शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
3
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
4
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
5
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
6
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
7
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
8
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
9
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
10
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
11
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
12
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
13
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
14
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
15
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
16
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
17
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
18
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
19
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
20
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट

कीटकनाशकांचा मारा वाढल्याने मधमाश्यांचा शहराकडे ओढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:10 IST

- उसाच्या शेतीचे प्रमाण अधिक; जीवनशैली बदलत असल्याचे चित्र जागतिक मधमाशी दिन पुणे : गेल्या काही वर्षांमध्ये शेतात कीटकनाशके, ...

- उसाच्या शेतीचे प्रमाण अधिक; जीवनशैली बदलत असल्याचे चित्र

जागतिक मधमाशी दिन

पुणे : गेल्या काही वर्षांमध्ये शेतात कीटकनाशके, रासायनिक खतांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे मधमाश्यांची संख्या वेगाने कमी होत आहे. तसेच, ग्रामीण भागात आता मधमाश्यांचे पोळेही खूप कमी दिसत आहे. परंतु, या मधमाश्यांनी आता आपला मोर्चा शहराकडे वळविला आहे. कारण, शहरात कीटकनाशके किंवा रासायनिक खतांचा वापर होत नाही आणि इथे झाडंही मुबलक प्रमाणात आहेत. त्यामुळे शहरात पोळं दिसत आहेत. मधमाश्यांनी आपली जीवनशैली बदलल्याचेच हे चित्र आहे.

सर्वाधिक परागीभवन करण्यात मधमाश्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे मधमाश्यांचे अस्तित्व अतिशय महत्त्वाचे आहे. या मधमाश्यांवर अभ्यास करणारे डॉ. महेश गायकवाड म्हणाले, ‘‘गावात मधमाश्या कमी होत आहेत. कारण, औषधांची फवारणी करणे हा प्रकार वाढला आहे. उत्पादन अधिक व्हावे या आशेने शेतकरी औषधे वापरत आहेत. पण, त्याचा परिणाम मधमाश्यांवर होत आहे. मधमाश्यांना वाचविणे गरजे आहे. कारण, त्यांच्यामुळे खूप परागीभवन होते. त्यांचे संवर्धन करण्यासाठी शहरातील नागरिकांनी त्यांना कसलाही त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. कुठेही पोळे दिसले तर धूर करून त्यांना उठवू नये.’’

‘‘ग्रामीण भागात पूर्वी विविध पिकांचे उत्पादन होत असे. आता पुणे जिल्ह्यात पाहिले तर सर्वाधिक उत्पादन उसाचे आहे. त्यामुळे मधमाश्यांना त्यांचे खाद्य मिळत नाही. मधमाश्यांसाठी काटेरी झाडे, बोर, बाभूळ, जांभूळ अशी झाडं लावावीत, तरच त्यांना खाद्य मिळेल,’’असे गायकवाड म्हणाले.

————————————————

ही झाडं, वेली लावा

मधमाश्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी शेवगा, कडूनिंब, मोहरी अशी झाडं लावावीत. ज्या फुलांमध्ये मकरंद असतो, ती रोपं आवश्य लावावीत. काकडीचा वेल, भोपळा, कारले, जाई-जुई, गुळवेल लावणे गरजेचे आहे. शहरात इमारतीच्या बाजूला, गार्डनमध्ये किंवा बाल्कनीत कुंडीत हे लावू शकतो.

——————————————-

शहरात इमारतीच्या अनेक भागात पोळं दिसले, तर नागरिकांनी ते नष्ट करू नये. कारण, मधमाश्या तीन महिन्यांनंतर तिथून आपली वसाहत हलवतात. कोणी पोळं उठवलं तर आपण शांतपणे उभे राहिले, तर त्या माशा आपल्याला चावत नाहीत. पण, त्यांना जर काही धोका वाटला तर त्या चावतात. जर मधमाशी चावली, तर त्या चावा घेतलेल्या ठिकाणी माती लावावी किंवा हिरवा पाला चोळावा, त्याचा त्रास होणार नाही.

- डॉ. महेश गायकवाड, मधमाश्या संशोधक

———————————-