शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

स्वतंत्र आयोग नेमूण ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:09 IST

नारायणगाव : राज्य सरकारने स्वतंत्र आयोग नेमूण स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे , अशी मागणी 'महात्मा फुले ...

नारायणगाव : राज्य सरकारने स्वतंत्र आयोग नेमूण स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे , अशी मागणी 'महात्मा फुले ब्रिगेड,अखिल भारतीय समता परिषद, महात्मा फुले विचार मंच जुन्नर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार हणमंत कोळेकर यांना देण्यात आले आहे.

या वेळी महात्मा फुले ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष दत्ता शिंदे, समता परिषद जुन्नर अध्यक्ष आत्माराम संते, संदीप नाईक, डी एल मस्के, एम डी भुजबळ, हेमंत कोल्हे, वसंत काफरे, संजय डोके, सचिन वऱ्हाडी, सुमंत मेहेर, ज्ञानेश्वर कोल्हे, बाळासो भुजबळ, संचित कोल्हे, गणेश बेळे, सचिन काफरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

दिलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे की, धुळे, नंदुरबार, पालघर, वाशिम, अकोला व नागपूर येथील १९ जिल्हा परिषद सदस्यांना एकूण आरक्षणाच्या ५० टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण देता येणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्च २०२१ अपात्र ठरवले होते. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार व १९ लोकप्रतिनिधी यांच्यावतीने पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेली होती, ती याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील संपूर्ण ओबीसी समाजात असंतोषाचे वातावरण आहे. राज्य सरकारने स्वतंत्र आयोग नेमून स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसीचे आरक्षण पूर्ववत करावे अशी मागणी महात्मा फुले ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष दत्ता शिंदे, अखिल भारतीय समता परिषदचे जुन्नर तालुका अध्यक्ष आत्माराम संते यांनी केली आहे.

७ मे २०२१ ला परिपत्रक काढून पदोन्नतीमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व्हिजेएनटी व एसबीसीचे आरक्षण रद्द केले. २०१६ साली स्वरूपसिंह नाईक यांच्या समितीने दिलेल्या अहवालानुसार ओबीसींना ही पदोन्नतीत १९ टक्के आरक्षण देण्याचे हेतुपुरस्सर टाळले. ५२ टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या ओबीसी समाजाला मंडल आयोगाप्रमाने मिळालेल्या आरक्षणाला राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे गमवावे लागत असल्याचेही म्हटले आहे.

२५ नारायणगाव

तहसीलदारांना निवेदन देताना दत्ता शिंदे, आत्माराम संते व पदाधिकारी.