शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाचे दिग्दर्शक झालात तर...; अक्षय कुमारच्या प्रश्नावर CM फडणवीसांचं दमदार उत्तर, टाळ्यांचा कडकडाट
2
योगी बुलडोजर चालवत आहेत तर...? बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर यांचा CJI बीआर गवईंना थेट सवाल
3
बिहारमध्ये भाजपाच्या अडचणी वाढणार, चिराग पासवान-प्रशांत किशोर यांना टाळी देण्याच्या तयारीत?
4
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे
5
जखमींना हॉस्पिटलला पोहचवा, २५ हजार ते १ लाख मिळवा; योगी सरकारनं आणली जबरदस्त योजना
6
VIRAL : तो नवरा आहे गं, महिषासुर नाही... करवा चौथची पूजा करण्यासाठी महिलेनं काय केलं, Video बघाच!
7
"आम्हाला दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं नव्हतं...", रेणुका शहाणेंचा मोठा खुलासा, म्हणाल्या...
8
'या' एका निर्णयाने फिरलं वातावरण! ग्राहक जोडणीत BSNL ने Airtel ला टाकले मागे; जिओची काय स्थिती?
9
Cough Syrup : "पप्पा, घरी जाऊया...", कफ सिरपमुळे मुलीने गमावला जीव; १६ डायलिसिस, २२ दिवस मृत्यूशी झुंज
10
कतरिना कैफचं झालं बेबी शॉवर, 'या' फोटोमुळे मिळाली हिंट; ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
11
धक्कादायक! विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची १२ व्या मजल्यावरून उडी; दोघांचाही मृत्यू
12
“गेम करण्याएवढी ताकद नाही, आम्ही भांडी घासायला बसलोय का”; ओबीसी नेत्यांचे जरांगेंना उत्तर
13
Australia Squad Against India : टीम इंडियाच्या २ कॅप्टनसमोर ऑस्ट्रेलियाकडून मार्श दाखवणार ताकद
14
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
15
VIDEO: रस्त्याखाली काम, रस्त्यावर 'जॅम'! मेट्रो सुरू झाली, पण कार अजूनही ट्रॅफिकमध्येच; वरळी नाक्याजवळची कोंडी कधी फुटणार?
16
Video - राईड संपल्यानंतर 'ती' रॅपिडोवाल्याशी भिडली, पैसे मागताच डोळ्यात फेकली मिरची फूड
17
१५ राण्या, ३० मुलं अन् १०० नोकरांसह दुबईला पोहोचला 'या' देशाचा राजा; शेख पाहत राहिले...
18
जबरदस्त फिचर! नंबरशिवाय तुमचे WhatsApp काम करेल, लवकरच अपडेट होणार
19
सगळ्याच मर्यादा ओलांडल्या! १८ वर्षांच्या जावयाशी लग्न करणार होती सासू; मंगळसूत्र घालण्याआधीच मुलीची एंट्री झाली अन्.. 
20
‘मविआ’सोबत न घेण्याच्या हर्षवर्धन सपकाळांचा निर्णय, मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले...

सिंचनाच्या कामातून भूजलपातळीत वाढ

By admin | Updated: April 12, 2017 04:01 IST

जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी या गावामध्ये शासकीय योजनांच्या माध्यमातून विकासाची गंगा अवतरली आहे. सिंचनाच्या कामातून

