शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर तालुक्याचा विकास काँग्रेसमुळे

By admin | Updated: October 13, 2014 23:24 IST

काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करतो. इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. इंदापूर तालुक्याने राज्याला नेतृत्व दिले आहे.

इंदापूर : काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करतो. इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. इंदापूर तालुक्याने राज्याला नेतृत्व दिले आहे. त्यामुळे या तालुक्याच्या विकासासाठी पुन्हा काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला सहकार्य करा. केंद्रातील भाजपप्रणीत सरकारमुळे सामान्य जनतेला वाईट दिवस आले आहेत, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी केली. 
इंदापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत दिग्विजयसिंह बोलत होते. अभिनेता रितेश देशमुख या सभेचे खास आकर्षण ठरला. त्याने केलेल्या खुमासदार भाषणाने उपस्थितांची मने जिंकली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ही सभा पार पडली.
हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्याचा विकास केला आहे. त्यांच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे इंदापूरकर काँग्रेसच्या पाठीशी राहतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘‘ज्यांचे बोट धरून राजकारणात आले, त्यांच्या मुलीच्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना प्रचाराला वेळ मिळाला नाही. आम्ही प्रामाणिकपणो काम केले. मतांचे मताधिक्य दिले. विधानसभेसाठी मात्र वेगळी चूल मांडायची, हा नेहमीचा डाव असतो. परंतु, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलेल्या विकासामुळे इंदापूरकर आमच्याबरोबरच आहेत, हे निवडणूक निकालात स्पष्ट होईल. इंदापुरातल्या सर्व सहकारी संस्था आम्ही स्थापन केल्या. अजित पवार मात्र दुस:यांनी सुरू केलेल्या संस्थांवर ठाण मांडून बसले आहेत. इंदापुरातील सहकारी संस्थांचे काम अजित पवारांनी पाहावे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर, माळेगाव कारखान्यांची सध्या काय अवस्था आहे, याकडे पवार यांनी लक्ष द्यावे.’’या वेळी विलासराव वाघमोडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.  (वार्ताहर)
 
4दिग्विजयसिंह म्हणाले, ‘‘15 वर्षात आघाडीचे सरकार राज्यात यशस्वीरीत्या काँग्रेसने चालविले. काँग्रेसच्या हाताला धरून मोठे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी वेगळी चूल मांडली. काँग्रेसची पाळेमुळे सर्वत्र पसरली आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा स्वच्छ प्रतिमेचा मुख्यमंत्री राज्याला लाभला. त्यामुळे प्रगती झाली. राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले; मात्र त्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर काहीही कारवाई केली नाही. 15 वर्षे सत्ता भोगल्यानंतर राष्ट्रवादीने वेगळी चूल मांडण्याची गरज नव्हती. मात्र, शरद पवार यांची व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा असल्याने सतत त्यांच्या विचारात बदल होतो.’’