शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
3
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
7
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
8
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
9
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
10
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
11
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
12
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
13
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
14
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
15
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
16
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
17
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
18
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
19
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

बटाटा उत्पादन वाढले; नफ्यात मात्र घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:10 IST

मंचर: बाजारात नव्या बटाट्याची आवक वाढली आहे. मात्र, बाजारभाव कमी झाल्याने अपेक्षित उत्पन्नात घट झाली आहे. बटाटा वानाचे ...

मंचर: बाजारात नव्या बटाट्याची आवक वाढली आहे. मात्र, बाजारभाव कमी झाल्याने अपेक्षित उत्पन्नात घट झाली आहे. बटाटा वानाचे भाव गगनाला भिडल्याने शेतकऱ्यांना ७० ते ९० रुपये किलो या भावाने बटाटे बियाणे आणावे लागले. मात्र, किलोला केवळ १७ ते १८ रुपये असा भाव मिळत असल्याने उत्पादकांच्या नफ्यात घट झाली आहे.

मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यात बटाटा वानाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र यावर्षी बियाण्याची आवक कमी प्रमाणात झाली. मागील काही वर्षांचा अनुभव पाहता लागवड क्षेत्रात घट झाली आहे. मागील दोन वर्षांपासून शेतकऱ्यांचे भांडवल अंगावर येत होते. वातावरणातील बदलामुळे तसेच निसर्गाच्या लहरीपणामुळे बटाटा पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढून उत्पादन घटले होते. यावर्षी आंबेगाव तालुक्यात केवळ ५५ टक्के क्षेत्रात बटाटा लागवड झाली असल्याची माहिती महेश मोरे यांनी दिली. बटाटा बियाण्याचे वाढलेले बाजारभाव हे सुद्धा लागवड कमी होण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. मंचर बाजार समितीत प्रामुख्याने पंजाब राज्यातून बटाटा विक्रीसाठी येतो. मात्र तेथे बटाट्याचा तुटवडा असल्याने भाव कडाडले गेले. यावर्षी बटाटा बियाण्याचे बाजारभावाने उच्चांक गाठला आहे. क्विंटलला पाच हजार ते नऊ हजार रुपये असा भाव बियाण्याला असल्याने लागवड क्षेत्र घटले. बटाटा पिकाला एकरी ७५ ते ८० हजार रुपये इतका भांडवली खर्च आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या बाजारभावाची अशा होती. सुरुवातीला किलोस ३० ते ३५ रुपये असा भाव मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. मात्र, नंतर बाजारभाव कमी कमी होत गेले. सध्या बटाटा बाजारात १७ ते १८ रुपये किलो या भावाने विकला जातोय. मात्र, हाच बटाटा लागवडीसाठी ७० ते ९० रुपये किलो या दराने विकत घ्यावा लागला होता. गुजरात राज्यातील बटाटा बियाणे उपलब्ध झाले होते. या बियाण्याला भाव सुद्धा कमी होता. मात्र, बहुतेक शेतकऱ्यांचा कल पंजाब राज्यातील बटाटा बियाणे घेण्याकडे होता. दरम्यान बटाटा पिकाची काढणी सुरू झाली आहे. मात्र, भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित नफा शिल्लक राहत नाही. या भावाने भांडवल वसूल होत आहे. मात्र, नफा कमी शिल्लक राहत असल्याने बटाटा उत्पादक शेतकरी नाराज आहे. बाजारभाव वाढले तर यापुढे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

चौकट

यावर्षी गळीत चांगले निघत आहे. बटाट्याच्या एका पोत्याला १५ ते २२ पिशवी असे गळीत निघत असल्याने उत्पादन वाढले आहे. परिणामी बाजारभाव कमी होऊनही शेतकऱ्यांना जास्त फटका बसलेला नाही.

सचिन ढेरंगे: बटाटा उत्पादक शेतकरी चिंचोडी यावर्षी बियाण्याचे बाजारभाव कडाडले असतानाही धाडसाने १०० पोती बटाटा लागवड केली आहे. सुरवातीला बटाट्याला चांगला भाव मिळत असल्याने अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र बाजारभाव कमी झाले असून शेतातील बटाटा टप्प्याटप्प्याने काढणी करत आहे. सतरा-अठरा रुपये किलो हा भाव पुरेसा नसला. तरी उत्पादन वाढल्याने बऱ्यापैकी नफा मिळत आहे.