शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात सहकारी साखर कारखान्यांच्या शेअर्स मध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:11 IST

(प्रशांत ननवरे ) लोकमत न्यूज नेटवर्क बारामती : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या सभासदांच्या ‘शेअर्स’ रकमेत आजपासून वाढ करण्यात आली ...

(प्रशांत ननवरे )

लोकमत न्यूज नेटवर्क

बारामती : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या सभासदांच्या ‘शेअर्स’ रकमेत आजपासून वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार शेअर्सची रक्कम १० हजारांवरून १५ हजार करण्यात आली आहे. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरणार आहे. तसेच निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याची भीती व्यक्त होत आहे.

आता कारखान्याचे भागभांडवल वाढविण्यासाठी राज्य शासनाने मंगळवारी सहकार विभागाने पत्राद्वारे हे आदेश दिले आहेत. केंद्र शासनाने साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मिती क्षमतेमध्ये आणि पुरवठ्यामध्ये वाढ करण्यासाठी वेगवेगळया उपाययोजना राबविलेल्या आहेत. तसेच केंद्र शासनाचे पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्याचे प्रमाण ५ टक्यावरुन २० टक्यापर्यंत वाढविण्याचे धोरण आहे. केंद्र शासनाने इथेनॉल निर्मिती करण्यासाठी महाराष्ट्रातील १२६ साखर कारखान्यांच्या आसवणी प्रकल्पांना व्याज अनुदान देण्यास मंजुरी दिलेली आहे. तसेच साखर कारखान्यांपैकी ६७ सहकारी साखर कारखाने आहेत.

त्या सहकारी साखर कारखान्यांना विस्तारवाढ करण्यासाठी आणि उपपदार्थावरील प्रकिया करणाऱ्या प्रकल्पांच्या उभारणीसाठी वित्तीय संस्थांकडून कर्ज घेणे आवश्यक झालेले आहे. ज्याअर्थी सहकारी साखर कारखान्यांची वित्तीय संस्थांकडून कर्ज उभारण्याची क्षमता क्षीण झालेली आहे. काही सहकारी साखर कारखान्यांचे नक्तमूल्य व एन. डी. आर. उणे असल्यामुळे वित्तीय संस्थाकडून कर्ज प्राप्त होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. केंद्र शासनाच्या इथेनॉल निर्मिती धोरणाप्रमाणे अंमलबजावणी करण्यासाठी नवीन साखर आसवणी प्रकल्प, कार्यरत आसवणी प्रकल्पामध्ये क्षमतावाढ, शून्य प्रदूषण पातळी राखण्यासाठी इन्सीनेशन बॉयलर उभारणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी सहकारी साखर कारखान्यांना स्वनिधीची गुंतवणूक कमी पडत आहे. सहकारी साखर कारखान्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी भागभांडवलामध्ये वाढ करणे आवश्यक आहे. भागभांडवलागध्ये वाढ झाल्याने स्वनिधीमध्ये वाढ होवुन नवीन प्रकल्प उभारताना कार्यरत प्रकल्पामध्ये क्षमता वाढ करताना, गाळप क्षमता वाढ करताना वित्तीय संस्थांकडून कर्ज घेणे शक्य होणार आहे.

त्यमुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९ अ खाली प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करुन शासन शेअर्स रक्कम वाढविण्याबाबत निर्देश दिले आहेत.

चौकट

राज्यातील सर्व सहकारी साखर कारखान्यांच्या सभासदांच्या भागाची दर्शनी किंमत १०,००० रूपयांवरुन १५,००० रूपये करावी. सर्व सहकारी साखर कारखान्यांनी उपविधिमध्ये दुरुस्ती करुन भागांची दर्शनी किंमत १०,००० रूपयांवरुन १५,०००रूपये करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. आधीच शेतकऱ्यांचे सहकारी कारखान्यांकडे कोट्यवधी भागभांडवल जमा आहे. आता या निर्णयाने शेतकऱ्यांच्या हाती काय उरणार असा सवाल शेतकरी कृती समितीच्या वतीने व्यक्त होत आहे.

-------------------------

...हे तर सहकारावरील "तौक्ते "वादळ

हा निर्णय सर्वस्वी अन्यायकारक आहे. कोणालाही विचारात न घेतलेल्या या निर्णयाला शेतकरी कृती समितीचा विरोध असेल. एक प्रकारे हे सहकारावरील तौक्ते वादळच आहे. याचे सहकारावर दूरगामी परिणाम होतील. सहकार वाचविण्यासाठी या निर्णयाचा फेरविचार व्हावा.

पृथ्वीराज जाचक, माजी अध्यक्ष, राज्य साखर संघ