शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

सोयाबीन, मक्याच्या क्षेत्रात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:11 IST

पुणे : जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी कृषी विभागाने पूर्ण केली आहे. येत्या काही दिवसांत लागवडीला सुरुवात होणार आहे. त्या ...

पुणे : जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी कृषी विभागाने पूर्ण केली आहे. येत्या काही दिवसांत लागवडीला सुरुवात होणार आहे. त्या दृष्टीने खतांची आणि बियाण्यांची पूर्तता करण्यात आली आहे. या वर्षी सोयाबीन आणि मक्याच्या क्षेत्रात वाढ झाली असल्याची माहिती कृषी सभापती बाबूराव वायकर यांनी दिली.

खरीप हंगामाच्या तयारीसंदर्भात नुकतीच आढावा बैठक पार पडली. याबाबत खरीप हंगामाच्या तयारीची माहिती वायकर यांनी मंगळवारी (दि. २५) पत्रकार परिषदेत दिली. वायकर म्हणाले की, यावर्षी २ लाख १९ हजार ५०० हेक्टरवर खरीप हंगामातील पिकांची लागवड केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी त्या दृष्टीने तयारी केली आहे. त्यांना खतांची आणि बियाण्यांची कमी जाणवणार नाही यासाठी तयारी करण्यात आली आहे. यंदा ६१ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाणार आहे. तर, ५४ हजार हेक्टर क्षेत्रावर बाजरीची लागवड होणार आहे.

यंदा गेल्या काही वर्षांच्या तुलनेत खरीप सोयाबीन क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या वर्षी २६ हजार ५०० हेक्टरवर साेयाबीनची पेरणी करण्यात आली होती. यावर्षी त्यात वाढ होऊन २८ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर साेयाबीनची लागवड केली जाणार आहे. मक्याच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. २५ हजार हेक्टरवर त्याची लागवड केली जाणार आहे. भुईमूग १६ हजार हेक्टरवर लावला जाणार आहे. यंदाच्या हंगामासाठी २८हजार ८६ क्विंटल बियाणे लागणार आहे. यातील १६ हजार ७१ क्वीटंल बियाणे मिळाले आहे. शेतकऱ्यांना खतांची कुठलीही टंचाई भासणार नाही. तसेच सबसीडी जाहीर झाली असल्याने वाजवी दरात खते उपलब्ध होतील असे वायकर म्हणाले. गेल्या वर्षी १ लाख ९५ हजार ३४८ मेट्रिक टन खतांची मागणी करण्यात आली होती. यावर्षी २ लाख ५४ हजार ८०० मेट्रिक टन खतांची मागणी केली आहे. प्रत्यक्षात सरकारने १ लाख ८४ हजार ४८०मेट्रिक टन मंजूर केले असून १ लाख २१ हजार ९६३ मेट्रिक टन खत जिल्ह्याला मिळाले आहे. ८९हजार७०० मेट्रिक टन खत मिळणे असून बाकी आहे.

चौकट

उसाच्या लागवड क्षेत्रात वाढ

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून उसाच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी १ लाख ३० हजार ६३१ हेक्टरवर उसाची लागवड करण्यात आली होती. यात यावर्षी वाढ झाली असून १ लाख ३६ हजार हेक्टरवर लागवड होणार आहे.

चौकट

यंदा २ हजार ६३५ कोटींच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट

खरीप हंगामासाठी गेल्या वर्षी १ हजार ६५३ कोटी ४३ लाख पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी १ हजार ६४७ कोटी ४३ लाखांच्या पीककर्जाचे वाटप करण्यात आले होते. या वर्षी यात वाढ करण्यात आली आहे. २ हजार ६३५ कोटींच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट यावर्षी ठेवण्यात आले आहे.