा संपूर्ण डेटा या कंपनीकडे जाऊ शकतो. तो गेल्यानंतर भारतीयांच्या संपूर्ण माहितीचा एखाद्या शस्त्रासारखा गैरवापर केला जाण्याची शक्यता नाकारता येत नसून, त्यातून राष्ट्रीय सुरक्षेला मोठी हानी पोहोचू शकते असा सूचक इशारा दिला आहे, असे जाधव म्हणाले.