शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

सिंचनाच्या कामातून भूजलपातळीत वाढ

By admin | Updated: April 12, 2017 04:01 IST

जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी या गावामध्ये शासकीय योजनांच्या माध्यमातून विकासाची गंगा अवतरली आहे. सिंचनाच्या कामातून

- सतिश सांगळे,  कळस

जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी या गावामध्ये शासकीय योजनांच्या माध्यमातून विकासाची गंगा अवतरली आहे. सिंचनाच्या कामातून खालावलेली भूगर्भातील पाणीपातळी वाढीस लागली आहे. आज सिमेंट बांध, तलाव पाण्याने भरलेले आहेत.विहिरी व हातपंप ऐन उन्हाळ्यात ओव्हरफ्लो झाले आहेत. आमदार आदर्श ग्राम योजनेतून होत असलेल्या कामांमुळे गावाचे चित्रच बदलत चालले आहे. शेळगावमधील वाड्यावस्त्या मिळून कडबनवाडी ग्रामपंचायत तयार करण्यात आली. या गावांची १५०० पर्यंत लोकसंख्या आहे. दहा वर्षांपूर्वीचा विचार केला तर हे गाव फारसे चर्चेत नव्हते. मात्र, तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी आदर्श ग्रामयोजनेत निवड होताच कधीही गावाकडे न फिरकलेल्या यंत्रणांच्या गावशिवारात फेऱ्या वाढल्या. तहसीलदार, गटविकास अधिकारी असे सर्व जण गावात जाऊन भेटी घेऊ लागले. यामुळे ग्रामविकासाला चालना मिळाली. शेती हाच मुख्य व्यवसाय असलेल्या या भागातील विहिरींच्या पातळीत झपाट्याने घट झाली होती. गावाच्या एक हजार हेक्टरपैकी केवळ ४० टक्के शेतीच बागायती होती. राज्यात नव्याने आलेल्या शासनाने प्रत्येक आमदाराला आदर्श ग्राम बनविण्याचे उद्दिष्ट दिले. आमदार दत्तात्रय भरणे यांनी जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने या ग्रामपंचायतीची निवड केली. ग्राम दत्तक योजनेतील गावांना विशेष प्राधान्य देऊन विकास साधण्यासाठी आराखडा करून पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू झाले. शेतीसाठी पाणी महत्त्वाचे आहे. आधी फारशा सुविधा नव्हत्या. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ धोरणाची अंमलबजावणी झाल्याने आता पातळीत कमालीची वाढ झाली. याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होत आहे. शासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी गावात येऊन समस्या जाणून घेतात. त्यासाठी शासनाकडे उपाय सुचवीत आहोत. आमच्या गावाचे चित्र बदलले आहे, असे जलसंधारणाचे प्रणेते भजनदास पवार यांनी सांगितले. गाव ठरेल मॉडेल व्हिलेजगावात याआधी अंगणवाडी होती. मात्र, अंगणवाडीला प्रशस्त जागा नसल्यामुळे बालकांच्या बसण्याची अव्यवस्था होती. महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून पाच लाख रुपयांच्या अंगणवाडीचे बांधकाम करण्यात आले. गावातील बालकांना बसण्यासाठी प्रशस्त जागा उपलब्ध झाली आहे. गावातील युवकांचे शरीरसौष्ठव व्हावे, लष्कर व पोलीस भरतीसाठी युवकांना सज्ज करण्यासाठी येथे व्यायामशाळेची उभारणी करण्यात आली. आतापर्यंत जवळपास चार कोटींपेक्षा अधिक निधीतून विविध विकासकामे करण्यात आली. तर दोन कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. लवकरच हे गाव एक मॉडेल व्हिलेज म्हणून समोर येणार आहे.शिवाराचाही कायापालट...या गावांची उपजीविका पूर्णपणे शेतीवरच अवलंबून आहे. गावाचे रूपडे जसे बदलते आहे, तसाच बदल शेतीतही दिसू लागला. खालावलेल्या पातळीला जलसंधारणाच्या कामांनी आधार दिला.नाला खोलीकरण-रुंदीकरण, बंधारे, तलावाचे पुनरुज्जीवन यामुळे पाणी साठवणक्षमता वाढली. परिणामी, पातळीत वाढ होऊन या कामांचे फलित दिसू लागले. गावाच्या तिन्ही दिशेला सिंचन तलाव आहे. हे तलाव तुडुंब भरल्याने विहिरींच्या पातळीत वाढ झाली. २० फुटांच्या आत पातळी आली. याचा फायदा सिंचन वाढण्यासाठी होऊ लागला. गावाशेजारी वाहणाऱ्या नाल्यावरही सिमेंट बंधारा बांधल्याने त्यातही पाणी अडले. एक किलोमीटरपर्यंत त्यात पाणी आहे. कृषी विभागाच्या नावीन्यपूर्ण योजनेतून या गावात शेकडो हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड करण्यात आली.