शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

बटाटा उत्पादन वाढले; नफ्यात मात्र घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:10 IST

मंचर: बाजारात नव्या बटाट्याची आवक वाढली आहे. मात्र, बाजारभाव कमी झाल्याने अपेक्षित उत्पन्नात घट झाली आहे. बटाटा वानाचे ...

मंचर: बाजारात नव्या बटाट्याची आवक वाढली आहे. मात्र, बाजारभाव कमी झाल्याने अपेक्षित उत्पन्नात घट झाली आहे. बटाटा वानाचे भाव गगनाला भिडल्याने शेतकऱ्यांना ७० ते ९० रुपये किलो या भावाने बटाटे बियाणे आणावे लागले. मात्र, किलोला केवळ १७ ते १८ रुपये असा भाव मिळत असल्याने उत्पादकांच्या नफ्यात घट झाली आहे.

मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यात बटाटा वानाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र यावर्षी बियाण्याची आवक कमी प्रमाणात झाली. मागील काही वर्षांचा अनुभव पाहता लागवड क्षेत्रात घट झाली आहे. मागील दोन वर्षांपासून शेतकऱ्यांचे भांडवल अंगावर येत होते. वातावरणातील बदलामुळे तसेच निसर्गाच्या लहरीपणामुळे बटाटा पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढून उत्पादन घटले होते. यावर्षी आंबेगाव तालुक्यात केवळ ५५ टक्के क्षेत्रात बटाटा लागवड झाली असल्याची माहिती महेश मोरे यांनी दिली. बटाटा बियाण्याचे वाढलेले बाजारभाव हे सुद्धा लागवड कमी होण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. मंचर बाजार समितीत प्रामुख्याने पंजाब राज्यातून बटाटा विक्रीसाठी येतो. मात्र तेथे बटाट्याचा तुटवडा असल्याने भाव कडाडले गेले. यावर्षी बटाटा बियाण्याचे बाजारभावाने उच्चांक गाठला आहे. क्विंटलला पाच हजार ते नऊ हजार रुपये असा भाव बियाण्याला असल्याने लागवड क्षेत्र घटले. बटाटा पिकाला एकरी ७५ ते ८० हजार रुपये इतका भांडवली खर्च आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या बाजारभावाची अशा होती. सुरुवातीला किलोस ३० ते ३५ रुपये असा भाव मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. मात्र, नंतर बाजारभाव कमी कमी होत गेले. सध्या बटाटा बाजारात १७ ते १८ रुपये किलो या भावाने विकला जातोय. मात्र, हाच बटाटा लागवडीसाठी ७० ते ९० रुपये किलो या दराने विकत घ्यावा लागला होता. गुजरात राज्यातील बटाटा बियाणे उपलब्ध झाले होते. या बियाण्याला भाव सुद्धा कमी होता. मात्र, बहुतेक शेतकऱ्यांचा कल पंजाब राज्यातील बटाटा बियाणे घेण्याकडे होता. दरम्यान बटाटा पिकाची काढणी सुरू झाली आहे. मात्र, भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित नफा शिल्लक राहत नाही. या भावाने भांडवल वसूल होत आहे. मात्र, नफा कमी शिल्लक राहत असल्याने बटाटा उत्पादक शेतकरी नाराज आहे. बाजारभाव वाढले तर यापुढे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

चौकट

यावर्षी गळीत चांगले निघत आहे. बटाट्याच्या एका पोत्याला १५ ते २२ पिशवी असे गळीत निघत असल्याने उत्पादन वाढले आहे. परिणामी बाजारभाव कमी होऊनही शेतकऱ्यांना जास्त फटका बसलेला नाही.

सचिन ढेरंगे: बटाटा उत्पादक शेतकरी चिंचोडी यावर्षी बियाण्याचे बाजारभाव कडाडले असतानाही धाडसाने १०० पोती बटाटा लागवड केली आहे. सुरवातीला बटाट्याला चांगला भाव मिळत असल्याने अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र बाजारभाव कमी झाले असून शेतातील बटाटा टप्प्याटप्प्याने काढणी करत आहे. सतरा-अठरा रुपये किलो हा भाव पुरेसा नसला. तरी उत्पादन वाढल्याने बऱ्यापैकी नफा मिळत आहे.