शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनाच्या कामातून भूजलपातळीत वाढ

By admin | Updated: April 12, 2017 04:01 IST

जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी या गावामध्ये शासकीय योजनांच्या माध्यमातून विकासाची गंगा अवतरली आहे. सिंचनाच्या कामातून

- सतिश सांगळे,  कळस

जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी या गावामध्ये शासकीय योजनांच्या माध्यमातून विकासाची गंगा अवतरली आहे. सिंचनाच्या कामातून खालावलेली भूगर्भातील पाणीपातळी वाढीस लागली आहे. आज सिमेंट बांध, तलाव पाण्याने भरलेले आहेत.विहिरी व हातपंप ऐन उन्हाळ्यात ओव्हरफ्लो झाले आहेत. आमदार आदर्श ग्राम योजनेतून होत असलेल्या कामांमुळे गावाचे चित्रच बदलत चालले आहे. शेळगावमधील वाड्यावस्त्या मिळून कडबनवाडी ग्रामपंचायत तयार करण्यात आली. या गावांची १५०० पर्यंत लोकसंख्या आहे. दहा वर्षांपूर्वीचा विचार केला तर हे गाव फारसे चर्चेत नव्हते. मात्र, तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी आदर्श ग्रामयोजनेत निवड होताच कधीही गावाकडे न फिरकलेल्या यंत्रणांच्या गावशिवारात फेऱ्या वाढल्या. तहसीलदार, गटविकास अधिकारी असे सर्व जण गावात जाऊन भेटी घेऊ लागले. यामुळे ग्रामविकासाला चालना मिळाली. शेती हाच मुख्य व्यवसाय असलेल्या या भागातील विहिरींच्या पातळीत झपाट्याने घट झाली होती. गावाच्या एक हजार हेक्टरपैकी केवळ ४० टक्के शेतीच बागायती होती. राज्यात नव्याने आलेल्या शासनाने प्रत्येक आमदाराला आदर्श ग्राम बनविण्याचे उद्दिष्ट दिले. आमदार दत्तात्रय भरणे यांनी जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने या ग्रामपंचायतीची निवड केली. ग्राम दत्तक योजनेतील गावांना विशेष प्राधान्य देऊन विकास साधण्यासाठी आराखडा करून पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू झाले. शेतीसाठी पाणी महत्त्वाचे आहे. आधी फारशा सुविधा नव्हत्या. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ धोरणाची अंमलबजावणी झाल्याने आता पातळीत कमालीची वाढ झाली. याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होत आहे. शासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी गावात येऊन समस्या जाणून घेतात. त्यासाठी शासनाकडे उपाय सुचवीत आहोत. आमच्या गावाचे चित्र बदलले आहे, असे जलसंधारणाचे प्रणेते भजनदास पवार यांनी सांगितले. गाव ठरेल मॉडेल व्हिलेजगावात याआधी अंगणवाडी होती. मात्र, अंगणवाडीला प्रशस्त जागा नसल्यामुळे बालकांच्या बसण्याची अव्यवस्था होती. महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून पाच लाख रुपयांच्या अंगणवाडीचे बांधकाम करण्यात आले. गावातील बालकांना बसण्यासाठी प्रशस्त जागा उपलब्ध झाली आहे. गावातील युवकांचे शरीरसौष्ठव व्हावे, लष्कर व पोलीस भरतीसाठी युवकांना सज्ज करण्यासाठी येथे व्यायामशाळेची उभारणी करण्यात आली. आतापर्यंत जवळपास चार कोटींपेक्षा अधिक निधीतून विविध विकासकामे करण्यात आली. तर दोन कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. लवकरच हे गाव एक मॉडेल व्हिलेज म्हणून समोर येणार आहे.शिवाराचाही कायापालट...या गावांची उपजीविका पूर्णपणे शेतीवरच अवलंबून आहे. गावाचे रूपडे जसे बदलते आहे, तसाच बदल शेतीतही दिसू लागला. खालावलेल्या पातळीला जलसंधारणाच्या कामांनी आधार दिला.नाला खोलीकरण-रुंदीकरण, बंधारे, तलावाचे पुनरुज्जीवन यामुळे पाणी साठवणक्षमता वाढली. परिणामी, पातळीत वाढ होऊन या कामांचे फलित दिसू लागले. गावाच्या तिन्ही दिशेला सिंचन तलाव आहे. हे तलाव तुडुंब भरल्याने विहिरींच्या पातळीत वाढ झाली. २० फुटांच्या आत पातळी आली. याचा फायदा सिंचन वाढण्यासाठी होऊ लागला. गावाशेजारी वाहणाऱ्या नाल्यावरही सिमेंट बंधारा बांधल्याने त्यातही पाणी अडले. एक किलोमीटरपर्यंत त्यात पाणी आहे. कृषी विभागाच्या नावीन्यपूर्ण योजनेतून या गावात शेकडो हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड करण्यात आली.