शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशकांचा मारा वाढल्याने मधमाश्यांचा शहराकडे ओढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:10 IST

- उसाच्या शेतीचे प्रमाण अधिक; जीवनशैली बदलत असल्याचे चित्र जागतिक मधमाशी दिन पुणे : गेल्या काही वर्षांमध्ये शेतात कीटकनाशके, ...

- उसाच्या शेतीचे प्रमाण अधिक; जीवनशैली बदलत असल्याचे चित्र

जागतिक मधमाशी दिन

पुणे : गेल्या काही वर्षांमध्ये शेतात कीटकनाशके, रासायनिक खतांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे मधमाश्यांची संख्या वेगाने कमी होत आहे. तसेच, ग्रामीण भागात आता मधमाश्यांचे पोळेही खूप कमी दिसत आहे. परंतु, या मधमाश्यांनी आता आपला मोर्चा शहराकडे वळविला आहे. कारण, शहरात कीटकनाशके किंवा रासायनिक खतांचा वापर होत नाही आणि इथे झाडंही मुबलक प्रमाणात आहेत. त्यामुळे शहरात पोळं दिसत आहेत. मधमाश्यांनी आपली जीवनशैली बदलल्याचेच हे चित्र आहे.

सर्वाधिक परागीभवन करण्यात मधमाश्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे मधमाश्यांचे अस्तित्व अतिशय महत्त्वाचे आहे. या मधमाश्यांवर अभ्यास करणारे डॉ. महेश गायकवाड म्हणाले, ‘‘गावात मधमाश्या कमी होत आहेत. कारण, औषधांची फवारणी करणे हा प्रकार वाढला आहे. उत्पादन अधिक व्हावे या आशेने शेतकरी औषधे वापरत आहेत. पण, त्याचा परिणाम मधमाश्यांवर होत आहे. मधमाश्यांना वाचविणे गरजे आहे. कारण, त्यांच्यामुळे खूप परागीभवन होते. त्यांचे संवर्धन करण्यासाठी शहरातील नागरिकांनी त्यांना कसलाही त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. कुठेही पोळे दिसले तर धूर करून त्यांना उठवू नये.’’

‘‘ग्रामीण भागात पूर्वी विविध पिकांचे उत्पादन होत असे. आता पुणे जिल्ह्यात पाहिले तर सर्वाधिक उत्पादन उसाचे आहे. त्यामुळे मधमाश्यांना त्यांचे खाद्य मिळत नाही. मधमाश्यांसाठी काटेरी झाडे, बोर, बाभूळ, जांभूळ अशी झाडं लावावीत, तरच त्यांना खाद्य मिळेल,’’असे गायकवाड म्हणाले.

————————————————

ही झाडं, वेली लावा

मधमाश्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी शेवगा, कडूनिंब, मोहरी अशी झाडं लावावीत. ज्या फुलांमध्ये मकरंद असतो, ती रोपं आवश्य लावावीत. काकडीचा वेल, भोपळा, कारले, जाई-जुई, गुळवेल लावणे गरजेचे आहे. शहरात इमारतीच्या बाजूला, गार्डनमध्ये किंवा बाल्कनीत कुंडीत हे लावू शकतो.

——————————————-

शहरात इमारतीच्या अनेक भागात पोळं दिसले, तर नागरिकांनी ते नष्ट करू नये. कारण, मधमाश्या तीन महिन्यांनंतर तिथून आपली वसाहत हलवतात. कोणी पोळं उठवलं तर आपण शांतपणे उभे राहिले, तर त्या माशा आपल्याला चावत नाहीत. पण, त्यांना जर काही धोका वाटला तर त्या चावतात. जर मधमाशी चावली, तर त्या चावा घेतलेल्या ठिकाणी माती लावावी किंवा हिरवा पाला चोळावा, त्याचा त्रास होणार नाही.

- डॉ. महेश गायकवाड, मधमाश्या संशोधक

———————————-