शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘जलयुक्त शिवार’मुळे इंदापूरला मुबलक पाणीसाठा

By admin | Updated: May 13, 2017 04:30 IST

जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याला पाणीदार बनविण्यात यश आले आहे. गत दोन वर्षांमध्ये झालेल्या

लोकमत न्यूज नेटवर्ककळस : जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याला पाणीदार बनविण्यात यश आले आहे. गत दोन वर्षांमध्ये झालेल्या जलसंधारणाच्या कामांच्या माध्यमातून मुबलक पाणीसाठा करण्यात यश आले आहे. त्यामुळे आगामी काळात उन्हाळ्यातील शेतकऱ्यांची पाण्याची गरज भागण्यास मदत होणार आहे. कृषी, महसूल अधिकाऱ्यांनी याबाबत जवळपास ३० टीएमसी पाणी उपलब्ध होईल, अशी शक्यता व्यक्त केली. इंदापूर तालुक्यामध्ये गतवर्षी सुमारे ३० गावांमध्ये ४५० जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तर यंदा या कामांचा आराखडा वाढविण्यात आला आहे. तालुक्यात सुमारे ६०० जलसंधारणाची कामे करण्यात येत आहेत. जलसंधारणाची ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी कृषी विभाग, जलसंधारण, छोटे पाटबंधारे विभाग, वनविभाग व भूजल सर्वेक्षण विभागाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. जलसंधारणाच्या या कामांचा थेट फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे. पावसाळ्यानंतर काही दिवसांत कोरड्या पडणाऱ्या विहिरीचीही पाणी पातळी यंदा उन्हाळ्यात काहीकाळ टिकून राहण्याची शक्यता आहे. गावातील नाल्यांचे खोलीकरण झाल्याने त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा झाला आहे. परिणामी अनेकांच्या विहिरी पाण्याने डबाबल्या आहेत. अनेक ठिकाणी या कामांमुळे नागरिकांच्या रस्त्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे. नाल्याचे खोलीकरण करताना निघालेल्या मुरूम मातीचा नाल्यालगत भराव करण्यात आल्याने नागरिकांना भराव्यावरून चांगला रस्ता मिळाला आहे.