शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
4
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
5
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
6
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
7
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
8
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
9
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
10
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
11
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
12
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
13
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
14
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
15
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
16
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
19
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
20
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा

धर्म किंवा राष्ट्रवादाच्या नजरेतील भारत अपूर्ण आणि असहिष्णू : डॉ गणेश देवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:13 IST

पुणे : भारताची संस्कृती ही बहुभाषिक आहे. ही संस्कृती अहिंसक नव्हती; पण एकापेक्षा अनेक भाषा आणि समाज असू ...

पुणे : भारताची संस्कृती ही बहुभाषिक आहे. ही संस्कृती अहिंसक नव्हती; पण एकापेक्षा अनेक भाषा आणि समाज असू शकतो हे स्वीकारणारी ती सहिष्णू संस्कृती होती. भारताकडे केवळ भाषेच्या नजरेतून पाहणे सार्थ ठरेल. धर्म किंवा राष्ट्रवादाच्या नजरेतील भारत अपूर्ण आणि असहिष्णू आहे, असे परखड मत ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी शनिवारी केले.

ग्रंथाली, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभाग व साधू कुटुंबीय यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अरुण साधू स्मृतिव्याख्यानामध्ये ‘भाषांच्या नजरेतून भारत’ या विषयावर ते बोलत होते. अविनाश पोईनकर, नीलेश बुधावले आणि शर्मिष्ठा भोसले यांना अरुण साधू पाठ्यवृत्ती जाहीर करण्यात आली. पाठ्यवृत्तीप्राप्त मेघना ढोके, मुक्ता चैतन्य आणि दत्ता जाधव यांनी अभ्यासलेल्या विषयांच्या पुस्तकांचे तसेच अरुण साधू लिखित ‘माझ्या मराठीचा बोल’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. अरुण साधू यांच्या पत्नी अरुणा साधू, कन्या सुवर्णा साधू, शेफाली साधू, ग्रंथालीचे धनंजय गांगल, सुदेश हिंगलासपूरकर उपस्थित होते. ज्येष्ठ संपादक आणि खासदार कुमार केतकर, वृत्तपत्रविद्या विभाग प्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे आणि पत्रकार पराग करंदीकर यांनी मनोगत व्यक्त केले.

हडप्पा संस्कृतीनंतर पाचशे वर्षांनी इ. स. पूर्व १५०० मध्ये वैदिक संस्कृती सुरू झाली. त्याआधी द्राविडी, प्राकृत, पाली या भाषा होत्या. भाषा एकत्र येणे आणि एकमेकांची अक्षरे स्वीकारणे, यातून भारतीयांनी संबंध टिकवून ठेवले. भारतीय संस्कृती बहुभाषिक राहिली. संस्कृतमधील अनेक तज्ज्ञ अन्य भाषा जाणत असल्याची नोंद आहे. कालिदासाच्या नाटकातील पात्र चार-पाच भाषा बोलायची. या समाजावर सनातनी धर्म लादला गेला. बहुभाषिक समाजाला छळले गेले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

------