शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

इंदापूर तालुक्याचा विकास काँग्रेसमुळे

By admin | Updated: October 13, 2014 23:24 IST

काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करतो. इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. इंदापूर तालुक्याने राज्याला नेतृत्व दिले आहे.

इंदापूर : काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करतो. इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. इंदापूर तालुक्याने राज्याला नेतृत्व दिले आहे. त्यामुळे या तालुक्याच्या विकासासाठी पुन्हा काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला सहकार्य करा. केंद्रातील भाजपप्रणीत सरकारमुळे सामान्य जनतेला वाईट दिवस आले आहेत, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी केली. 
इंदापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत दिग्विजयसिंह बोलत होते. अभिनेता रितेश देशमुख या सभेचे खास आकर्षण ठरला. त्याने केलेल्या खुमासदार भाषणाने उपस्थितांची मने जिंकली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ही सभा पार पडली.
हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्याचा विकास केला आहे. त्यांच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे इंदापूरकर काँग्रेसच्या पाठीशी राहतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘‘ज्यांचे बोट धरून राजकारणात आले, त्यांच्या मुलीच्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना प्रचाराला वेळ मिळाला नाही. आम्ही प्रामाणिकपणो काम केले. मतांचे मताधिक्य दिले. विधानसभेसाठी मात्र वेगळी चूल मांडायची, हा नेहमीचा डाव असतो. परंतु, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलेल्या विकासामुळे इंदापूरकर आमच्याबरोबरच आहेत, हे निवडणूक निकालात स्पष्ट होईल. इंदापुरातल्या सर्व सहकारी संस्था आम्ही स्थापन केल्या. अजित पवार मात्र दुस:यांनी सुरू केलेल्या संस्थांवर ठाण मांडून बसले आहेत. इंदापुरातील सहकारी संस्थांचे काम अजित पवारांनी पाहावे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर, माळेगाव कारखान्यांची सध्या काय अवस्था आहे, याकडे पवार यांनी लक्ष द्यावे.’’या वेळी विलासराव वाघमोडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.  (वार्ताहर)
 
4दिग्विजयसिंह म्हणाले, ‘‘15 वर्षात आघाडीचे सरकार राज्यात यशस्वीरीत्या काँग्रेसने चालविले. काँग्रेसच्या हाताला धरून मोठे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी वेगळी चूल मांडली. काँग्रेसची पाळेमुळे सर्वत्र पसरली आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा स्वच्छ प्रतिमेचा मुख्यमंत्री राज्याला लाभला. त्यामुळे प्रगती झाली. राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले; मात्र त्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर काहीही कारवाई केली नाही. 15 वर्षे सत्ता भोगल्यानंतर राष्ट्रवादीने वेगळी चूल मांडण्याची गरज नव्हती. मात्र, शरद पवार यांची व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा असल्याने सतत त्यांच्या विचारात बदल होतो.’’