शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
4
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
5
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
6
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
7
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
8
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
9
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
10
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
11
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
14
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
15
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
16
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
17
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
18
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
19
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
20
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?

जागतिक दर्जाचे नेतृत्व निर्माण करण्याची जबाबदारी भारताची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:15 IST

पुणे : जगातील सर्वच क्षेत्रांतील जागतिक दर्जाचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व निर्माण करण्याची जबाबदारी आता भारताकडे आली आहे. त्यामुळे देशाने या ...

पुणे : जगातील सर्वच क्षेत्रांतील जागतिक दर्जाचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व निर्माण करण्याची जबाबदारी आता भारताकडे आली आहे. त्यामुळे देशाने या दिशेने कार्य करावे. त्यात शिक्षण संस्थांची भूमिका ही महत्त्वाची आहे. त्यांनी गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांची निर्मिती करण्यावर अधिक भर द्यावा,’ असे प्रतिपादन यूएसए येथील जागतिक कीर्तीचे व्यावसायिक सल्लागार, लेखक आणि विचारवंत डॉ. राम चरण यांनी केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, भारत अस्मिता फाउंडेशन व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे डॉ. राम चरण यांना ‘भारत अस्मिता विशेष पुरस्कार’ देऊन सन्मानित केले. या वेळी हार्वर्ड बिझनेस स्कूलचे अधिष्ठाता डॉ. श्रीकांत दातार, लडाख येथील खासदार जामयांग त्सेरिंग नामग्याल, बायोकॉनच्या कार्यकारी अध्यक्षा डॉ. किरण मुजुमदार शॉ, किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे आणि चित्रपट निर्मात्या व लेखिका सई परांजपे यांना ‘भारत अस्मिता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर व एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड व कुलगुरू डॉ. एन. टी. राव उपस्थित होते.

डॉ. रामचरण म्हणाले, देशाचे नेतृत्व करताना आज हॉवर्ड बिजनेस स्कूलमध्ये २२ सदस्य हे भारतीय आहेत. त्यात डॉ. दातार हे मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत असून ते जागतिक दर्जाचे नेतृत्व करून ग्लोबल लीडर्सची निर्मिती करीत आहेत. कोणत्याही क्षेत्रात असो, समर्पण भावनेने केलेल्या कार्याला यश मिळतेच. जागतिक दर्जाचे नेतृत्व करणारे गुगलचे सुंदर पिचाई हे भारतीय आहेत.

डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, आपण कसे जगावे आणि जगू नये याचे ज्ञान अध्यात्म देते. त्यामुळे हा प्रवास संत ज्ञानेश्वर ते अल्बर्ट आइन्स्टाइनपर्यंतचा आहे. कोणीही आपले कर्तव्य विसरू नये.

डॉ. रघुनाथ माशेलकर,डॉ. विजय भटकर, राहुल शिंदे यांच्यासह सर्व पारितोषिक विजेत्यांनी मनोगत व्यक्त केले.