शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

विद्यार्थ्यांमध्ये टोळीयुद्ध वाढतेय

By admin | Updated: July 6, 2017 02:50 IST

शहरातील महात्मा गांधी विद्यालय परिसरातील वाढती गुन्हेगारी, छेडछाडीचे प्रकार, भांडणे हे प्रकार नित्याचेच झाले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्कराजगुरुनगर : शहरातील महात्मा गांधी विद्यालय परिसरातील वाढती गुन्हेगारी, छेडछाडीचे प्रकार, भांडणे हे प्रकार नित्याचेच झाले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये टोळीयुद्ध भडकत आहे. त्यामुळे मुलींमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे शाळा प्रशासनाचे व पोलिसांचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. मात्र, यामध्ये इतर विद्यार्थ्यांना नाहक त्रास सोसावा लागत आहे आहे.शहरात विद्यालय परिसरातील गुन्हेगारी वाढत आहे. एकतर्फी प्रेम, प्रेमाला विरोध यांमुळे छेडछाड आणि मारहाणीच्या घटना घडतात. वर्गात भांडण झाल्यावर शाळा सुटल्यावर विद्यार्थी टोळीने एखाद्या मुलाला मारहाण केली जाते. परत त्यांचा राग, खुन्नस म्हणून बाहेर भांडणे होतात. असे प्रकार अनेक वर्षांपासून येथे घडत आहेत. या शाळेतील मुलांना राजकीय व गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांचे पाठबळ मिळत असल्याने भांडणांना अजूनच जोर येत असल्याचे चित्र दिसत आहे. महात्मा गांधी शाळेसमोरील रस्त्यावर ५ दिवसांपूर्वी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांच्या दोन गटांत भांडणे झाली होती. दरम्यान, शाळा सुटली असल्याने विद्यार्थी सैरावरा पळत सुटले होते. या घटनेमुळे शाळा परिसरात विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. शिक्षकांकडून त्याबाबत मार्गदर्शन आणि जनजागृती करणे आवश्यकता असल्याचे पालकांचे मत आहे.महाविद्यालयाच्या परिसरात तक्रार पेटी ठेवणे, विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या निर्भीडपणे शिक्षकांशी मांडता येईल, असे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने पोलीस आणि शिक्षक यांच्यामार्फत मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. शिक्षकांनाही स्थानिक पोलिसांना वेळोवळी चर्चा करून आवश्यक माहिती द्यावी. तसेच, बाहेर टवाळखोर मुलांना ताब्यात घेऊन त्याना समज देण्यात यावी. मात्र, शहरातील गेल्या काही घटना या विद्यालयाच्या बाहेर झाल्या असल्यामुळे विद्यालय प्रशासन जबबादारी झटकते. त्यामुळे या संदर्भात पोलिसांकडून कार्यवाही होणे अपेक्षित आहे.अशाळेच्या आवारात विद्यार्थ्यांची भांडणे होत नाहीत. शाळेच्या आवारात सीसी टीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. त्यामुळे भांडणे करणारे विद्यार्थी लगेच पकडले जातात. अनेक भांडणे करणाऱ्यांच्या पालकांना समज देण्यात आली आहे. पोलीस ठाण्याला शाळा भरण्याच्या वेळेस व सुटण्याच्या वेळेस एका पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी करून अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे. पोलीस कर्मचारी कमी असल्याने कर्मचारी उपलब्ध होत नाही.- सुनील जाधव, (प्राचार्य, महात्मा गांधी विद्यालय, राजगुरुनगर)शाळेत विद्यार्थ्यांमध्ये टोळीने भांडणे होत असतील, तर अशा विद्यार्थ्यांना समज देऊन चौकशी करून विदयार्थ्यांच्या टोळ्या मोडून काढण्यात येईल. उद्याापासून येथे शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळी पोलीस कर्मचारी पाठविण्यात येईल. - राम पठारे, (उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड विभाग)