- सतिश सांगळे,  कळस

जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी या गावामध्ये शासकीय योजनांच्या माध्यमातून विकासाची गंगा अवतरली आहे. सिंचनाच्या कामातून खालावलेली भूगर्भातील पाणीपातळी वाढीस लागली आहे. आज सिमेंट बांध, तलाव पाण्याने भरलेले आहेत.विहिरी व हातपंप ऐन उन्हाळ्यात ओव्हरफ्लो झाले आहेत. आमदार आदर्श ग्राम योजनेतून होत असलेल्या कामांमुळे गावाचे चित्रच बदलत चालले आहे. शेळगावमधील वाड्यावस्त्या मिळून कडबनवाडी ग्रामपंचायत तयार करण्यात आली. या गावांची १५०० पर्यंत लोकसंख्या आहे. दहा वर्षांपूर्वीचा विचार केला तर हे गाव फारसे चर्चेत नव्हते. मात्र, तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी आदर्श ग्रामयोजनेत निवड होताच कधीही गावाकडे न फिरकलेल्या यंत्रणांच्या गावशिवारात फेऱ्या वाढल्या. तहसीलदार, गटविकास अधिकारी असे सर्व जण गावात जाऊन भेटी घेऊ लागले. यामुळे ग्रामविकासाला चालना मिळाली. शेती हाच मुख्य व्यवसाय असलेल्या या भागातील विहिरींच्या पातळीत झपाट्याने घट झाली होती. गावाच्या एक हजार हेक्टरपैकी केवळ ४० टक्के शेतीच बागायती होती. राज्यात नव्याने आलेल्या शासनाने प्रत्येक आमदाराला आदर्श ग्राम बनविण्याचे उद्दिष्ट दिले. आमदार दत्तात्रय भरणे यांनी जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने या ग्रामपंचायतीची निवड केली. ग्राम दत्तक योजनेतील गावांना विशेष प्राधान्य देऊन विकास साधण्यासाठी आराखडा करून पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू झाले. शेतीसाठी पाणी महत्त्वाचे आहे. आधी फारशा सुविधा नव्हत्या. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ धोरणाची अंमलबजावणी झाल्याने आता पातळीत कमालीची वाढ झाली. याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होत आहे. शासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी गावात येऊन समस्या जाणून घेतात. त्यासाठी शासनाकडे उपाय सुचवीत आहोत. आमच्या गावाचे चित्र बदलले आहे, असे जलसंधारणाचे प्रणेते भजनदास पवार यांनी सांगितले. गाव ठरेल मॉडेल व्हिलेजगावात याआधी अंगणवाडी होती. मात्र, अंगणवाडीला प्रशस्त जागा नसल्यामुळे बालकांच्या बसण्याची अव्यवस्था होती. महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून पाच लाख रुपयांच्या अंगणवाडीचे बांधकाम करण्यात आले. गावातील बालकांना बसण्यासाठी प्रशस्त जागा उपलब्ध झाली आहे. गावातील युवकांचे शरीरसौष्ठव व्हावे, लष्कर व पोलीस भरतीसाठी युवकांना सज्ज करण्यासाठी येथे व्यायामशाळेची उभारणी करण्यात आली. आतापर्यंत जवळपास चार कोटींपेक्षा अधिक निधीतून विविध विकासकामे करण्यात आली. तर दोन कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. लवकरच हे गाव एक मॉडेल व्हिलेज म्हणून समोर येणार आहे.शिवाराचाही कायापालट...या गावांची उपजीविका पूर्णपणे शेतीवरच अवलंबून आहे. गावाचे रूपडे जसे बदलते आहे, तसाच बदल शेतीतही दिसू लागला. खालावलेल्या पातळीला जलसंधारणाच्या कामांनी आधार दिला.नाला खोलीकरण-रुंदीकरण, बंधारे, तलावाचे पुनरुज्जीवन यामुळे पाणी साठवणक्षमता वाढली. परिणामी, पातळीत वाढ होऊन या कामांचे फलित दिसू लागले. गावाच्या तिन्ही दिशेला सिंचन तलाव आहे. हे तलाव तुडुंब भरल्याने विहिरींच्या पातळीत वाढ झाली. २० फुटांच्या आत पातळी आली. याचा फायदा सिंचन वाढण्यासाठी होऊ लागला. गावाशेजारी वाहणाऱ्या नाल्यावरही सिमेंट बंधारा बांधल्याने त्यातही पाणी अडले. एक किलोमीटरपर्यंत त्यात पाणी आहे. कृषी विभागाच्या नावीन्यपूर्ण योजनेतून या गावात शेकडो हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड करण्यात आली.