शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

आरोग्य लाभासाठी वाढले शहरी गरीब

By admin | Updated: April 5, 2017 00:48 IST

आरोग्य योजनांच्या लाभासाठीच ‘शहरी गरीब’ वाढल्याचे दिसून आल्याने आता राजीव गांधी योजनेशी शहरी गरीब योजना जोडली जाणार आहे

पुणे : आरोग्य योजनांच्या लाभासाठीच ‘शहरी गरीब’ वाढल्याचे दिसून आल्याने आता राजीव गांधी योजनेशी शहरी गरीब योजना जोडली जाणार आहे. या योजनेचे कार्ड असणाऱ्यांनाच भविष्यात आता लाभ मिळणार आहे. गेल्या काही वर्षांत महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या शहरी गरीब योजनेतंर्गत अनेक बोगस लाभार्थ्यांनी लाभ घेतल्याचे निदर्शनास आले. लोकप्रतिनिधींचे नातेवाईक व उच्च उत्पन्न गटांतील रुग्णांना याचा अधिक लाभ झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. गेल्या दहा वर्षांत योजनेसाठीचा खर्च ९३ लाख रुपयांवरून २६ कोटींवर पोहोचला. यामुळेच बोगस लाभार्थी टाळण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने ‘शहरी गरीब योजना’ शासनाच्या राजीव गांधी आरोग्य योजनेशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे.शहराच्या हद्दीत राहणाऱ्या व एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या रुग्णांना अर्थसहाय करण्यासाठी महापालिकेने सन २०१२-१३मध्ये ‘शहरी गरीब योजना’ सुरू केली. या योजनेतंर्गत महापालिकेकडून रुग्णांना सुमारे एक लाख रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य केले जाते. योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित रुग्णाकडे महापालिकेचे हेल्थकार्ड व शासकीय अधिकाऱ्यांचा एक लाखाच्या आता उत्पन्न असल्याचा दाखला असणे आवश्यक आहे. गेल्या सहा वर्षांत या योजनेंतर्गत शहरातील तब्बल पन्नास हजारांहून अधिक नागरिकांना विविध दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी या योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात आला. परंतु ही योजना राबविताना अनेकदा रुग्णांकडून महापालिकेचे हेल्थकार्ड नसताना मागणी होऊ लागली. यामध्ये लोकप्रतिनिधींचा दबाव आल्यानंतर ऐनवेळी हेल्थकार्ड काढून मदत करणे, उत्पन्नाचा दाखला वेळेत सादर न करणे, काही लोकप्रतिनिधींकडून आपल्याच नातेवाइकांना लाभ देणे, उच्च उत्पन्न गटातील रुग्णांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी येणारा दबाव यामुळे योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे निदर्शनास आले. (प्रतिनिधी)>योजनेला ‘आधार’ जोडणारया योजनेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आरोग्य विभागाने ही योजना केंद्र शासनाच्या राजीव गांधी आरोग्य योजनेशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. एक लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असलेल्या नागरिकांची रेशनकार्ड काढतानाच राजीव गांधी आरोग्य योजनेसाठी नोंद केली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार लिकिंगदेखील बंधनकारक आहे. त्यामुळे यापुढे राजीव गांधी आरोग्य योजनेचे कार्ड असणाऱ्या व्यक्तींनाच महापालिकेच्या शहरी गरीब योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच दोन्हीपैकी कोणत्या तरी एकाच योजनेचा लाभ घेता येईल अशी अटदेखील घालण्यात येणार आहे. यासाठी योजनेत अनेक बदल करावे लागणार असून, याबाबतचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडून सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात येणार आहे.