शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
2
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
3
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
4
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
5
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
6
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
7
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
9
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
10
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
11
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
12
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
13
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
14
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
15
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
16
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
17
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
18
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
19
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
20
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?

मराठा समाजाच्या मुस्कटदाबीसाठी वाढवला लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरयाचिका दाखल केल्याने, मराठा समाजाला आरक्षण न देण्याच्या भूमिकेत असलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरयाचिका दाखल केल्याने, मराठा समाजाला आरक्षण न देण्याच्या भूमिकेत असलेल्या राज्य सरकारचे तोंड काळे झाले आहे. मुळात ही फेरयाचिका राज्य सरकारने दाखल करणे अपेक्षित होते. मात्र त्यांच्या मनात पाप असून, मराठा समाजाचा असंतोष दाबण्यासाठी सरकारने पंधरा दिवसांचा लॉकडाऊन वाढवून मराठा समाजाची मुस्कटदाबी केली असल्याचा आरोप शिवसंग्राम संघटनेचे नेते आमदार विनायक मेटे यांनी केला़

शुक्रवारी (दि.१४) पुण्यात पत्रकार परिषदेत मेटे म्हणाले, “लॉकडाऊन संपल्यावर येत्या ५ जूनला राज्य सरकारविरोधात बीडवरून आम्ही महामोर्चा काढणार आहोत. तसेच १८ मे रोजी राज्यातील सर्व तहसील कार्यालयात जाऊन मराठा आरक्षणाबाबतचे निवेदन दिले जाणार आहे. राज्य सरकार मराठा समाजातील काही संघटनांना व नेत्यांना पुढे करून स्वत:ची सत्ता टिकविण्याचा प्रयत्न करीत आहे याचा आम्ही निषेध करतो. आरक्षण मिळेपर्यंत राज्यातील एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

केंद्र सरकारने आजपर्यंत नेहमीच मराठा समाजाच्या बाजूने भूमिका मांडली आहे. मात्र राज्य सरकार स्वत: काही करत नाही व केंद्र सरकारकडे बोट दाखविते. केंद्र सरकाने फेरयाचिका दाखल केल्यावरही १०२ च्या घटनादुरूस्तीबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे अशोक चव्हाण आता राज्य सरकारकडून मदत करण्याची भूमिका घेण्याऐवजी पुन्हा गैरसमज पसरवित आहेत. आपले काम सोडून दुसऱ्यावर ढकलायचे हा चव्हाण यांचा एककलमी कार्यक्रम असल्याचे मेटे म्हणाले.

दरम्यान राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने आम्ही लवकरच राज्यपालांची भेट घेणार आहोत. वेळ पडल्यास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपतींचीही भेट घेऊ, असे मेटे यांनी सांगितले.