शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

साखरेचे उत्पादन वाढल्याने इथेनॉल निर्मितीवर भर देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : उसाच्या क्षेत्रात यंदा वाढ झाली आहे. त्यामुळे साखरेचे उत्पादन तब्बल ११२ लाख टन होण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : उसाच्या क्षेत्रात यंदा वाढ झाली आहे. त्यामुळे साखरेचे उत्पादन तब्बल ११२ लाख टन होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे साखरेचा खप कमी झाल्याने यातून साखर कारखान्यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे इथेनॉल निर्मितीवर भर देण्यात येण्याची शक्यता आहे.

साखर आयुक्त कार्यालयाकडून पुढील वर्षीच्या गाळप हंगामाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार १२.३२ लाख हेक्टरवर ऊस उभा आहे. त्यातून १०९६ लाख टन उसाचे गाळप होईल. त्यामधून ११२ लाख टन साखर निर्माण होईल. १० लाख टन ऊस इथेनॉलसाठी शिल्लक ठेवण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यावर्षी किमान १३० कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट असणार आहे.

मागील वर्षी १२ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस होता. त्यातून गाळप होऊन १०६ लाख टन साखरचे उत्पादन झाले. त्याआधीची सुमारे ४० लाख टन साखर कारखान्यांकडे शिल्लक आहे. निर्यातीसाठी अनुदान द्यावे लागत असल्याने केंद्र सरकार देशासाठी ६० लाख टनांच्या पुढे कोटा वाढवून द्यायला तयार नाही. देशात आरोग्यविषयक जागरूकता वाढली आहे, त्यामुळे साखरेचा अपेक्षित खप होत नाही. कारखान्यांना साखर गोडाऊनमध्ये शिल्लक ठेवावी लागते. यातून सध्याच साखर कारखान्यांपुढे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. येत्या वर्षांच्या साखर उत्पादनातून त्यात आणखी भर पडण्याची चिन्हे आहेत.

--//

साखर उद्योगाला आता अपरिहार्यपणे इथेनॉल निर्मितीकडे वळावे लागेल. त्यादृष्टीने नियोजन सुरूही झाले आहे. मागील वर्षी ६ लाख टन गाळप इथेनॉलकडे वळवून १०८ कोटी लिटर इथेनॉलचे उद्दिष्ट गाठले गेले. पुढील वर्षी १० लाख टन गाळप साखरेऐवजी इथेनॉलकडे वळवून १३० कोटी लिटर किंवा त्यापेक्षा जास्त उद्दिष्ट दिले जाईल, अशी शक्यता आहे.

- शेखर गायकवाड- साखर आयुक्त

-------------------

इथेनॉलचा वापर फायदेशीर

इथेनॉल हा एक अल्कोहोल द्रव्य असून, ते उसापासून निर्माण केले जाते. याचा वापर पेट्रोलमध्ये करून ते वाहनांना वापरले जाते. याच्या वापराने ३५ टक्के कार्बन मोनोऑक्साइडचे उत्सर्जन कमी होते. इथेनॉलचा वापर इंधनासाठी वाढविला तर परदेशातून इंधनाची आयात कमी होऊ शकते. त्यामुळे साखरेपासून इथेनॉलची मोठ्या प्रमाणावर निर्मिती झाली तर त्याचा देशाला फायदाच होणार आहे. दरम्यान, येत्या २०२२ पर्यंत पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल वापरण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे.

--------------------