शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

धर्म किंवा राष्ट्रवादाच्या नजरेतील भारत अपूर्ण आणि असहिष्णू : डॉ गणेश देवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:13 IST

पुणे : भारताची संस्कृती ही बहुभाषिक आहे. ही संस्कृती अहिंसक नव्हती; पण एकापेक्षा अनेक भाषा आणि समाज असू ...

पुणे : भारताची संस्कृती ही बहुभाषिक आहे. ही संस्कृती अहिंसक नव्हती; पण एकापेक्षा अनेक भाषा आणि समाज असू शकतो हे स्वीकारणारी ती सहिष्णू संस्कृती होती. भारताकडे केवळ भाषेच्या नजरेतून पाहणे सार्थ ठरेल. धर्म किंवा राष्ट्रवादाच्या नजरेतील भारत अपूर्ण आणि असहिष्णू आहे, असे परखड मत ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी शनिवारी केले.

ग्रंथाली, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभाग व साधू कुटुंबीय यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अरुण साधू स्मृतिव्याख्यानामध्ये ‘भाषांच्या नजरेतून भारत’ या विषयावर ते बोलत होते. अविनाश पोईनकर, नीलेश बुधावले आणि शर्मिष्ठा भोसले यांना अरुण साधू पाठ्यवृत्ती जाहीर करण्यात आली. पाठ्यवृत्तीप्राप्त मेघना ढोके, मुक्ता चैतन्य आणि दत्ता जाधव यांनी अभ्यासलेल्या विषयांच्या पुस्तकांचे तसेच अरुण साधू लिखित ‘माझ्या मराठीचा बोल’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. अरुण साधू यांच्या पत्नी अरुणा साधू, कन्या सुवर्णा साधू, शेफाली साधू, ग्रंथालीचे धनंजय गांगल, सुदेश हिंगलासपूरकर उपस्थित होते. ज्येष्ठ संपादक आणि खासदार कुमार केतकर, वृत्तपत्रविद्या विभाग प्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे आणि पत्रकार पराग करंदीकर यांनी मनोगत व्यक्त केले.

हडप्पा संस्कृतीनंतर पाचशे वर्षांनी इ. स. पूर्व १५०० मध्ये वैदिक संस्कृती सुरू झाली. त्याआधी द्राविडी, प्राकृत, पाली या भाषा होत्या. भाषा एकत्र येणे आणि एकमेकांची अक्षरे स्वीकारणे, यातून भारतीयांनी संबंध टिकवून ठेवले. भारतीय संस्कृती बहुभाषिक राहिली. संस्कृतमधील अनेक तज्ज्ञ अन्य भाषा जाणत असल्याची नोंद आहे. कालिदासाच्या नाटकातील पात्र चार-पाच भाषा बोलायची. या समाजावर सनातनी धर्म लादला गेला. बहुभाषिक समाजाला छळले गेले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

------