शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
3
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
4
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
5
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
6
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
7
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
8
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट
9
नववधूने 'ती' मागणी पूर्ण केली नाही; संतापलेल्या पतीने केलं असं काही की ऐकून येईल राग!
10
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
11
"आधी पैसे दे मग बायको घे", EMI न भरल्याने थेट महिलेला उचलून घेऊन गेले बँकवाले, नवरा म्हणतो...
12
Stock Market Today: ट्रम्प टॅरिफ बॉम्बनंतर शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ५३० अंकांनी आपटला; ऑटो-रियल्टीमध्ये विक्री
13
Viral Video : सलाम तुझ्या जिद्दीला! हात नसतानाही तो करतोय बांधकाम; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
14
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
15
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
16
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
17
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
18
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
19
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
20
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश

येणारा काळ भारताचाच !

By admin | Updated: February 28, 2017 06:51 IST

माणसाचा जगण्याचा शोध सुरू झाला आणि विज्ञानाचा जन्म झाला.

-डॉ. विजय भटकर

माणसाचा जगण्याचा शोध सुरू झाला आणि विज्ञानाचा जन्म झाला. तेव्हापासूनच माणूस संशोधक, शास्त्रज्ञ राहिलेला आहे. जगायच्या धडपडीतून त्याने दगडाची, धातूची अवजारे बनवायला सुरुवात केली. हा नवा शोधच होता. पुढे आगीचा शोध लागला... प्रत्येक दशकात आपण प्रगत होत होतोच; पण विसाव्या शतकातील वैज्ञानिक प्रगतीचा वेग हा थक्क करणारा आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपण कमालीची झेप घेतलेली आहे. प्रत्येक दशकात लागलेले शोध असा जर एक आलेख मांडला, तर त्यात विसाव्या शतकात तंत्रज्ञानाचा विस्फोट झाला आहे हे लक्षात येते. त्यातून नवनवे आविष्कार जन्माला येतात. हे सारे शोध मानवी जीवनाशी एकरूप झालेले आहेत. लहानपणी गावात कार आली तरी मुलं त्याच्या मागे धावायची; आता मात्र क्षणाक्षणाला जगातील तंत्रज्ञान बदलतंय. त्याच्याशी जुळवून घेताना प्रत्यक्ष माणसाचीही दमछाक होतेय. वैद्यकीय तंत्रज्ञानात तर आपण इतकी प्रगती केलीय की तुटलेले अवयव आपण जोडू शकतो, ट्रान्सप्लांट करू शकतो, थांबलेलं हृदय सुरू करू शकतो. आता तर मानव आणि तंत्रज्ञान सोबत काम करताहेत. येणारा काळ हा तर मानवी शरीरावर तंत्रज्ञानाचा प्रभाव असेल. शरीरात विविध चिप्स बसवल्या जातील व ते माणसाचे जगणे अधिक सोपे करतील. एका अर्थाने हे तंत्रज्ञान माणसाच्या शरीरात शिरू पाहत आहे. यंत्र कोण आणि माणूस कोण अशी परिस्थिती येणाऱ्या काळात निर्माण होऊ शकेल. व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीमधून बाहेर पडून यंत्र आणि मानव हा भेदच कमी होईल की काय अशी शक्यता आता निर्माण होत आहे. (कोलंबस वाट का चुकला ?)माणसामाणसांत त्यामुळे दुरावा येतो आहे. बदलाचा वेग प्रचंड आहे. लहान मुले नवी यंत्रे चटकन आत्मसात करू शकतात, असा अनुभव आपल्याला येतो. ती शक्ती निसर्गत:च त्यांना दिलेली असते. हे बदल आपण थांबवू शकत नाही. प्रत्येक समस्या निर्माण झाली की त्याच्या निराकरणासाठी नवा शोध लावला जातो. हे चक्र अव्याहतपणे सुरू राहते. संगणकावर अतिक्रमण करणारे व्हायरस तयार झाले. त्यातून पुढे अँटीव्हायरस आले. आज म्हणूनच विज्ञानाचा खरा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर मूलभूत विज्ञानाकडे वळावे लागेल.(अवघा देश ‘विज्ञानाभिमुख’ व्हावा)येणाऱ्या भारताचे भविष्य अत्यंत उज्ज्वल आणि सकारात्मक असेल असे मला वाटते. विज्ञान-तंत्रज्ञान, संगणक, खगोलशास्त्र, आयटी, मेडिकल अशा सर्वच क्षेत्रांत जगातील अग्रगण्य अशा पहिल्या पाच देशांत आपण आहोत. ही खरोखर अभिमानाची बाब आहे. मात्र हे सारे असताना आपल्या देशाची संशोधन व विकासावर होणारी गुंतवणूक जगाच्या तुलनेत फारच अल्प आहे. एखाद्या मोठ्या कंपनीच्या गुंतवणुकीपेक्षाही ते कमी आहे. सध्या ते १ टक्क्यापेक्षाही कमी आहे. ते वाढवण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी संशोधन विद्यापीठे वाढवावी लागतील. संशोधनपूरक व प्रेरक असे वातावरण उभे करावे लागेल. सध्या चीनपेक्षा आपण मागे आहोत; परंतु आपल्याकडे लोकशाही व्यवस्था असताना आपण जो काही चमत्कार केला आहे तो खरोखर उल्लेखनीय आहे. येणारा काळ भारताचाच आहे, हे मात्र निश्चित.>महान शास्त्रज्ञांनी जग बदलणारे जे जे शोध लावले त्यामध्ये त्यांनी कधीही पैशाकडे पाहून काम केले नाही. मात्र सध्या सर्वच गोष्टी पैसाकेंद्रीत झालेल्या आहेत. संशोधन करायचे तर त्यासाठी वेळ द्यावा लागतो. कष्ट उपसावे लागतात. केवळ फायद्याचा विचार करून चालत नाही. मुलभूत विज्ञानाचा अभ्यास त्यामुळेच सर्वार्थाने महत्त्वाचा आहे. त्यासाठी शालेय स्तरापासून इन्स्पायरसारखे उपक्रम राबवले जात आहेत. आयआयटीमध्ये मुलभूत विज्ञानावर भर दिला जात आहे. या साऱ्या सकारात्मक दिशेने होत असलेल्या गोष्टी आहेत.

(लेखक प्रख्यात संगणकतज्ज्ञ व महापरमसंगणकाचे निर्माते आहेत.)