शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

देशात सांप्रदायिकता पसरवणे धोकादायक

By admin | Updated: November 15, 2015 00:42 IST

सनातनी विचारांच्या संघटना देशात सांप्रदायिकता पसरवत आहेत. मात्र केंद्र सरकारकडून त्यांच्यावर कोणतेही निर्बंध आणले जात नाहीत. ही बाब गंभीर आहे, असे मत आमदार आजित पवार यांनी व्यक्त केले.

माळेगाव : सनातनी विचारांच्या संघटना देशात सांप्रदायिकता पसरवत आहेत. मात्र केंद्र सरकारकडून त्यांच्यावर कोणतेही निर्बंध आणले जात नाहीत. ही बाब गंभीर आहे, असे मत आमदार आजित पवार यांनी व्यक्त केले. पवार पणदरे येथे स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात बोलत होते. पवार म्हणाले, केंद्र व राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर सनातनवादी संघटना सांप्रदायिकता पसरवू पाहत आहेत. ज्या नथुराम गोडसेने महात्मा गांधीजींची हत्या केली त्या गोडसेच्या फाशीच्या दिवसाला हे लोक बलिदानदिन म्हणून साजरा करू पाहत आहेत. या वेळी संभाजी होळकर, बाबा पाटील, विलास जगताप, एम. एन. जगताप, अनिल जगताप, सुदामराव जगताप, रामभाऊ कोकरे, रमेश कोकरे, सत्यजित जगताप, जवाहर वाघोलीकर, अ‍ॅड. केशवराव जगताप, भगत जगताप, नारायण कोकरे, उपस्थित होते.कालव्याची सफाई लोकसहभागातून पणदरे गावातून जाणाऱ्या नीरा डाव्या कालव्याची दुरवस्था झाली आहे. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत अजित पवार यांनी गावातील लोकांना एकत्र येत लोकसहभागातून कालव्याची साफसफाई व डागडुजी करण्याचे आवाहन केले आहे. पुरातन वास्तूंचे जतन करापणदरे गावाला मोठ्या प्रमाणावर प्राचीन व ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मात्र, गावामध्ये इतिहासकालीन वाडे पाडून इमारती उभारल्या जात आहेत. त्याऐवजी अशा वास्तुंचे नूतनीकरण करून त्याचे प्रेक्षणीय स्थळ कसे बनविता येईल, याकडे लक्ष द्यायला हवे. यावर विचार व्हायला हवा, असे आवाहन पवार यांनी केले.काळूस : काळूस (ता. खेड) परिसरातील भीमा नदीपात्रातील ४ कृषिपंपांची चोरी झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. ही घटना काल (दि. १३) रात्रीच्या सुमारास घडली. तर, वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांत संतापाचे वातावरण आहे. काळूसच्या उत्तरेकडील वाटेकरवाडी, निमगाव बंधारा परिसरातून कृषिपंपाच्या चोरीच्या घटनांमुळे शेतकरी वैतागला आहे. भीमा नदीपात्रातून शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या ४ कृषिपंपांची मागील महिन्यात चोरी झाली होती. याच भागातून पुन्हा काल रात्री ४ कृषिपंप चोरट्यांनी चोरून नेले. सुमारे ७.५ ते १० अश्वशक्तीच्या पंपांच्या चोरीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याबाबत बबन जाचक, दशरथ जाचक, वसंत आरगडे, हनुमंत आरगडे, भिवाजी पवळे यांनी चाकण पोलिसात तक्रार दाखल केली आहे. हे प्रकार या भागात वारंवार होत असून, यापूर्वी तांब्यांच्या तारांची चोरी होई. पण आता पूर्ण संचच चोरी होत असल्याचे ग्रामपंचायत सदस्य पवनराजे जाचक यांनी सांगितले.