शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

भारत-बांगलादेशाचे संबंध घट्ट होण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:12 IST

पुणे : पाकिस्तानी लष्करी सैनिकांनी बांगलादेशातील नागरिकांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार केले. १९७१ जो लढा दिला त्यामध्ये भारतीय लष्कराने महत्त्वाची ...

पुणे : पाकिस्तानी लष्करी सैनिकांनी बांगलादेशातील नागरिकांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार केले. १९७१ जो लढा दिला त्यामध्ये भारतीय लष्कराने महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारताला शेजारील देशांसोबत चांगले संबंध ठेवणे गरजेचे आहे. भारताचे बांगलादेशासोबत सामाजिक, आर्थिक, व्यापारी संबंध घट्ट होणे गरजेचे आहे, असे मत निवृत्त लेफ्टनंट कर्नल काझी सज्जाद अली झहीर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि सेंटर फॉर ऍडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानात निवृत्त लेफ्टनंट कर्नल अली झहीर ‘द हिस्ट्री अनफोल्डिंग’ या विषयावर ऑनलाईन बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी निवृत्त लेफ्टनंट जनरल एस. एस. मेहता होते. बांगलादेशाचे मुंबईतील उप-उच्च्यायुक्त मोहम्मद लुत्फुर रहमान, शहाबुद्दीन अहमद ऑनलाईन उपस्थित होते. भारतीय लष्कराने १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयाचे ५० वे वर्ष आहे.

रहमान म्हणाले की, भारत आणि बांगलादेशाचे संबंध नेहमी शांततापूर्ण राहिले आहेत. १९४७ तसेच १९७१ च्या इतिहासापासून मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले आहेत. बांगलादेशाला पायाभूत सुविधा, शाश्वत विकासकामांसाठी आर्थिक मदत केली आहे. ऊर्जा आणि इतर क्षेत्रात भारताच्या कंपन्या काम करतात. २०१९ मध्ये या दोन देशांच्या राष्ट्रपतींमध्ये विकासाठी व्यापार, ऊर्जा, रोजगार आदी सामंजस्य करार झाले आहेत.

भारतात बांगला पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. गेल्या एक वर्षांपासून कोरोनाकाळात भारताची मोठी मदत बांगलादेशाला होत आहे. दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांच्या दूरदृष्टीमुळे मैत्रीपूर्ण संबंध घट्ट राहिलेले आहेत. यापुढील काळातही कायमचे मैत्रीपूर्ण संबंध राहण्याची गरज आहे, अशी आशा रहमान यांनी व्यक्त केली.