शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

मराठा समाजाच्या मुस्कटदाबीसाठी वाढवला लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरयाचिका दाखल केल्याने, मराठा समाजाला आरक्षण न देण्याच्या भूमिकेत असलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरयाचिका दाखल केल्याने, मराठा समाजाला आरक्षण न देण्याच्या भूमिकेत असलेल्या राज्य सरकारचे तोंड काळे झाले आहे. मुळात ही फेरयाचिका राज्य सरकारने दाखल करणे अपेक्षित होते. मात्र त्यांच्या मनात पाप असून, मराठा समाजाचा असंतोष दाबण्यासाठी सरकारने पंधरा दिवसांचा लॉकडाऊन वाढवून मराठा समाजाची मुस्कटदाबी केली असल्याचा आरोप शिवसंग्राम संघटनेचे नेते आमदार विनायक मेटे यांनी केला़

शुक्रवारी (दि.१४) पुण्यात पत्रकार परिषदेत मेटे म्हणाले, “लॉकडाऊन संपल्यावर येत्या ५ जूनला राज्य सरकारविरोधात बीडवरून आम्ही महामोर्चा काढणार आहोत. तसेच १८ मे रोजी राज्यातील सर्व तहसील कार्यालयात जाऊन मराठा आरक्षणाबाबतचे निवेदन दिले जाणार आहे. राज्य सरकार मराठा समाजातील काही संघटनांना व नेत्यांना पुढे करून स्वत:ची सत्ता टिकविण्याचा प्रयत्न करीत आहे याचा आम्ही निषेध करतो. आरक्षण मिळेपर्यंत राज्यातील एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

केंद्र सरकारने आजपर्यंत नेहमीच मराठा समाजाच्या बाजूने भूमिका मांडली आहे. मात्र राज्य सरकार स्वत: काही करत नाही व केंद्र सरकारकडे बोट दाखविते. केंद्र सरकाने फेरयाचिका दाखल केल्यावरही १०२ च्या घटनादुरूस्तीबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे अशोक चव्हाण आता राज्य सरकारकडून मदत करण्याची भूमिका घेण्याऐवजी पुन्हा गैरसमज पसरवित आहेत. आपले काम सोडून दुसऱ्यावर ढकलायचे हा चव्हाण यांचा एककलमी कार्यक्रम असल्याचे मेटे म्हणाले.

दरम्यान राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने आम्ही लवकरच राज्यपालांची भेट घेणार आहोत. वेळ पडल्यास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपतींचीही भेट घेऊ, असे मेटे यांनी सांगितले.