शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरचा ३० वर्षांपासुन धगधगणारा पाणीप्रश्न मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:10 IST

कळस : इंदापूर तालुक्यातील महत्त्वाच्या पाणी प्रश्नांना मंजुरी मिळाल्याने पाणी प्रश्नांवरून होणारे राजकारण आता थांबणार आहे. प्रत्येक निवडणुकीला पाण्यावरून ...

कळस : इंदापूर तालुक्यातील महत्त्वाच्या पाणी प्रश्नांना मंजुरी मिळाल्याने पाणी प्रश्नांवरून होणारे राजकारण आता थांबणार आहे. प्रत्येक निवडणुकीला पाण्यावरून राजकारण तापत होते. गेली ३० वर्षांपासून धगधगणाऱ्या खडकवासला कालव्यावरील ३६ गावांचा व निरा डावा कालव्यावरील २२ गावांचा पाणी प्रश्न उजनीवरील उपसा सिंचनाला मंजुरी मिळाल्याने आता मार्गी लागणार आहे. त्यामुळे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर मोठे राजकीय आव्हान निर्माण होण्याचे संकेत आहेत.

तालुक्यातील निवडणुकीत पाणीप्रश्न हा नेहमीच गाजतो. मात्र, तालुक्याचे आमदार व राज्यमंत्री भरणे यांनी या प्रश्नाला प्राधान्य देण्याचे ठरवून पाठपुरावा केला. त्यामुळे अर्थसंकल्पात लाकडी निंबोडी उपसिंचनासाठी तरतूद करून खडकवासला व निरा डावा कालव्यावरील उजनी उपसाला मंजुरी मिळवून पाणीप्रश्न निकालात काढला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी हे प्रकल्प पूर्ण होणार असल्याने भरणे यांना त्याचा मोठा राजकीय फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खडकवासला कालव्याचा पट्टा हा अवर्षण प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या पट्ट्यात तालुक्याच्या इतर भागाच्या तुलनेत पर्जन्यमान कमी असते. कालव्याला पाणीही कधीच वेळेवर येत नसल्याने या भागातील शेतकरी अडचणीत आला होता. तसेच खडकवासला धरणसाखळीतील पाण्यावरून पुणे शहर व ग्रामीण हा वाद विकोपाला जात होता. तालुक्यांमधील सुमारे २० हजार हेक्टर शेती सिंचनासाठी या कालव्यावर अवलंबून आहे. शहराच्या वाढत्या पाणी मागणीमुळे या भागातील फळबागा व शेती अडचणीत येत होती. दरवर्षी उन्हाळ्यात आवर्तन देण्यास टाळाटाळ केली जाते. महत्वाच्या या पाणीप्रश्नी कायम सापत्नभावाची वागणूक ग्रामीण भागाला दिली जात होती. इंदापूर शहराचा पाणीपुरवठा व शेकडो ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजना या कालव्यावर अवलंबून आहेत.

शेतीव्यवस्था बारमाही सिंचनाअभावी संकटात होती. या भागातील द्राक्षे, डाळिंब, ऊस, फूलशेती नेहमीच अडचणीत राहिली. तसेच पिण्याच्या पाण्याचीही अवस्था उन्हाळ्यात गंभीर होत होती. नवीन उपसा सिंचनमुळे शेटफळगढेपासून बेडशिंगेपर्यंत सुमारे ३६ गावांमधील क्षेत्र बारमाही ओलिताखाली येणार आहे.

तसेच खडकवासला कालव्यावरून सणसर जोड कालव्यामधून २२ गावांना पाणी देण्यासाठी अनेक संघर्ष झाला. अनेक वेळा आंदोलने झाली, मात्र अंथुर्णेपासून पुढे २२ गावांना बारमाही पाणी मिळवण्यासाठी गेली ३० वर्षे लढा चालू होता. मात्र खडकवासला धरणसाखळीत पाणी कमी राहत असल्याने अडचणी येत होत्या. आता या गावानाही त्याचा मोठा फायदा होणार आहे.