शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

भारत बंद २६ ला कायद्याची होळी २८ मार्चला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : चार महिने होऊनही दिल्लीतील शेतकरी आंदोलनाकडे सरकार लक्ष देत नाही याचा निषेध म्हणून स्वयंसेवी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : चार महिने होऊनही दिल्लीतील शेतकरी आंदोलनाकडे सरकार लक्ष देत नाही याचा निषेध म्हणून स्वयंसेवी संस्था संघटनांनी २६ मार्चला भारत बंदची हाक दिली आहे. राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे पक्षही यात सहभागी होणार आहेत. याबरोबरच २८ मार्चला होळीच्या दिवशी नव्या कायद्याची होळी करणार आहे.

आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी स्थापन करणाऱ्या जन आंदोलनाच्या संघर्ष समितीचे पदाधिकारी उल्का महाजन, विश्वास उटगी यांनी ही माहिती दिली. संजीव साने यांनी या ऑनलाईन पत्रकार परिषदेचे संयोजन केले. महाजन व ‌उटगी यांनी या वेळी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली.

ज्यांच्यासाठी कायदा केला असे केंद्र सरकार सांगत आहे ते शेतकरीच त्याला विरोध करत आहेत. कोणालाही विश्वासात न घेता देशातील शेती ही कंपन्यांच्या घशात घालण्याचा हा प्रयत्न आहे. कामगार संघटनांना काहीही न कळवता त्यांच्यासाठी असलेले ४४ कायदे बदलून ४ नवे, त्यांचे अहित करणारे कायदे अमलात आणले जात आहेत. या सर्वांचा विरोध म्हणून भारत बंदची हाक दिली आहे, असे उटगी व महाजन म्हणाले.

यात ११० संघटना सहभागी होत आहेत. भाजपा वगळता सर्व राजकीय पक्षांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. रस्ता किंवा रेल्वेसह कोणतेही वाहन यात बंद केले जाणार नाही. फक्त दिवसभर काम बंद राहील. राज्यातील ३६ जिल्हे, ४०० तहसील कार्यालयांमध्ये निवेदन दिले जाईल. याबरोबरच २८ मार्चला सर्व कार्यकर्ते एकत्र जमून सरकारने बदल केलेल्या कायद्याच्या प्रतींची होळी करतील, अशी माहिती उटगी व महाजन यांनी दिली.