शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

धर्म किंवा राष्ट्रवादाच्या नजरेतील भारत अपूर्ण आणि असहिष्णू : डॉ गणेश देवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:13 IST

पुणे : भारताची संस्कृती ही बहुभाषिक आहे. ही संस्कृती अहिंसक नव्हती; पण एकापेक्षा अनेक भाषा आणि समाज असू ...

पुणे : भारताची संस्कृती ही बहुभाषिक आहे. ही संस्कृती अहिंसक नव्हती; पण एकापेक्षा अनेक भाषा आणि समाज असू शकतो हे स्वीकारणारी ती सहिष्णू संस्कृती होती. भारताकडे केवळ भाषेच्या नजरेतून पाहणे सार्थ ठरेल. धर्म किंवा राष्ट्रवादाच्या नजरेतील भारत अपूर्ण आणि असहिष्णू आहे, असे परखड मत ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी शनिवारी केले.

ग्रंथाली, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभाग व साधू कुटुंबीय यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अरुण साधू स्मृतिव्याख्यानामध्ये ‘भाषांच्या नजरेतून भारत’ या विषयावर ते बोलत होते. अविनाश पोईनकर, नीलेश बुधावले आणि शर्मिष्ठा भोसले यांना अरुण साधू पाठ्यवृत्ती जाहीर करण्यात आली. पाठ्यवृत्तीप्राप्त मेघना ढोके, मुक्ता चैतन्य आणि दत्ता जाधव यांनी अभ्यासलेल्या विषयांच्या पुस्तकांचे तसेच अरुण साधू लिखित ‘माझ्या मराठीचा बोल’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. अरुण साधू यांच्या पत्नी अरुणा साधू, कन्या सुवर्णा साधू, शेफाली साधू, ग्रंथालीचे धनंजय गांगल, सुदेश हिंगलासपूरकर उपस्थित होते. ज्येष्ठ संपादक आणि खासदार कुमार केतकर, वृत्तपत्रविद्या विभाग प्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे आणि पत्रकार पराग करंदीकर यांनी मनोगत व्यक्त केले.

हडप्पा संस्कृतीनंतर पाचशे वर्षांनी इ. स. पूर्व १५०० मध्ये वैदिक संस्कृती सुरू झाली. त्याआधी द्राविडी, प्राकृत, पाली या भाषा होत्या. भाषा एकत्र येणे आणि एकमेकांची अक्षरे स्वीकारणे, यातून भारतीयांनी संबंध टिकवून ठेवले. भारतीय संस्कृती बहुभाषिक राहिली. संस्कृतमधील अनेक तज्ज्ञ अन्य भाषा जाणत असल्याची नोंद आहे. कालिदासाच्या नाटकातील पात्र चार-पाच भाषा बोलायची. या समाजावर सनातनी धर्म लादला गेला. बहुभाषिक समाजाला छळले गेले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

------