शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

इंदापूर तालुक्याचा विकास काँग्रेसमुळे

By admin | Updated: October 13, 2014 23:24 IST

काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करतो. इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. इंदापूर तालुक्याने राज्याला नेतृत्व दिले आहे.

इंदापूर : काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करतो. इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. इंदापूर तालुक्याने राज्याला नेतृत्व दिले आहे. त्यामुळे या तालुक्याच्या विकासासाठी पुन्हा काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला सहकार्य करा. केंद्रातील भाजपप्रणीत सरकारमुळे सामान्य जनतेला वाईट दिवस आले आहेत, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी केली. 
इंदापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत दिग्विजयसिंह बोलत होते. अभिनेता रितेश देशमुख या सभेचे खास आकर्षण ठरला. त्याने केलेल्या खुमासदार भाषणाने उपस्थितांची मने जिंकली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ही सभा पार पडली.
हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्याचा विकास केला आहे. त्यांच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे इंदापूरकर काँग्रेसच्या पाठीशी राहतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘‘ज्यांचे बोट धरून राजकारणात आले, त्यांच्या मुलीच्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना प्रचाराला वेळ मिळाला नाही. आम्ही प्रामाणिकपणो काम केले. मतांचे मताधिक्य दिले. विधानसभेसाठी मात्र वेगळी चूल मांडायची, हा नेहमीचा डाव असतो. परंतु, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलेल्या विकासामुळे इंदापूरकर आमच्याबरोबरच आहेत, हे निवडणूक निकालात स्पष्ट होईल. इंदापुरातल्या सर्व सहकारी संस्था आम्ही स्थापन केल्या. अजित पवार मात्र दुस:यांनी सुरू केलेल्या संस्थांवर ठाण मांडून बसले आहेत. इंदापुरातील सहकारी संस्थांचे काम अजित पवारांनी पाहावे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर, माळेगाव कारखान्यांची सध्या काय अवस्था आहे, याकडे पवार यांनी लक्ष द्यावे.’’या वेळी विलासराव वाघमोडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.  (वार्ताहर)
 
4दिग्विजयसिंह म्हणाले, ‘‘15 वर्षात आघाडीचे सरकार राज्यात यशस्वीरीत्या काँग्रेसने चालविले. काँग्रेसच्या हाताला धरून मोठे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी वेगळी चूल मांडली. काँग्रेसची पाळेमुळे सर्वत्र पसरली आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा स्वच्छ प्रतिमेचा मुख्यमंत्री राज्याला लाभला. त्यामुळे प्रगती झाली. राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले; मात्र त्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर काहीही कारवाई केली नाही. 15 वर्षे सत्ता भोगल्यानंतर राष्ट्रवादीने वेगळी चूल मांडण्याची गरज नव्हती. मात्र, शरद पवार यांची व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा असल्याने सतत त्यांच्या विचारात बदल होतो.’’