शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
4
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
5
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
6
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
7
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
8
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
9
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
10
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
11
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
12
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
13
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
14
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
15
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
16
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
17
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
18
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
19
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
20
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप

विद्यार्थ्यांमध्ये टोळीयुद्ध वाढतेय

By admin | Updated: July 6, 2017 02:50 IST

शहरातील महात्मा गांधी विद्यालय परिसरातील वाढती गुन्हेगारी, छेडछाडीचे प्रकार, भांडणे हे प्रकार नित्याचेच झाले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्कराजगुरुनगर : शहरातील महात्मा गांधी विद्यालय परिसरातील वाढती गुन्हेगारी, छेडछाडीचे प्रकार, भांडणे हे प्रकार नित्याचेच झाले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये टोळीयुद्ध भडकत आहे. त्यामुळे मुलींमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे शाळा प्रशासनाचे व पोलिसांचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. मात्र, यामध्ये इतर विद्यार्थ्यांना नाहक त्रास सोसावा लागत आहे आहे.शहरात विद्यालय परिसरातील गुन्हेगारी वाढत आहे. एकतर्फी प्रेम, प्रेमाला विरोध यांमुळे छेडछाड आणि मारहाणीच्या घटना घडतात. वर्गात भांडण झाल्यावर शाळा सुटल्यावर विद्यार्थी टोळीने एखाद्या मुलाला मारहाण केली जाते. परत त्यांचा राग, खुन्नस म्हणून बाहेर भांडणे होतात. असे प्रकार अनेक वर्षांपासून येथे घडत आहेत. या शाळेतील मुलांना राजकीय व गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांचे पाठबळ मिळत असल्याने भांडणांना अजूनच जोर येत असल्याचे चित्र दिसत आहे. महात्मा गांधी शाळेसमोरील रस्त्यावर ५ दिवसांपूर्वी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांच्या दोन गटांत भांडणे झाली होती. दरम्यान, शाळा सुटली असल्याने विद्यार्थी सैरावरा पळत सुटले होते. या घटनेमुळे शाळा परिसरात विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. शिक्षकांकडून त्याबाबत मार्गदर्शन आणि जनजागृती करणे आवश्यकता असल्याचे पालकांचे मत आहे.महाविद्यालयाच्या परिसरात तक्रार पेटी ठेवणे, विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या निर्भीडपणे शिक्षकांशी मांडता येईल, असे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने पोलीस आणि शिक्षक यांच्यामार्फत मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. शिक्षकांनाही स्थानिक पोलिसांना वेळोवळी चर्चा करून आवश्यक माहिती द्यावी. तसेच, बाहेर टवाळखोर मुलांना ताब्यात घेऊन त्याना समज देण्यात यावी. मात्र, शहरातील गेल्या काही घटना या विद्यालयाच्या बाहेर झाल्या असल्यामुळे विद्यालय प्रशासन जबबादारी झटकते. त्यामुळे या संदर्भात पोलिसांकडून कार्यवाही होणे अपेक्षित आहे.अशाळेच्या आवारात विद्यार्थ्यांची भांडणे होत नाहीत. शाळेच्या आवारात सीसी टीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. त्यामुळे भांडणे करणारे विद्यार्थी लगेच पकडले जातात. अनेक भांडणे करणाऱ्यांच्या पालकांना समज देण्यात आली आहे. पोलीस ठाण्याला शाळा भरण्याच्या वेळेस व सुटण्याच्या वेळेस एका पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी करून अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे. पोलीस कर्मचारी कमी असल्याने कर्मचारी उपलब्ध होत नाही.- सुनील जाधव, (प्राचार्य, महात्मा गांधी विद्यालय, राजगुरुनगर)शाळेत विद्यार्थ्यांमध्ये टोळीने भांडणे होत असतील, तर अशा विद्यार्थ्यांना समज देऊन चौकशी करून विदयार्थ्यांच्या टोळ्या मोडून काढण्यात येईल. उद्याापासून येथे शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळी पोलीस कर्मचारी पाठविण्यात येईल. - राम पठारे, (उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड विभाग)