शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

विद्यार्थ्यांमध्ये टोळीयुद्ध वाढतेय

By admin | Updated: July 6, 2017 02:50 IST

शहरातील महात्मा गांधी विद्यालय परिसरातील वाढती गुन्हेगारी, छेडछाडीचे प्रकार, भांडणे हे प्रकार नित्याचेच झाले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्कराजगुरुनगर : शहरातील महात्मा गांधी विद्यालय परिसरातील वाढती गुन्हेगारी, छेडछाडीचे प्रकार, भांडणे हे प्रकार नित्याचेच झाले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये टोळीयुद्ध भडकत आहे. त्यामुळे मुलींमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे शाळा प्रशासनाचे व पोलिसांचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. मात्र, यामध्ये इतर विद्यार्थ्यांना नाहक त्रास सोसावा लागत आहे आहे.शहरात विद्यालय परिसरातील गुन्हेगारी वाढत आहे. एकतर्फी प्रेम, प्रेमाला विरोध यांमुळे छेडछाड आणि मारहाणीच्या घटना घडतात. वर्गात भांडण झाल्यावर शाळा सुटल्यावर विद्यार्थी टोळीने एखाद्या मुलाला मारहाण केली जाते. परत त्यांचा राग, खुन्नस म्हणून बाहेर भांडणे होतात. असे प्रकार अनेक वर्षांपासून येथे घडत आहेत. या शाळेतील मुलांना राजकीय व गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांचे पाठबळ मिळत असल्याने भांडणांना अजूनच जोर येत असल्याचे चित्र दिसत आहे. महात्मा गांधी शाळेसमोरील रस्त्यावर ५ दिवसांपूर्वी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांच्या दोन गटांत भांडणे झाली होती. दरम्यान, शाळा सुटली असल्याने विद्यार्थी सैरावरा पळत सुटले होते. या घटनेमुळे शाळा परिसरात विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. शिक्षकांकडून त्याबाबत मार्गदर्शन आणि जनजागृती करणे आवश्यकता असल्याचे पालकांचे मत आहे.महाविद्यालयाच्या परिसरात तक्रार पेटी ठेवणे, विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या निर्भीडपणे शिक्षकांशी मांडता येईल, असे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने पोलीस आणि शिक्षक यांच्यामार्फत मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. शिक्षकांनाही स्थानिक पोलिसांना वेळोवळी चर्चा करून आवश्यक माहिती द्यावी. तसेच, बाहेर टवाळखोर मुलांना ताब्यात घेऊन त्याना समज देण्यात यावी. मात्र, शहरातील गेल्या काही घटना या विद्यालयाच्या बाहेर झाल्या असल्यामुळे विद्यालय प्रशासन जबबादारी झटकते. त्यामुळे या संदर्भात पोलिसांकडून कार्यवाही होणे अपेक्षित आहे.अशाळेच्या आवारात विद्यार्थ्यांची भांडणे होत नाहीत. शाळेच्या आवारात सीसी टीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. त्यामुळे भांडणे करणारे विद्यार्थी लगेच पकडले जातात. अनेक भांडणे करणाऱ्यांच्या पालकांना समज देण्यात आली आहे. पोलीस ठाण्याला शाळा भरण्याच्या वेळेस व सुटण्याच्या वेळेस एका पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी करून अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे. पोलीस कर्मचारी कमी असल्याने कर्मचारी उपलब्ध होत नाही.- सुनील जाधव, (प्राचार्य, महात्मा गांधी विद्यालय, राजगुरुनगर)शाळेत विद्यार्थ्यांमध्ये टोळीने भांडणे होत असतील, तर अशा विद्यार्थ्यांना समज देऊन चौकशी करून विदयार्थ्यांच्या टोळ्या मोडून काढण्यात येईल. उद्याापासून येथे शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळी पोलीस कर्मचारी पाठविण्यात येईल. - राम पठारे, (उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड विभाग)