शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

इंदापूर तालुक्याला पाच टीएमसी पाणी मिळालेच पाहिजे : श्रीमंत ढोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:10 IST

इंदापूर तालुक्यातील पाणीसंघर्ष कृती समितीचे शिष्टमंडळ खासदार सुप्रिया सुळे यांना मुंबई येथे हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, या मागणीसाठी मंगळवार ...

इंदापूर तालुक्यातील पाणीसंघर्ष कृती समितीचे शिष्टमंडळ खासदार सुप्रिया सुळे यांना मुंबई येथे हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, या मागणीसाठी मंगळवार ( दि. २५ ) रोजी भेटले. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष श्रीमंत ढोले, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, जलतज्ञ बाळासाहेब करगळ, ज्येष्ठ नेते दत्तात्रय घोगरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, नवनाथ रुपनवर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

यावेळी कृती समितीचे तालुकाध्यक्ष श्रीमंत ढोले म्हणाले की, पुणे शहराची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे, त्यामुळे ही लोकसंख्या वाढत असताना, इंदापूर तालुक्याच्या वाट्याचे पाणी सतत कमी झाले आहे. उजनी धरण निर्मितीसाठी सोलापूर जिल्ह्यापेक्षा सर्वात मोठा त्याग इंदापूर तालुक्याचा आहे. जवळपास ३६ हजार एकर जमीन इंदापूर तालुक्याने या उजनी जलाशयासाठी अक्षरशः दान दिल्यासारखी दिली आहे. यामध्ये ३३ गावे गेलेली आहेत. यापैकी ज्या शेतकऱ्यांना पुनर्वसन करून सोलापुरात जिल्ह्यामध्ये जागा दिल्या. अशा इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना जमिनी हिसकावून घेऊन त्यांच्यावर अरेरावी करून त्यांना इंदापूरला पळवून लावले आहे. ही यादी देखील आम्ही वेळ पडल्यावर प्रसिद्ध करणार आहोत अशी माहिती कृती समितीचे अध्यक्ष श्रीमंत ढोले यांनी दिली.

उजनी धरणासाठी तालुक्याचा त्याग जास्त असल्यामुळे, आमच्या हक्काचे पाच टीएमसी पाणी मिळणे अत्यंत गरजेचे आहे.हे पाच टीएमसी पाणी उजनी धरणातून शासनाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याला देण्याची भूमिका आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील काही नेते उगीच हस्तक्षेप करतात त्यांनी हस्तक्षेप थांबवावा, अशी विनंती देखील शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष श्रीमंत ढोले यांनी केली आहे.

सोलापूरमध्ये पुनर्वसन झालेल्या जमिनी आमच्या शेतकऱ्यांना द्या

शिष्टमंडळाची बाजू मांडताना जलतज्ज्ञ बाळासाहेब करगळ म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची सोलापूर जिल्ह्यामध्ये जे पुनर्वसन झाले आहे. तेथील जमिनी देखील आम्हाला पुन्हा मिळाल्या पाहिजेत व संबंधित अधिकार देखील कायम राहिले पाहिजेत. जी गावठाण सोलापूर जिल्ह्यातील लोकांनी हिसकावून घेतले आहेत ती देखील आम्हाच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाली पाहिजेत. असाही आग्रह जलतज्ज्ञ बाळासाहेब करगळ यांनी धरला आहे.

इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्यावाचून उपेक्षित ठेवले जाणार नाही .

सोलापूर जिल्ह्याचे उजनी धरणातील वाट्याचे जेेवढे टीएमसी पाणी आहे. यामध्ये कोठेही बाधा येणार नाही. परंतु इंदापूर तालुक्याला न्याय मिळणारच हक्काच्या पाण्यावाचून उपेक्षित ठेवले जाणार नाही. असा शब्द खासदार सुप्रिया सुळे यांनी मी शेतकरी शिष्टमंडळाला दिला आहे अशीही माहिती कृती समितीचे अध्यक्ष श्रीमंत ढोले यांनी दिली.

शेतकरी कृती समितीच्या वतीनेखासदार सुप्रिया सुळे यांना निवेदन देताना कृती समितीचे पदाधिकारी व शेतकरी.