शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

भारत-बांगलादेशाचे संबंध घट्ट होण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:12 IST

पुणे : पाकिस्तानी लष्करी सैनिकांनी बांगलादेशातील नागरिकांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार केले. १९७१ जो लढा दिला त्यामध्ये भारतीय लष्कराने महत्त्वाची ...

पुणे : पाकिस्तानी लष्करी सैनिकांनी बांगलादेशातील नागरिकांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार केले. १९७१ जो लढा दिला त्यामध्ये भारतीय लष्कराने महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारताला शेजारील देशांसोबत चांगले संबंध ठेवणे गरजेचे आहे. भारताचे बांगलादेशासोबत सामाजिक, आर्थिक, व्यापारी संबंध घट्ट होणे गरजेचे आहे, असे मत निवृत्त लेफ्टनंट कर्नल काझी सज्जाद अली झहीर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि सेंटर फॉर ऍडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानात निवृत्त लेफ्टनंट कर्नल अली झहीर ‘द हिस्ट्री अनफोल्डिंग’ या विषयावर ऑनलाईन बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी निवृत्त लेफ्टनंट जनरल एस. एस. मेहता होते. बांगलादेशाचे मुंबईतील उप-उच्च्यायुक्त मोहम्मद लुत्फुर रहमान, शहाबुद्दीन अहमद ऑनलाईन उपस्थित होते. भारतीय लष्कराने १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयाचे ५० वे वर्ष आहे.

रहमान म्हणाले की, भारत आणि बांगलादेशाचे संबंध नेहमी शांततापूर्ण राहिले आहेत. १९४७ तसेच १९७१ च्या इतिहासापासून मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले आहेत. बांगलादेशाला पायाभूत सुविधा, शाश्वत विकासकामांसाठी आर्थिक मदत केली आहे. ऊर्जा आणि इतर क्षेत्रात भारताच्या कंपन्या काम करतात. २०१९ मध्ये या दोन देशांच्या राष्ट्रपतींमध्ये विकासाठी व्यापार, ऊर्जा, रोजगार आदी सामंजस्य करार झाले आहेत.

भारतात बांगला पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. गेल्या एक वर्षांपासून कोरोनाकाळात भारताची मोठी मदत बांगलादेशाला होत आहे. दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांच्या दूरदृष्टीमुळे मैत्रीपूर्ण संबंध घट्ट राहिलेले आहेत. यापुढील काळातही कायमचे मैत्रीपूर्ण संबंध राहण्याची गरज आहे, अशी आशा रहमान यांनी व्यक्त केली.